शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यास हवेत पाच जिल्हा परिषद गट

By admin | Updated: September 14, 2016 23:58 IST

राजकीय समीकरणे बदलणार : प्रारूप रचनेबाबत उत्सुकता; एक जागा कमी झाल्याची नाराजी

विकास शहा -- शिराळा -शिराळा तालुक्याच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदारसंघ प्रारूप प्रभाग रचनेची उत्सुकता राजकीय नेते तसेच मतदारांना लागली आहे. शिराळा नगरपंचायत झाल्याने एक जिल्हा परिषद मतदारसंघ कमी झाला आहे. त्यामुळे यातील इतर समाविष्ट गावे कोणत्या मतदार संघात जाणार?, त्यामुळे राजकीय समीकरणे बदलणार का? याचीच चर्चा आहे. राजकीय पक्षांनी पाचच जिल्हा परिषद गट असावेत, अशी मागणी केली आहे. त्याला कितपत यश येते, हे आराखडा प्रसिध्द झाल्यावरच समजेल. मात्र असे न झाल्यास काही राजकीय पक्षांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.शिराळा तालुक्यात याअगोदर पाच जिल्हा परिषदा व १0 पंचायत समिती गण होते. मात्र शिराळा येथे नवीन नगरपंचायत झाल्याने एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गण कमी झाले आहेत. यामुळे २0११ च्या गणनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी १ लाख ४७ हजार २४६ लोकसंख्या आहे. आणखी तीन हजारच्या वर मतदार संख्या असती, तर आहे तसे ५ जिल्हा परिषद गट राहिले असते. एक जिल्हा परिषद व दोन पंचायत समिती गण कमी झाल्याने राजकीय नेत्यांत वातावरण गरम झाले आहे. शिराळा वगळून आहे तसे ५ जिल्हा परिषद गट व १0 पंचायत समिती गण असावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याचबरोबर शिराळा गटातील गावांचा कोणत्या मतदारसंघात समावेश होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या ५ पैकी ४ जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँग्रेसचे, तर एक भाजपचा (जुन्या आमदार शिवाजीराव नाईक गटाचा) आहे. तसेच सर्व १0 पंचायत समिती सदस्य काँग्रेस आघाडीचे आहेत.शिराळा जिल्हा परिषद गट कमी झाल्याने सागाव मतदार संघाचा आता मांगले जिल्हा परिषद गट झाला आहे. तसेच आरळाऐवजी पणुंब्रे तर्फ वारूण हा गट झाला आहे. तसेच गणामध्ये आरळाऐवजी पणुंब्रे तर्फ वारूण, येळापूरऐवजी कणदूर, शिराळाऐवजी तासगाव असे फरक झाले आहेत. या सर्व गट-गणांवरील गावांचा समावेश आहे. फरक होण्याची शक्यता आहे. शिराळा गटातील १९ गावांपैकी रेड व खेड ही गावे पाचुंब्री मतदारसंघात म्हणजे वाकुर्डे बुद्रुक गटामध्ये समाविष्ट होतील, तर उर्वरित मांगले, देववाडी, इंग्रुळ, कापरी, लादेवाडी, जांभळेवाडी, चिखलवाडी, फकीरवाडी, ही गावे मांगले जिल्हा परिषद गट व मांगले पंचायत समिती गणामध्ये समाविष्ट होणार आहेत. त्याचबरोबर काही आरळा गटाचे पणुंब्रे तर्फ वारूणमध्ये, तसेच कणदूर, पणुंब्रे तर्फ वारूण हे गण झाल्याने काही गावांचा समावेश बदलण्याची शक्यता आहे. या बदलामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. प्रत्येक गण व गटामध्ये मोठे फेरबदल होणार आहेत.भौगोलिक सलगता आणि लोकसंख्या या निकषावर या प्रभाग रचना होत आहेत, त्यामुळे याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी २0 आॅक्टोबरपर्यंत आहे. या सर्व गण, गटाची अंतिम रचना १७ आॅक्टोबर रोजी विभागीय आयुक्त यांच्याकडून होणार असून, याबाबतची अधिकृत माहिती २५ नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होणार आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट, गणनिहाय प्रारूप आराखडा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या आराखड्यात काही बदलही होण्याची शक्यता आहे. मात्र एक जिल्हा परिषद व दोन पंचायत समिती प्रभाग कमी झाल्याने राजकीय मंडळींची गोची झाली आहे. तसेच नवीन गावांचा समावेश झाल्याने उमेदवार निवडण्यासाठी नेतेमंडळींना मोठी कसरत करावी लागणार आहे.