शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

पाण्याअभावी द्राक्षबागांच्या खरड छाटण्या रखडल्या -: जत तालुक्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:46 PM

जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, कूपनलिका, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे पूर्व भागातील ४० टक्के द्राक्षबागांची खरड छाटणीची कामे पुरेसे पाणी उपलब्ध

ठळक मुद्दे अवकाळी पावसाची दडी; आर्थिक फटका

गजानन पाटील ।संख : जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, कूपनलिका, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे पूर्व भागातील ४० टक्के द्राक्षबागांची खरड छाटणीची कामे पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने रखडली आहेत. परिणामी यावर्षी द्राक्ष उत्पादनात घट होणार असून बागायतदार आर्थिक अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.

तालुक्यात ५ हजार हेक्टर क्षेत्रावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड अशा फोंड्या माळरानावर शेतकऱ्यांनी द्राक्षबागा उभ्या केल्या आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: शेततळी बांधून द्राक्षबागा जगविण्याची धडपड शेतकरी करत आहे. बागांची खरड छाटणी घेऊन मे महिन्यात काडी तयार करावी लागते. पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही, तर काडी अपरिपक्व तयार होणे, तसेच त्यांच्या गर्भधारणेवर परिणाम होतो. यामुळे पुढे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण होतो. पाणीच नसल्याने खरड छाटणी झालेली नाही.

मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शेतकरी द्राक्ष बागांना टँकरने पाणी घालत आहेत. परंतु टँकर भरण्याला सुद्धा पाणी मिळेनासे झाले आहे. त्याचेही दर वाढल्याने टँकरचे पाणी परवडत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.मजुरांना रोजगार : नाहीद्राक्षबागेसाठी दरवर्षी मे महिन्यात छाटणी करणे, खुडा काढणे, पेस्ट लावणे, डॉरमिक्स लावणे, बेदाणा शेडला टाकणे, बेदाणा झाडणे व इतर कामांसाठी मजुरांची आवश्यकता असते. मजुरांना रोजगाराची संधी मिळते. मजुरीही जास्त मिळते. पण यावर्षी पाण्याअभावी खरड छाटणी झाली नाही. त्यामुळे मजुरांना रोजगार नाही. 

पाणीच नसल्याने खरड छाटणी झालेली नाही. पाण्याविना बागा वाळून जाणार आहेत. शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. शासनाने कर्जमाफी करावी, कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करावे, अशी आमची मागणी आहे.- ओग्याप्पा तोदलबागी, भिवर्गीजत पूर्व भागातील द्राक्षबागांची पाण्याअभावी खरड छाटणी झालेली नाही. फक्त खोड आहेत.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी