शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
3
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
4
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
7
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
8
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
9
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
10
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
11
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
12
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
13
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
14
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
15
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
16
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
17
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
18
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
19
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
20
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

विघ्नहर्त्याच्या मूर्तिकामास कायदेशीर वादामुळे विघ्न, गणेशमूर्तींची कामे अद्याप सुरू नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 17:02 IST

न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागणार

सदानंद औंधेमिरज : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जलप्रदूषणाच्या कारणावरून प्लास्टर (पीओपी) गणेशमूर्तीवर बंदी घातल्याने हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. गणेशोत्सव तीन महिन्यांवर आला तरी पीओपीवर बंदीमुळे मिरजेत मोठ्या गणेशमूर्तीची कामेच अद्याप सुरू झाली नाहीत. या बंदीमुळे मूर्तिकार, कामगार यांच्या हाताला काम नसल्याने शेकडो कुटुंबे बेरोजगार होण्याची भीती आहे.

पीओपी मूर्तीवर बंदी घालून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा निर्णय शासनाच्या समितीने घेतल्याने हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. मिरजेत सुमारे ५० हजार घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना व सुमारे चारशे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे उंच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतात.

दरवर्षी गणेशोत्सव संपल्यानंतर लगेच मूर्तिकामास सुरुवात होते. मात्र, यावर्षी पीओपीवर बंदीचा निर्णय झाला नसल्याने अद्याप मोठ्या मूर्तीची कामे सुरू झालेली नाहीत. आता पुढील महिन्यात दि. ९ जून रोजी याबाबत सुनावणी होणार आहे. जूनमध्ये पावसाळ्यात हा निर्णय झाल्यास दोन महिन्यांत मोठ्या मूर्ती तयार कशा करायच्या हा मूर्तिकरांसमोर प्रश्न आहे.

पीओपीच्या मूर्ती जगभरात जातात. जगात कुठेही पीओपीला बंदी नाही. मग ती महाराष्ट्रातच का? असा मूर्तिकारांचा सवाल आहे. मूर्तीची उंची जास्त नसावी, या सूचनेलाही गणेश मंडळांचा विरोध आहे. मूर्ती किती उंच असावी, याचा निर्णय घेण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. राज्यात ९५ टक्के गणेशमूर्ती या पीओपीपासून बनवल्या जातात. पीओपी जर घातक असेल तर ते संपूर्ण का बंद होत नाही? फक्त गणेशमूर्ती, दुर्गा देवींच्या मूर्तीवरच बंद का? कृत्रिम तलावांची व्यवस्था हा उपाय राबवावा, असेही काही मंडळाचे म्हणणे आहे.

न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागणारप्लास्टरच्या मूर्ती या मजबूत व तुलनेने शाडूच्या मूर्ती ठिसूळ असतात. शाडूच्या मूर्तीना तडे जातात, मूर्ती जड असल्याने मोठ्या उंचीच्या मूर्ती टिकणार नाहीत, अशी भौती असते. शाडूची मूर्ती वाळायला वेळ लागतो, मूर्ती महाग असते. मात्र, शाडू व पीओपी याबाबत न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य करावा लागेल, असे मूर्तिकार गजानन सलगर यांनी सांगितले.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०२० मध्ये पीओपी गणेशमूर्तीच्या बंदीबाबत सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. त्यावेळी पीओपी मूर्तिकारांच्या अडचणी जाणून घेऊन मार्गदर्शक तत्त्वांत बदल करण्याच्या सूचना केंद्राला कराव्या, अशी मागणी गणेशोत्सव मंडळांनी केली होती. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. - गजेंद्र कुल्लोळी, अध्यक्ष, शनिवार, पेठ गणेश मंडळ

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Courtन्यायालय