शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
2
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
4
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
5
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
6
₹२००० नं महाग झालं सोनं, चांदीच्या दरातही ३ हजारांपेक्षा अधिक वाढ; अजून किती वाढ होणार?
7
प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?
8
'या' सरकारी App द्वारे ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार! 'या' राज्यांमध्ये सुविधा सुरू
9
यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली दिल्ली स्फोटाची ‘लाइव्ह’ घटना, पाहा धक्कादायक व्हिडिओ...
10
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
11
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
12
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
13
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
14
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
15
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
16
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
17
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
18
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
19
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
20
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग

पावसाळ्यातही जिल्ह्यात २२१ टँकर सुरू - : साडेचार लाख लोकांना झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 23:49 IST

मान्सूनपूर्व पावसाचा जोर नसल्यामुळे आणि मान्सूनचे आगमन लांबल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. सध्या पावसाळा असतानाही जिल्ह्यातील १८५ गावांसह १३०० वाड्या-वस्त्यांवरील चार लाख ३२ हजार लोकसंख्येला २२१ टँकरने पाणीपुरवठा केला जात

ठळक मुद्देमान्सून लांबल्यामुळे तीव्रता वाढली; दुष्काळी तालुक्यांमध्ये चाराटंचाई

सांगली : मान्सूनपूर्व पावसाचा जोर नसल्यामुळे आणि मान्सूनचे आगमन लांबल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. सध्या पावसाळा असतानाही जिल्ह्यातील १८५ गावांसह १३०० वाड्या-वस्त्यांवरील चार लाख ३२ हजार लोकसंख्येला २२१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळी तालुक्यांत मान्सूनपूर्व पाऊस झाला नसल्यामुळे चाराटंचाईही निर्माण झाली आहे. टँकर व चारा छावण्यांवरच सारी भिस्त आहे.

जिल्ह्यातील बहुतांशी भागाकडे पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या पाणीटंचाईने जिल्ह्यातील बहुतांश गावांवर दुष्काळाची छाया गडद झाली आहे. पाण्याअभावी दुष्काळी तालुक्यांत पेरणीपूर्व मशागत आणि पेरणीही झालेली नाही. दरवर्षी दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यात उन्हाळी पाऊस आणि मान्सूनपूर्व पाऊस बऱ्यापैकी होतो. पण, यावर्षी उन्हाळी एकही पाऊस झाला नाही. मान्सूनपूर्व पावसावरच शेतकरी खरीप पेरणी करत असतो. परंतु, यावर्षी उन्हाळी आणि मान्सूनपूर्व पाऊस झाले नसल्यामुळे चिंता वाढली आहे. खरीप पेरणीचा कालावधी संपत आला तरीही मान्सूनचा जोर दिसत नाही. शिराळ्यात सर्वाधिक पाऊस होतो, मात्र तेथेही अद्याप पावसाचा जोर नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. राज्य शासनाने मागीलवर्षी टँकरमुक्त जिल्हा म्हणून घोषित केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेमुळेच जिल्हा टँकरमुक्त झाल्याची चर्चा होती.

पण, दुसºयाचवर्षी टँकरमुक्त जिल्ह्यातील १८५ गावे आणि १३०० वाड्या-वस्त्यांना ऐन पावसाळ्यात टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यातील अनेक गावांमधील विहिरी, कूपनलिका कोरड्या ठणठणीत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महिला व लहान मुलांची भटकंती सुरू आहे.शिल्लक साठा : सहा टक्केचजिल्ह्यामध्ये लहान आणि मोठे असे ८४ पाझर तलाव असून त्यामध्ये ९४४०.२० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता आहे. यापैकी सध्या या पाझर तलावांमध्ये केवळ ४३३.०९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. तो केवळ सहा टक्केच आहे, असा अहवाल सांगली पाटबंधारे विभागाचा आहे. जिल्ह्यातील एकाच तलावामध्ये ७५ टक्के पाणीसाठा असून ५० टक्के पाणीसाठा ९, तर २५ टक्के पाणीसाठा १७ पाझर तलावांमध्ये आहे. पावसाळ्यातही २६ पाझर तलाव कोरडे ठणठणीत पडले असून, ३१ पाझर तलावांमधील पाणीसाठा मृतसंचय पातळीच्या खाली आहे. ही परिस्थिती मान्सूनचा जोरदार पाऊसच बदलू शकणार आहे.

जिल्ह्यातील २२१ टँकरच्या १८५ गावांसह तेराशे वस्त्यांवर रोज ६४१ खेपा होणे अपेक्षित आहे. पण, नियोजनाअभावी टँकरच्या ६८ खेपा कमी-जास्त असल्याचे खुद्द शासकीय अहवालातच नमूद आहे. पिण्याच्या पाणी टँकरच्या खेपा कमी-जास्त असल्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबद्दल नागरिकांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही.जिल्ह्यात टँकरची सद्यस्थिती...तालुका टँकर गावे वाड्या-वस्त्या लोकसंख्याजत ११९ ९७ ७२४ २३३५२२क़ महांकाळ २५ ३० १४१ ४७८६१तासगाव १९ १८ १५१ ४५५४९मिरज ६ ८ ३८ २७९७२खानापूर १४ १७ १८ २७६०८आटपाडी ३७ १४ २२८ ४९७२२शिराळा १ १ ० ५४५एकूण २२१ १८५ १३०० ४३२७७९६८ खेपा कमी

टॅग्स :Sangliसांगलीwater shortageपाणीटंचाई