शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पदांसाठी लाचार कसे होता?

By admin | Updated: March 16, 2016 08:30 IST

अण्णा डांगे : महादेव जानकरांच्या भूमिकेवर टीकास्त्र

सांगली : आयुष्यभर ज्यांना शिव्या घातल्या, त्यांच्याच पायाला पुन्हा लोणी लावण्याचे काम जिल्ह्यातील स्वाभिमानी म्हणवणारे नेते करीत आहेत. एखाद्या समाजाचे नेतृत्व करताना पदांसाठी हे लोक लाचार कसे होतात? अशा पदांना लाथ मारून स्वाभिमानाने राजकारण करता आले पाहिजे, अशी टीका माजी मंत्री व राष्ट्रवादी नेते अण्णा डांगे यांनी महादेव जानकर यांचे नाव न घेता केली. धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांसोबत एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. याच राजकारणाचा धागा पकडत डांगे म्हणाले की, महाराष्ट्रात हे कसले राजकारण सुरू आहे? मंत्रिपदासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे. एका समाजाचे नेतृत्व करून मतांचे राजकारण करायचे चालू आहे. समाजासाठी अशा पदांना लाथ मारायला हवी. एकूणच महाराष्ट्रातील राजकारणात जे काही चालले आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांचे निर्णय चुकीचेच असले, तरी विरोधकांचा अकांडतांडवही काही बरोबर नाही. कॉँग्रेसनेही त्यांच्या सत्ताकाळात त्याच गोष्टी केल्या. विद्यमान मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या कारकीर्दीत असेच निर्णय घेतले होते. त्यामुळे दुष्काळावर राजकारण करण्यापेक्षा एकत्रित येऊन प्रश्न सोडविला पाहिजे. यापूर्वीही १९७२ च्या दुष्काळावेळी आम्ही आंदोलने केली होती. रस्त्यावर उतरून किंवा अन्य मार्गाने आंदोलने करताना सभागृहातील चर्चा होणे महत्त्वाचे असते. विधिमंडळातील चर्चा बंद करण्यापर्यंतचे राजकारण कोणाच्याही हिताचे नाही. त्यामुळे चर्चा होऊन निर्णय घेतले गेले पाहिजेत. मागील अधिवेशनात ज्याबद्दल सरकारने आश्वासने दिली होती, त्याची उत्तरे या अधिवेशनात त्यांना देणे भाग होते. मात्र चर्चाच बंद होत असतील, तर प्रश्न अणि उत्तरांचा संबंधच उरत नाही. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हाच अपेक्षा सोडल्याराष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतरच अपेक्षा सोडल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत पक्षाने माझ्याकडे कोणतेही काम दिलेले नाही. पदाची किंवा अन्य कोणत्याही सन्मानाची अपेक्षाही आता सोडून दिलेली आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळवून दिल्यास सर्व अपेक्षा पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल, असे मत डांगे यांनी व्यक्त केले.