शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यातही जिल्ह्यात २२१ टँकर सुरू - : साडेचार लाख लोकांना झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 23:49 IST

मान्सूनपूर्व पावसाचा जोर नसल्यामुळे आणि मान्सूनचे आगमन लांबल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. सध्या पावसाळा असतानाही जिल्ह्यातील १८५ गावांसह १३०० वाड्या-वस्त्यांवरील चार लाख ३२ हजार लोकसंख्येला २२१ टँकरने पाणीपुरवठा केला जात

ठळक मुद्देमान्सून लांबल्यामुळे तीव्रता वाढली; दुष्काळी तालुक्यांमध्ये चाराटंचाई

सांगली : मान्सूनपूर्व पावसाचा जोर नसल्यामुळे आणि मान्सूनचे आगमन लांबल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. सध्या पावसाळा असतानाही जिल्ह्यातील १८५ गावांसह १३०० वाड्या-वस्त्यांवरील चार लाख ३२ हजार लोकसंख्येला २२१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दुष्काळी तालुक्यांत मान्सूनपूर्व पाऊस झाला नसल्यामुळे चाराटंचाईही निर्माण झाली आहे. टँकर व चारा छावण्यांवरच सारी भिस्त आहे.

जिल्ह्यातील बहुतांशी भागाकडे पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या पाणीटंचाईने जिल्ह्यातील बहुतांश गावांवर दुष्काळाची छाया गडद झाली आहे. पाण्याअभावी दुष्काळी तालुक्यांत पेरणीपूर्व मशागत आणि पेरणीही झालेली नाही. दरवर्षी दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यात उन्हाळी पाऊस आणि मान्सूनपूर्व पाऊस बऱ्यापैकी होतो. पण, यावर्षी उन्हाळी एकही पाऊस झाला नाही. मान्सूनपूर्व पावसावरच शेतकरी खरीप पेरणी करत असतो. परंतु, यावर्षी उन्हाळी आणि मान्सूनपूर्व पाऊस झाले नसल्यामुळे चिंता वाढली आहे. खरीप पेरणीचा कालावधी संपत आला तरीही मान्सूनचा जोर दिसत नाही. शिराळ्यात सर्वाधिक पाऊस होतो, मात्र तेथेही अद्याप पावसाचा जोर नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. राज्य शासनाने मागीलवर्षी टँकरमुक्त जिल्हा म्हणून घोषित केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेमुळेच जिल्हा टँकरमुक्त झाल्याची चर्चा होती.

पण, दुसºयाचवर्षी टँकरमुक्त जिल्ह्यातील १८५ गावे आणि १३०० वाड्या-वस्त्यांना ऐन पावसाळ्यात टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यातील अनेक गावांमधील विहिरी, कूपनलिका कोरड्या ठणठणीत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महिला व लहान मुलांची भटकंती सुरू आहे.शिल्लक साठा : सहा टक्केचजिल्ह्यामध्ये लहान आणि मोठे असे ८४ पाझर तलाव असून त्यामध्ये ९४४०.२० दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची क्षमता आहे. यापैकी सध्या या पाझर तलावांमध्ये केवळ ४३३.०९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. तो केवळ सहा टक्केच आहे, असा अहवाल सांगली पाटबंधारे विभागाचा आहे. जिल्ह्यातील एकाच तलावामध्ये ७५ टक्के पाणीसाठा असून ५० टक्के पाणीसाठा ९, तर २५ टक्के पाणीसाठा १७ पाझर तलावांमध्ये आहे. पावसाळ्यातही २६ पाझर तलाव कोरडे ठणठणीत पडले असून, ३१ पाझर तलावांमधील पाणीसाठा मृतसंचय पातळीच्या खाली आहे. ही परिस्थिती मान्सूनचा जोरदार पाऊसच बदलू शकणार आहे.

जिल्ह्यातील २२१ टँकरच्या १८५ गावांसह तेराशे वस्त्यांवर रोज ६४१ खेपा होणे अपेक्षित आहे. पण, नियोजनाअभावी टँकरच्या ६८ खेपा कमी-जास्त असल्याचे खुद्द शासकीय अहवालातच नमूद आहे. पिण्याच्या पाणी टँकरच्या खेपा कमी-जास्त असल्यामुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबद्दल नागरिकांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही.जिल्ह्यात टँकरची सद्यस्थिती...तालुका टँकर गावे वाड्या-वस्त्या लोकसंख्याजत ११९ ९७ ७२४ २३३५२२क़ महांकाळ २५ ३० १४१ ४७८६१तासगाव १९ १८ १५१ ४५५४९मिरज ६ ८ ३८ २७९७२खानापूर १४ १७ १८ २७६०८आटपाडी ३७ १४ २२८ ४९७२२शिराळा १ १ ० ५४५एकूण २२१ १८५ १३०० ४३२७७९६८ खेपा कमी

टॅग्स :Sangliसांगलीwater shortageपाणीटंचाई