शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीचे संपादन सुरु, सांगली जिल्ह्यातील १९ गावांमध्ये रस्त्याचे मार्किंग पूर्ण

By अशोक डोंबाळे | Updated: March 1, 2025 12:13 IST

अशोक डोंबाळे सांगली : शक्तिपीठ महामार्गाला एकीकडे शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत असताना दुसरीकडे या मार्गाचे काम गतीने केले जात ...

अशोक डोंबाळे

सांगली : शक्तिपीठ महामार्गाला एकीकडे शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत असताना दुसरीकडे या मार्गाचे काम गतीने केले जात असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) एक महिन्यात या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत मोजणीचे काम सुरू झाले असून, सांगली जिल्ह्यातही मार्किंग केले आहे.नागपूर ते गोवा असा महामार्ग तयार केला जात आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांमधून हा महामार्ग जातोय. महत्त्वाच्या शक्तिपीठांना जोडणारा हा महामार्ग आहे. मात्र, या महामार्गासाठी जमीन देण्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. मराठवाडा आणि विदर्भातदेखील हीच भूमिका शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे मध्यंतरी या महामार्गाचे काम थांबले होते.मात्र, या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी सुरू करण्याचे आदेश एमएसआरडीसीने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यात वर्धा, यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोजणी सुरू आहे. उर्वरित जिल्ह्यातही मोजणी होणार असून, मार्चअखेरपर्यंत ती पूर्ण केली जाणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अशी असेल मोजणी?शक्तिपीठ महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी केली जाईल. भूसंपादन विभाग, भूमी अभिलेख, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी, वन आणि जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांमार्फत ही संयुक्त मोजणी केली जाईल. या मोजणीत महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीवर असणाऱ्या विहिरी, बोअर, फळझाडे तसेच इतर बाबींची नोंद घेतली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष गटानुसार क्षेत्र मोजून त्याचे मूल्यमापन केले जाणार आहे.

सरकारची भूमिका सांगणारशक्तिपीठ महामार्ग सुरू करण्यापूर्वी ज्या गावांतून हा महामार्ग जात आहे, त्या गावांत ग्रामस्थांची बैठक घेतली जाणार आहे. त्यात सरकारची भूमिका मांडली जाणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे होणाऱ्या फायद्यांची माहिती शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांमार्फत पटवून दिली जाणार आहे.

सांगली जिल्ह्यातील ‘या’ गावांतून जाणार महामार्गसांगली जिल्ह्यातील शेटफळे, घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी, सिद्धेवाडी, सावळज, अंजनी, वज्रचौंडी, गव्हाण, मनेराजुरी, सावर्डे, नागाव कवठे, कवलापूर, बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, पद्माळे आणि सांगलीवाडी या गावांतून हा महामार्ग जाणार आहे.

शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील १९ गावांतून जात आहे. या गावांचे रेखांकन रस्ते विकास महामंडळाकडून मिळाले होते. त्यानुसार जमीन संपादनासाठी लागणाऱ्या मोजणीचा खर्चाचा अहवाल रस्ते विकास महामंडळाला पाठविला आहे. त्यांच्याकडून भूमीअभिलेख विभागाला मोजणीचे पैसे भरल्यानंतर लगेच पुढील कामकाज सुरू होणार आहे. -उत्तम दिघे, प्रांताधिकारी, मिरज. 

शेतकऱ्यांना भूमिहीन करून कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही. प्रसंगी प्रशासन, शासनाशी दोन हात करावे लागले तरी चालतील. पण, आम्ही जमिनीचे संपादन करू देणार नाही. - दिगंबर कांबळे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी कामगार पक्ष

एवढी आंदोलन करूनही महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचा विचार करायला तयार नाही. रेखांकन बदलून महामार्ग करणार, अशा वल्गना हवेत विरल्या. ज्या भागातून हा महामार्ग जाणार आहे, तेथील शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार? याबाबत सरकार किंवा मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत म्हणून १२ मार्च रोजी विधानसभेवर मोर्चा काढणार आहे. - उमेश देशमुख, प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा

टॅग्स :Sangliसांगलीhighwayमहामार्गFarmerशेतकरीGovernmentसरकार