शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू तरीही जिल्ह्यात एसटीच्या २३०० फेऱ्या रद्दच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST

राज्य शासनाने नववी ते बारावी आणि आता पाचवी ते आठवी असे वर्ग सुरू केले आहेत. ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांची वर्गातील ...

राज्य शासनाने नववी ते बारावी आणि आता पाचवी ते आठवी असे वर्ग सुरू केले आहेत. ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती जवळपास ७२ टक्केपर्यंत आहे. शहरातच ५२ टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जाण्यासाठी एसटीचा एकमेव आधार आहे; पण सध्या कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतरही जिल्ह्यातील बसच्या दोन हजार ३०० फेऱ्या बंदच आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

चौकट

तीन गावांकडे एसटी फिरकलीच नाही

आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी, माळेवाडी, हितवड या गावांमध्ये कोरोनापूर्वी एसटी येत होती. त्यामुळे या गावातील विद्यार्थ्यांना आटपाडी, करगणी येथे शाळा, कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जाण्याची सोय होती; परंतु सध्या येथे येणारी एसटी बंद झाल्यामुळे येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी बस सुरू करण्याची एसटी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

चौकट

शाळा सुरू संख्या : १४८३

चौकट

पहिली ते आठवी : १२१५२०

नववी ते बारावी : १५५४२१

कोट

कोरोनापूर्वी ५ हजार ५०० बसच्या फेऱ्या होत होत्या. त्यापैकी सध्या ३ हजार २०० फेऱ्या सुरू झाल्या आहेत. २ हजार ३०० फेऱ्या होत नाहीत. मुंबईला गेलेल्या ५० बस आल्यानंतर सर्व मार्गावर बस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी मार्गावरील बसची वाहतूक सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली आहे.

-आलम देसाई, प्रभारी विभागीय वाहतूक अधिकारी.

कोट

मी कॉलेजला तासगावला जातो. पूर्वी कॉलेजच्या वेळेत तीन ते चार बस होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत नव्हती; पण सध्या एक बस असूनही तीही कॉलेजच्या वेळेत नसल्यामुळे दोन तास लवकर जावे लागते. माझ्याप्रमाणे अन्य विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत आहे.

-प्रमोद पाटील, विद्यार्थी.

चौकट

कोरोनात ४४ बसच्या झाल्या मालगाड्या

कोरोनापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये एसटीकडे ९०४ बस होत्या. त्यापैकी कोरोनात बस वाहतूक थांबल्यामुळे ४४ बसच्या माल वाहतूक गाड्या तयार केल्या आहेत. तसेच १०० कालबाह्य बस स्क्रॅप केल्या आहेत. सध्या मुंबईची लोकल बंद असल्यामुळे ५० बस आणि शंभर चालक, शंभर वाहक आजही मुंबईकरांच्या सेवेसाठी आहेत. यामुळे सध्या जिल्ह्यातील दहा आगारांकडे केवळ ७१० बस कार्यरत आहेत. बसची संख्या कमी असल्यामुळे दोन हजार ३०० फेऱ्या एसटी प्रशासनास रद्द कराव्या लागत आहेत.