शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
3
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
4
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
5
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
6
भाजपा नगसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
7
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
8
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
9
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
10
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
11
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
12
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
13
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
14
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
15
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
16
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
17
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
18
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
19
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
20
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका

पदांसाठी लाचार कसे होता?

By admin | Updated: March 16, 2016 08:30 IST

अण्णा डांगे : महादेव जानकरांच्या भूमिकेवर टीकास्त्र

सांगली : आयुष्यभर ज्यांना शिव्या घातल्या, त्यांच्याच पायाला पुन्हा लोणी लावण्याचे काम जिल्ह्यातील स्वाभिमानी म्हणवणारे नेते करीत आहेत. एखाद्या समाजाचे नेतृत्व करताना पदांसाठी हे लोक लाचार कसे होतात? अशा पदांना लाथ मारून स्वाभिमानाने राजकारण करता आले पाहिजे, अशी टीका माजी मंत्री व राष्ट्रवादी नेते अण्णा डांगे यांनी महादेव जानकर यांचे नाव न घेता केली. धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांसोबत एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. याच राजकारणाचा धागा पकडत डांगे म्हणाले की, महाराष्ट्रात हे कसले राजकारण सुरू आहे? मंत्रिपदासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे. एका समाजाचे नेतृत्व करून मतांचे राजकारण करायचे चालू आहे. समाजासाठी अशा पदांना लाथ मारायला हवी. एकूणच महाराष्ट्रातील राजकारणात जे काही चालले आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांचे निर्णय चुकीचेच असले, तरी विरोधकांचा अकांडतांडवही काही बरोबर नाही. कॉँग्रेसनेही त्यांच्या सत्ताकाळात त्याच गोष्टी केल्या. विद्यमान मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या कारकीर्दीत असेच निर्णय घेतले होते. त्यामुळे दुष्काळावर राजकारण करण्यापेक्षा एकत्रित येऊन प्रश्न सोडविला पाहिजे. यापूर्वीही १९७२ च्या दुष्काळावेळी आम्ही आंदोलने केली होती. रस्त्यावर उतरून किंवा अन्य मार्गाने आंदोलने करताना सभागृहातील चर्चा होणे महत्त्वाचे असते. विधिमंडळातील चर्चा बंद करण्यापर्यंतचे राजकारण कोणाच्याही हिताचे नाही. त्यामुळे चर्चा होऊन निर्णय घेतले गेले पाहिजेत. मागील अधिवेशनात ज्याबद्दल सरकारने आश्वासने दिली होती, त्याची उत्तरे या अधिवेशनात त्यांना देणे भाग होते. मात्र चर्चाच बंद होत असतील, तर प्रश्न अणि उत्तरांचा संबंधच उरत नाही. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हाच अपेक्षा सोडल्याराष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतरच अपेक्षा सोडल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत पक्षाने माझ्याकडे कोणतेही काम दिलेले नाही. पदाची किंवा अन्य कोणत्याही सन्मानाची अपेक्षाही आता सोडून दिलेली आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळवून दिल्यास सर्व अपेक्षा पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल, असे मत डांगे यांनी व्यक्त केले.