शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

विघ्नहर्त्याच्या मूर्तिकामास कायदेशीर वादामुळे विघ्न, गणेशमूर्तींची कामे अद्याप सुरू नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 17:02 IST

न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागणार

सदानंद औंधेमिरज : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जलप्रदूषणाच्या कारणावरून प्लास्टर (पीओपी) गणेशमूर्तीवर बंदी घातल्याने हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. गणेशोत्सव तीन महिन्यांवर आला तरी पीओपीवर बंदीमुळे मिरजेत मोठ्या गणेशमूर्तीची कामेच अद्याप सुरू झाली नाहीत. या बंदीमुळे मूर्तिकार, कामगार यांच्या हाताला काम नसल्याने शेकडो कुटुंबे बेरोजगार होण्याची भीती आहे.

पीओपी मूर्तीवर बंदी घालून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा निर्णय शासनाच्या समितीने घेतल्याने हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. मिरजेत सुमारे ५० हजार घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना व सुमारे चारशे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे उंच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतात.

दरवर्षी गणेशोत्सव संपल्यानंतर लगेच मूर्तिकामास सुरुवात होते. मात्र, यावर्षी पीओपीवर बंदीचा निर्णय झाला नसल्याने अद्याप मोठ्या मूर्तीची कामे सुरू झालेली नाहीत. आता पुढील महिन्यात दि. ९ जून रोजी याबाबत सुनावणी होणार आहे. जूनमध्ये पावसाळ्यात हा निर्णय झाल्यास दोन महिन्यांत मोठ्या मूर्ती तयार कशा करायच्या हा मूर्तिकरांसमोर प्रश्न आहे.

पीओपीच्या मूर्ती जगभरात जातात. जगात कुठेही पीओपीला बंदी नाही. मग ती महाराष्ट्रातच का? असा मूर्तिकारांचा सवाल आहे. मूर्तीची उंची जास्त नसावी, या सूचनेलाही गणेश मंडळांचा विरोध आहे. मूर्ती किती उंच असावी, याचा निर्णय घेण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. राज्यात ९५ टक्के गणेशमूर्ती या पीओपीपासून बनवल्या जातात. पीओपी जर घातक असेल तर ते संपूर्ण का बंद होत नाही? फक्त गणेशमूर्ती, दुर्गा देवींच्या मूर्तीवरच बंद का? कृत्रिम तलावांची व्यवस्था हा उपाय राबवावा, असेही काही मंडळाचे म्हणणे आहे.

न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागणारप्लास्टरच्या मूर्ती या मजबूत व तुलनेने शाडूच्या मूर्ती ठिसूळ असतात. शाडूच्या मूर्तीना तडे जातात, मूर्ती जड असल्याने मोठ्या उंचीच्या मूर्ती टिकणार नाहीत, अशी भौती असते. शाडूची मूर्ती वाळायला वेळ लागतो, मूर्ती महाग असते. मात्र, शाडू व पीओपी याबाबत न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य करावा लागेल, असे मूर्तिकार गजानन सलगर यांनी सांगितले.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२० मध्ये पीओपी गणेशमूर्तीच्या बंदीबाबत सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. त्यावेळी पीओपी मूर्तिकारांच्या अडचणी जाणून घेऊन मार्गदर्शक तत्त्वांत बदल करण्याच्या सूचना केंद्राला कराव्या, अशी मागणी गणेशोत्सव मंडळांनी केली होती. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. - गजेंद्र कुल्लोळी, अध्यक्ष, शनिवार, पेठ गणेश मंडळ

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Courtन्यायालय