शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

वादळी पावसाचा तडाखा, 5 जण जखमी, घरांचे नुकसान अन् कंपन्यांवरील पत्रेही उडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 9:31 PM

शनिवार आज रोजी दुपारी चार च्या दरम्यान तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यात औद्योगिक वसाहतीमध्ये मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देमुंबई येथील रजनी पोपट यांची कंपनीचे जवळपास ६ हजार स्केअर फूट संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली आहे. तर सर्व पत्रे उडून गेले आहेत. घनश्याम माने यांचे एक शेड पूर्ण उडून गेले आहे.

सांगली/शिराळा - येथील औद्योगिक वसाहत आणि भटवाडी गावामध्ये वादळी वाऱ्यासह पडलेल्या पाऊस व वाऱ्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. औद्योगिक वसाहतीतील तीन मुली, एक महिला तर भटवाडी येथील एक महिला असे पाच जण जखमी झाले असून मेघा लक्ष्मण पाटील (वय २३ रा.थावडे,  ता शाहूवाडी जि कोल्हापूर ) या गंभीर जखमी आहेत. रस्त्यावर, सगळीकडे पाणीच पाणी तसेच दूरवर पत्रे उडतानाचे भयावह दृश्य दिसत होते. भटवाडी येथील शेतातील बांध फुटून शेतांचेही ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शनिवार आज रोजी दुपारी चार च्या दरम्यान तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यात औद्योगिक वसाहतीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. इकोराईज बायो फर्टिलयझर कंपनीची भिंत पडली व पत्रे उडून गेले. त्यामध्ये मेघा पाटील या गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच नूतन महादेव डांगे (वय २३, रा.शिराळा), सविता बाजीराव निकम (वय ४०), स्नेहल आनंदराव मस्के (वय २३) यांनाही डोक्यास मार लागून तर नूतन महादेव डांगे (वय २३, रा.शिराळा) यांचे दोन्ही हात फॅक्चर होऊन जखमी झाल्या आहेत. तसेच, घनश्याम आवटे यांच्या ऐज टीव्ही कंपनीचे इमारतीचे पत्रे उडून गेले आणि भिंतही कोसळली. 

मुंबई येथील रजनी पोपट यांची कंपनीचे जवळपास ६ हजार स्केअर फूट संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली आहे. तर सर्व पत्रे उडून गेले आहेत. घनश्याम माने यांचे एक शेड पूर्ण उडून गेले आहे. दिलीप पाटील तसेच आणखी एकाच्या राईस मिलचे पत्रे उडून गेले आहेत. त्याचबरोबर आणखी ३-४ कंपन्या ज्यांचे इमारतीचे काम सुरू आहे, अश्या नवीन कंपनीचे शेड उडून गेले आहेत. एक दोन किलोमीटर पत्रे उडून शेतात जाऊन पडले तर काही विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांवर अडकले होते. पावसामुळे ही दाणादाण उडाली, सर्वत्र रस्त्यावर, कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.  या औद्योगिक वसाहतीच्या शेजारीच असणाऱ्या भटवाडी गावातील नरसिंह टेक वस्तीमधील १० ते १५ घरांच्या भिंती पडल्या आहेत तर काही घरांचे छत उडून गेले आहेत. तसेच घराचा छत डोक्यावर पडल्याने अर्चना प्रकाश चव्हाण या जखमी झाल्या आहेत. येथील शेतांमध्ये बांध फुटून शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

घरांचेही नुकसान

भटवाडी येथील प्रकाश विश्वास चव्हाण, विकास विश्वास चव्हाण, दिपक विश्वास चव्हाण, सुभाष बाळू चव्हाण, हंबीर बाळू चव्हाण, शीला शंकर चव्हाण, युवराज शामराव चव्हाण, राजाराम लक्ष्मण चव्हाण, अकाराम लक्ष्‍मण चव्‍हाण, बाबासो शंकर फडतरे यांच्या घरांचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेले आहेत, त्यांच्या घरांचेही नुकसान झाले आहे.  

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसcycloneचक्रीवादळ