शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

विघ्नहर्त्याच्या मूर्तिकामास कायदेशीर वादामुळे विघ्न, गणेशमूर्तींची कामे अद्याप सुरू नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 17:02 IST

न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागणार

सदानंद औंधेमिरज : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जलप्रदूषणाच्या कारणावरून प्लास्टर (पीओपी) गणेशमूर्तीवर बंदी घातल्याने हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. गणेशोत्सव तीन महिन्यांवर आला तरी पीओपीवर बंदीमुळे मिरजेत मोठ्या गणेशमूर्तीची कामेच अद्याप सुरू झाली नाहीत. या बंदीमुळे मूर्तिकार, कामगार यांच्या हाताला काम नसल्याने शेकडो कुटुंबे बेरोजगार होण्याची भीती आहे.

पीओपी मूर्तीवर बंदी घालून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा निर्णय शासनाच्या समितीने घेतल्याने हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. मिरजेत सुमारे ५० हजार घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना व सुमारे चारशे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे उंच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतात.

दरवर्षी गणेशोत्सव संपल्यानंतर लगेच मूर्तिकामास सुरुवात होते. मात्र, यावर्षी पीओपीवर बंदीचा निर्णय झाला नसल्याने अद्याप मोठ्या मूर्तीची कामे सुरू झालेली नाहीत. आता पुढील महिन्यात दि. ९ जून रोजी याबाबत सुनावणी होणार आहे. जूनमध्ये पावसाळ्यात हा निर्णय झाल्यास दोन महिन्यांत मोठ्या मूर्ती तयार कशा करायच्या हा मूर्तिकरांसमोर प्रश्न आहे.

पीओपीच्या मूर्ती जगभरात जातात. जगात कुठेही पीओपीला बंदी नाही. मग ती महाराष्ट्रातच का? असा मूर्तिकारांचा सवाल आहे. मूर्तीची उंची जास्त नसावी, या सूचनेलाही गणेश मंडळांचा विरोध आहे. मूर्ती किती उंच असावी, याचा निर्णय घेण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. राज्यात ९५ टक्के गणेशमूर्ती या पीओपीपासून बनवल्या जातात. पीओपी जर घातक असेल तर ते संपूर्ण का बंद होत नाही? फक्त गणेशमूर्ती, दुर्गा देवींच्या मूर्तीवरच बंद का? कृत्रिम तलावांची व्यवस्था हा उपाय राबवावा, असेही काही मंडळाचे म्हणणे आहे.

न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागणारप्लास्टरच्या मूर्ती या मजबूत व तुलनेने शाडूच्या मूर्ती ठिसूळ असतात. शाडूच्या मूर्तीना तडे जातात, मूर्ती जड असल्याने मोठ्या उंचीच्या मूर्ती टिकणार नाहीत, अशी भौती असते. शाडूची मूर्ती वाळायला वेळ लागतो, मूर्ती महाग असते. मात्र, शाडू व पीओपी याबाबत न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य करावा लागेल, असे मूर्तिकार गजानन सलगर यांनी सांगितले.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२० मध्ये पीओपी गणेशमूर्तीच्या बंदीबाबत सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. त्यावेळी पीओपी मूर्तिकारांच्या अडचणी जाणून घेऊन मार्गदर्शक तत्त्वांत बदल करण्याच्या सूचना केंद्राला कराव्या, अशी मागणी गणेशोत्सव मंडळांनी केली होती. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. - गजेंद्र कुल्लोळी, अध्यक्ष, शनिवार, पेठ गणेश मंडळ

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Courtन्यायालय