शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

गतवर्षी जादा पाऊस, तरीही यंदा सांगलीत पाणीटंचाईचे ढग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 12:21 IST

३८३ गावांत उपाययोजनांची गरज

सांगली : गतवर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा तब्बल १६४ टक्के जादा पावसाची नोंद झाली, तरीही यंदा टंचाईचे ढग घोंगावू लागले आहेत. जिल्हा परिषदेने तयार केलेल्या टंचाई आराखड्यानुसार निम्मा जिल्हा टंचाईच्या छायेखाली आहे.७०० पैकी ३८३ गावांत टंचाईच्या उपाययोजना करावी लागू शकतात असा जिल्हा परिषदेचा अंदाज आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ५९ कोटी रुपयांचा टंचाई निवारण आराखडा तयार केला आहे. टँकरने तसेच, विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव आहे. २०२३ मध्ये ३२ टक्के पाऊस कमी झाल्याने डिसेंबरपासूनच जतमध्ये टंचाई स्थिती होती. एप्रिल-मे २०२४ मध्ये सुमारे १०० हून अधिक टँकरने जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि तासगाव या तालुक्यांत पाणीपुरवठा करावा लागला होता.गतवर्षी जतमध्ये १३० टक्के, खानापूरमध्ये १४० टक्के आणि कडेगावमध्ये १४३ टक्के पाऊस झाला. अन्य तालुक्यांत १७५ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे कोयना धरणात सध्या ७८.३८ टीएमसी, तर वारणा धरणात २५.३१ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात टंचाई स्थिती निर्माण झाल्यास धरणांतून पाणीपुरवठा होऊ शकतो. सध्या जतमध्ये सर्वांत कमी म्हणजे २९ टक्के पाणीसाठा आहे. तेथे मार्चपर्यंत टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या सुमारास शिराळा, मिरज, खानापूर, कडेगावमध्ये टंचाई वाढण्याचा अंदाज आहे.

मार्चअखेर पाणीपुरवठ्यासाठी १५५ गावांना ७२ टँकर तसेच ११९ विहिरी अधिग्रहित कराव्या लागू शकतात. ऐन उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल ते जूनअखेर ही संख्या वाढून ३८३ गावांना १८७ टँकर आणि २३४ विहीर अधिग्रहित करून पाणी द्यावे लागण्याची चिन्हे आहेत. यासाठी सुमारे पावणेतेरा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सिंचन योजना सुरू कराव्या लागल्यास वीजबिलांपोटी ३० कोटी रुपयांचा खर्च गृहीत धरला आहे.

जतमध्ये सर्वाधिक होरपळएप्रिल ते जूनमधील सर्वाधिक होरपळ जत तालुक्यात होण्याची चिन्हे आहेत. ८७ गावांना टँकरची गरज भासू शकते. मिरजेत ३८, खानापुरात ११, शिराळा आणि आटपाडीत प्रत्येकी ७, कडेगावमध्ये पाच, तर कवठेमहांकाळ आणि तासगावमध्ये प्रत्येकी एका गावाला टँकरची गरज लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी