शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

सांगलीत ३५ फुटाचा पूर ३० फुटालाच आला, महापालिका अहवालातील धक्कादायक वास्तव समोर

By अविनाश कोळी | Updated: August 6, 2024 17:29 IST

आयुक्तांचे घरच पूरपट्ट्यात

अविनाश कोळीसांगली : नऊ वर्षांत पूरपट्ट्यात टाकलेल्या भरावाने पुराच्या पातळीचे गणितच बिघडवून टाकले आहे. २००५ व २०२४ च्या महापालिकेच्याच दोन अहवालांची तुलना केल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सांगलीतील नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची नऊ वर्षांपूर्वीची पातळी ३५ फुटांची होती. यंदा ३० फुटालाच पाणी वस्त्यांमध्ये शिरले आहे. महापालिका व जिल्हा प्रशासनाने अजूनही यातून धडा घेतला नाही तर पाणीपातळीचे हे गणित नागरिकांच्या जगण्याचे समीकरण बिघडवू शकते.सांगलीत २००५ मध्ये जो महापूर आला त्याने शहरातील नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न अधोरेखीत केला. या महापुरातून ना महापालिकेने धडा घेतला ना जिल्हा प्रशासनाने. आपत्ती व्यवस्थापनाच्या नाटकाचे दरवर्षीचे प्रयोग करण्यातच प्रशासकीय यंत्रणा धन्यता मानत राहिली. महापालिकेच्या सभेत झालेले ठराव रद्द करून पूरपट्ट्यात मुक्तहस्ते रेखांकने मंजूर करण्यात आली. त्याच अधारावर पूरपट्ट्यात परवाने अडविण्याचा अधिकारच महापालिकेने गमावला. नऊ वर्षांपूर्वी केवळ नाले गिळंकृत केले होते, मात्र त्यानंतरच्या काळात पुराच्या पाण्याला पोटात साठवून ठेवणारे ओतही महापालिकेने विकले. त्यामुळे दरवर्षी पुराचा धोका वाढत गेला.२०१९च्या महापुराने पूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढून ६० टक्के सांगलीकरांना स्थलांतरित होण्यास भाग पाडले. तरीही प्रशासकीय कुंभकर्ण जागा झाला नाही. आता कृष्णा नदी रौद्ररूप धारण करून कमी पातळीतच नागरी वस्त्यात शिरत असल्याचे दिसत आहे.

पाणीपातळीचे बिघडलेले गणित असे..पाणीपातळी २००५ -  २०२४३० फूट -  सूर्यवंशी प्लॉट३४ फूट - जामवाडी, इनामदार प्लॉट, कर्नाळ रस्ता पूर्व बाजू३५ फूट - सूर्यवंशी प्लाॅट शिवमंदिर परिसर, काकानगरसमोरील वस्ती, कर्नाळ रस्ता बंद इनामदार प्लॉट४० फूट - कर्नाळ रस्ता बंद काकानगर, जुना बुधगाव रस्ता बंद

कशामुळे वाढला धोका

कसबे सांगलीच्या नकाशात पूर्वी १६ नाले स्पष्टपणे दाखविण्यात आले. सध्या यातील दोनच नाले शिल्लक आहेत. याशिवाय बायपास रस्त्यावर तीन मोठे ओत होते. ते ओत गायब झाले आहेत. कोल्हापूर रोडवरील ओतही अतिक्रमणांनी भरले आहेत. या सर्वांमुळे कमी पाणीपातळीलाही पूर येत आहे. भविष्यात तो ३० फुटाखाली पाणी असतानाही पूर आला तरीही आश्चर्य वाटणार नाही.

आयुक्तांचे घरच पूरपट्ट्यातमहापालिका आयुक्तांचे घरच पूरपट्ट्यात वसल्याने अन्य बांधकामांवर कारवाईचा अधिकार त्यांना उरलेला नाही. गेल्या काही वर्षांत आयुक्तांच्या बंगल्याकडे बोट दाखवूनच पूरपट्ट्यात हॉटेल्स्, गॅरेज, दुकाने, रुग्णालये अशा गोष्टींसह नागरी वस्त्यांत परवानग्या मिळविण्यात आल्या.

निळी रेषा कशाला आखायची?अतिक्रमणे किंवा नव्याने बांधकामे होऊ नयेत म्हणून निळी रेषा म्हणजेच पूरपट्टा तयार केला जातो. ही रेषा तयार करूनही बांधकामे होत असतील तर रेषा तयार करण्याची आवश्यकताच काय आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर