शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

उन्हाळी सोयाबीन प्रकरणात सरकारकडून फसवणूक, माजी खासदार राजू शेट्टींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 14:33 IST

सत्तेत असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रस्तर व राज्यस्तरावर वारंवार वेगवेगळ्या भूमिका घेत असते. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत असल्याचा दिखावा करीत असले तरी त्यांची धोरणे शेतकरी हिताविरोधी आहेत.

भिलवडी : महाबीज ही सरकारची कंपनी आहे. शेतकऱ्यांना उन्हाळी बियाणे प्लॉटचे आमिष दाखवून लागवड करण्यास भाग पाडले. त्याला पीक लागत नसल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे. सोयाबीनच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांना फसविले असून ते कृषी मंत्रालयाचे अपयश असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

भिलवडी (ता. पलूस) येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपटराव मोरे, कार्याध्यक्ष संदीप राजोबा, बाळासाहेब मगदूम, धन्यकुमार पाटील, रोहित पाटील आदी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले की, मायनर इरिगेशन विभागाची जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सुरू केलेली वसुली तत्काळ थांबवली आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर येऊन निकराची लढाई करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमी कटिबद्ध आहे. सत्तेत असणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रस्तर व राज्यस्तरावर वारंवार वेगवेगळ्या भूमिका घेत असते. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत असल्याचा दिखावा करीत असले तरी त्यांची धोरणे शेतकरी हिताविरोधी आहेत.

ते म्हणाले की, एफआरपीनुसार उसाला दर, बाजारभावानुसर शेतीमालाला दर, शेतीसाठी नुकसानभरपाई, महापुरातील शेती पिकाची भरपाई आदीबाबत सरकार कोणतीच ठाम भूमिका घेत नाही. जे सरकार व नेते बांधिलकी तोडून स्वार्थाचे राजकारण करणार असतील, त्यांच्याशी स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणतेच संबंध ठेवणार नाही.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी