शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

पावसाळ्यातही जिल्ह्यात २२१ टँकर सुरू - : साडेचार लाख लोकांना झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 23:49 IST

मान्सूनपूर्व पावसाचा जोर नसल्यामुळे आणि मान्सूनचे आगमन लांबल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. सध्या पावसाळा असतानाही जिल्ह्यातील १८५ गावांसह १३०० वाड्या-वस्त्यांवरील चार लाख ३२ हजार लोकसंख्येला २२१ टँकरने पाणीपुरवठा केला जात

ठळक मुद्देमान्सून लांबल्यामुळे तीव्रता वाढली; दुष्काळी तालुक्यांमध्ये चाराटंचाई

सांगली : मान्सूनपूर्व पावसाचा जोर नसल्यामुळे आणि मान्सूनचे आगमन लांबल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. सध्या पावसाळा असतानाही जिल्ह्यातील १८५ गावांसह १३०० वाड्या-वस्त्यांवरील चार लाख ३२ हजार लोकसंख्येला २२१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळी तालुक्यांत मान्सूनपूर्व पाऊस झाला नसल्यामुळे चाराटंचाईही निर्माण झाली आहे. टँकर व चारा छावण्यांवरच सारी भिस्त आहे.

जिल्ह्यातील बहुतांशी भागाकडे पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या पाणीटंचाईने जिल्ह्यातील बहुतांश गावांवर दुष्काळाची छाया गडद झाली आहे. पाण्याअभावी दुष्काळी तालुक्यांत पेरणीपूर्व मशागत आणि पेरणीही झालेली नाही. दरवर्षी दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यात उन्हाळी पाऊस आणि मान्सूनपूर्व पाऊस बऱ्यापैकी होतो. पण, यावर्षी उन्हाळी एकही पाऊस झाला नाही. मान्सूनपूर्व पावसावरच शेतकरी खरीप पेरणी करत असतो. परंतु, यावर्षी उन्हाळी आणि मान्सूनपूर्व पाऊस झाले नसल्यामुळे चिंता वाढली आहे. खरीप पेरणीचा कालावधी संपत आला तरीही मान्सूनचा जोर दिसत नाही. शिराळ्यात सर्वाधिक पाऊस होतो, मात्र तेथेही अद्याप पावसाचा जोर नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. राज्य शासनाने मागीलवर्षी टँकरमुक्त जिल्हा म्हणून घोषित केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेमुळेच जिल्हा टँकरमुक्त झाल्याची चर्चा होती.

पण, दुसºयाचवर्षी टँकरमुक्त जिल्ह्यातील १८५ गावे आणि १३०० वाड्या-वस्त्यांना ऐन पावसाळ्यात टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यातील अनेक गावांमधील विहिरी, कूपनलिका कोरड्या ठणठणीत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महिला व लहान मुलांची भटकंती सुरू आहे.शिल्लक साठा : सहा टक्केचजिल्ह्यामध्ये लहान आणि मोठे असे ८४ पाझर तलाव असून त्यामध्ये ९४४०.२० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता आहे. यापैकी सध्या या पाझर तलावांमध्ये केवळ ४३३.०९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. तो केवळ सहा टक्केच आहे, असा अहवाल सांगली पाटबंधारे विभागाचा आहे. जिल्ह्यातील एकाच तलावामध्ये ७५ टक्के पाणीसाठा असून ५० टक्के पाणीसाठा ९, तर २५ टक्के पाणीसाठा १७ पाझर तलावांमध्ये आहे. पावसाळ्यातही २६ पाझर तलाव कोरडे ठणठणीत पडले असून, ३१ पाझर तलावांमधील पाणीसाठा मृतसंचय पातळीच्या खाली आहे. ही परिस्थिती मान्सूनचा जोरदार पाऊसच बदलू शकणार आहे.

जिल्ह्यातील २२१ टँकरच्या १८५ गावांसह तेराशे वस्त्यांवर रोज ६४१ खेपा होणे अपेक्षित आहे. पण, नियोजनाअभावी टँकरच्या ६८ खेपा कमी-जास्त असल्याचे खुद्द शासकीय अहवालातच नमूद आहे. पिण्याच्या पाणी टँकरच्या खेपा कमी-जास्त असल्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबद्दल नागरिकांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही.जिल्ह्यात टँकरची सद्यस्थिती...तालुका टँकर गावे वाड्या-वस्त्या लोकसंख्याजत ११९ ९७ ७२४ २३३५२२क़ महांकाळ २५ ३० १४१ ४७८६१तासगाव १९ १८ १५१ ४५५४९मिरज ६ ८ ३८ २७९७२खानापूर १४ १७ १८ २७६०८आटपाडी ३७ १४ २२८ ४९७२२शिराळा १ १ ० ५४५एकूण २२१ १८५ १३०० ४३२७७९६८ खेपा कमी

टॅग्स :Sangliसांगलीwater shortageपाणीटंचाई