शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

उन्हाळी सोयाबीन प्रकरणात सरकारकडून फसवणूक, माजी खासदार राजू शेट्टींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 14:33 IST

सत्तेत असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रस्तर व राज्यस्तरावर वारंवार वेगवेगळ्या भूमिका घेत असते. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत असल्याचा दिखावा करीत असले तरी त्यांची धोरणे शेतकरी हिताविरोधी आहेत.

भिलवडी : महाबीज ही सरकारची कंपनी आहे. शेतकऱ्यांना उन्हाळी बियाणे प्लॉटचे आमिष दाखवून लागवड करण्यास भाग पाडले. त्याला पीक लागत नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. सोयाबीनच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांना फसविले असून ते कृषी मंत्रालयाचे अपयश असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

भिलवडी (ता. पलूस) येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपटराव मोरे, कार्याध्यक्ष संदीप राजोबा, बाळासाहेब मगदूम, धन्यकुमार पाटील, रोहित पाटील आदी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले की, मायनर इरिगेशन विभागाची जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सुरू केलेली वसुली तत्काळ थांबवली आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर येऊन निकराची लढाई करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमी कटिबद्ध आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रस्तर व राज्यस्तरावर वारंवार वेगवेगळ्या भूमिका घेत असते. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत असल्याचा दिखावा करीत असले तरी त्यांची धोरणे शेतकरी हिताविरोधी आहेत.

ते म्हणाले की, एफआरपीनुसार उसाला दर, बाजारभावानुसर शेतीमालाला दर, शेतीसाठी नुकसानभरपाई, महापुरातील शेती पिकाची भरपाई आदीबाबत सरकार कोणतीच ठाम भूमिका घेत नाही. जे सरकार व नेते बांधिलकी तोडून स्वार्थाचे राजकारण करणार असतील, त्यांच्याशी स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणतेच संबंध ठेवणार नाही.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी