शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
2
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
3
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
4
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
5
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
7
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
8
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
9
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
10
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
11
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
12
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
13
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
14
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
15
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
17
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
18
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
19
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
20
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गद्दार राजकारण्यांना मातीत गाडू

By admin | Updated: February 15, 2015 00:49 IST

संजयकाका पाटील : नांगोळे येथील कार्यक्रमात टीका; शालेय कार्यक्रम बनला राजकीय अड्डा

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील राजकारणात गद्दारी व दलालशाही फोफावली आहे. या फोफावलेल्या गद्दारीला व दलालशाहीला मातीत गाडल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आज (शनिवारी) खासदार संजयकाका पाटील यांनी दिला.
नांगोळे (ता. कवठेमहांकाळ) येथे आदर्श विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे होते. कार्यक्रम शालेय असला तरी त्याला स्वरूप मात्र राजकीय आले.
खासदार पाटील म्हणाले की, तालुक्यात माजी राज्यमंत्री घोरपडे यांनी काही कार्यकर्त्यांना नेते केले. नेत्यांचे पदाधिकारी केले. त्यांना राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली. परंतु या राजकीय कृतघ्न दलालांनी स्वार्थाचे राजकारण केले व घोरपडेंच्या पाठीत खंजीर खुपसला. अशा राजकीय गद्दारांना भविष्यात गाडल्याशिवाय उसंत घेणार नाही. जनतेनेही अशा राजकीय गद्दारांना त्यांची जागा दाखवावी. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबध्द आहोत.
घोरपडे यांनी भाषणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, आर. आर. पाटील तसेच तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडत खरपूस समाचार घेतला.
ते म्हणाले की, लोकशाहीला अर्थकारण व भ्रष्टाचाराने ग्रासले आहे. राजकारणात ज्यांच्याकडे पैसा असेल, त्यानीच राजकारण करायचे का? मग जनतेसाठी प्रामाणिकपणे राबणाऱ्या नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे काय? सध्याच्या राजकारणात पैशावर जनता मते विकू लागली आहे. त्यामुळे राजकारणातली सौदेबाजी सुरू झाली आहे. हे लोकशाहीला मारक आहे. अशा राजकीय सौदेबाजीतून चुकीची माणसे जनता निवडते, त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. ते तसेच राहतात. त्यामुळे जनतेनेही पैशाच्या राजकारणाला बळी पडू नये. घटनेने दिलेल्या सर्वात महत्त्वाच्या मताधिकाराचा योग्य वापर करून योग्य माणसेच राजकारणात पाठवावीत.
मी साधा आमदार नसतानाही डोंगराएवढी उपसा सिंचन योजना पूर्ण केली, परंतु तब्बल १२ वर्षे गृहमंत्रीपद भोगणाऱ्यांना साधी आगळगाव उपसा सिंचन योजना पूर्ण करता आली नाही, हे मोठे दुर्भाग्य आहे व शेतकऱ्यांचे नुकसान आहे. स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेणाऱ्यांनी काय बघून, कोणते गुण बघून यांना बारा वर्षे गृहमंत्री केले? केवळ दलालांना पोसण्याचा व सर्वसामान्य जनतेला फसविण्याचा उद्योग त्यांनी केला.
गुणवंत विद्यार्थ्यांना खासदार पाटील व घोरपडे यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. आदर्श विद्यामंदिराचे सचिव हणमंतराव मासाळ यांनी स्वागत केले, तर मुख्याध्यापक तुकाराम मासाळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भाजपचे कवठेमहांकाळचे अध्यक्ष बाळासाहेब माने यांचेही भाषण झाले.
जि. प. सदस्य तानाजी यमगर, मिलिंद कोरे, रावसाहेब कोळेकर, सुखदेव पाटील, प्रशांत घुळी, राहुल कारंडे, रणजित घाडगे, खंडू होवाळ, पप्पू शिंदे उपस्थित होते.
अजितराव घोरपडेंची राष्ट्रवादीवर टीका
४यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील माझा पराभव केवळ राजकीय सौदेबाजीमुळे, विरोधकांनी पैशाचा वापर केल्यामुळे झाला आहे. मताला हजारावर दर देऊन व जेवणावळी घालून त्यांनी निवडणूक जिंकली आहे. एवढा पैसा त्यांच्याकडे कुठून आला, असा सवाल अजितराव घोरपडे यांनी केला.
४तालुक्यात काही राजकीय दलाल दुकानदारी चालू ठेवण्यासाठी राजकारणात वाकडा पाय टाकत आहेत व सर्वसामान्य माणसांना वेठीस धरत आहेत. अशा राजकीय दलालांचा पाय कायमचा वाकडा केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. या दलालांनी सर्वसामान्य माणसांना वेठीस धरण्याचे व त्रास देण्याचे थांबवावे अन्यथा या दलालांना कायमचे जालीम औषध आपण देऊ, असा इशाराही त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिला.