शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

मूठभर मराठा सत्ताधाऱ्यांनीच मराठा समाजाला गरीब ठेवले : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 8:33 PM

इस्लामपूर : सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा विषय संवेदनशील बनला आहे. आरक्षण मिळावे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही इच्छा आहे. राज्यात-देशात काही मूठभर मराठा घराण्यांच्या हाती सत्ता होती, त्यावेळी त्यांनी न्याय दिला नाही. मराठा समाजाला जाणीवपूर्वक गरीब ठेवण्याचे काम याच मराठा संस्थानिकांनी केले, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी ...

ठळक मुद्देआंदोलनाच्या आडून कॉँग्रेस-राष्टवादी स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत.

इस्लामपूर : सध्या राज्यभरात मराठा आरक्षणाचा विषय संवेदनशील बनला आहे. आरक्षण मिळावे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही इच्छा आहे. राज्यात-देशात काही मूठभर मराठा घराण्यांच्या हाती सत्ता होती, त्यावेळी त्यांनी न्याय दिला नाही. मराठा समाजाला जाणीवपूर्वक गरीब ठेवण्याचे काम याच मराठा संस्थानिकांनी केले, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी केली.

आरक्षणापासून वंचित असणाºयांच्या पाठीशी सरकार आहे. त्यामुळे आरक्षण प्रक्रियेत मराठा समाजाने सहभागी होताना आत्महत्या किंवा हिंसक मार्गाचा स्वीकार करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

इस्लामपूर येथे आपल्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पूर्वीच्या आघाडी सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जाता-जाता अध्यादेशाद्वारे दिलेले आरक्षण टिकणार नाही, याची माहिती त्यांना होती. त्यांना आरक्षण द्यायचे होते तर सभागृहात विधेयक का आणले नाही? त्याउलट मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात विधेयक मांडून त्याला मंजुरी घेतली. त्यालाही न्यायालयात स्थगिती मिळाली. पुन्हा गुणवत्तेवर आरक्षण देण्याची माहिती न्यायालयात सादर करून मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली.

खोत म्हणाले, या आयोगाने आतापर्यंत राज्यातील १ लाख ८६ हजार नागरिकांच्या साक्षी नोंदवत लेखी निवेदनेही घेतली आहेत. सॅँपल सर्व्हे सादर झाला आहे. तज्ज्ञांच्या समितीमार्फत या साक्षी व निवेदनांची छाननी करून त्याचा अहवाल आयोगाकडून सरकारला सादर होईल. राज्यातला शेतकरी हा कुणबीच आहे. त्यासाठी शिवकालीन काळापासूनचे पुरावे जमा केले आहेत. मराठा समाजाला कायदेशीरपणे टिकणारे आरक्षण देण्याबाबत गतीने काम सुरू आहे. मराठा समाजाने या प्रक्रियेत सहभागी व्हावे. आत्महत्या करणे अथवा हिंसक मार्ग स्वीकारू नये. आंदोलनाच्या आडून कॉँग्रेस-राष्टवादी स्वत:ची पोळी भाजून घेत आहेत.

मराठा समाजातील संस्थानिक नेत्यांनी सर्व संस्था आपल्या ताब्यात ठेवून समाजाला नागवले, वेठीस धरले. चारी बाजूंनी समाजाची कोंडी केली. स्वत: सत्ता भोगताना समाजाला मात्र जाणीवपूर्वक गरीब ठेवले. सत्तेवरून घालवल्यानंतर त्यांनी श्रावण बाळाचा अवतार घेतला आहे. ते आता कावड घेऊन काशीला निघाले आहेत, असा टोला सदाभाऊ खोत यांनी विरोधकांना मारला.यावेळी पं. स. सदस्य राहुल महाडिक, विकास आघाडीचे नेते विक्रम पाटील, माजी जि. प. सदस्य सम्राट महाडिक, जि. प. सदस्य जगन्नाथ माळी, अ‍ॅड. पोपट पवार उपस्थित होते.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत PoliticsराजकारणSangliसांगलीmarathaमराठा