शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

डॉपलर रडार नामी, पण पश्चिम महाराष्ट्रासाठी बिनकामी; महापुरावेळी योग्य अलर्टच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 19:14 IST

अतिवृष्टी रोखणे आपल्या हाती नाही, पण धरणांतील पाणीसाठ्याचे नियोजन शास्त्रशुद्धरित्या करणे शक्य

संतोष भिसेसांगली : वर्षाकाठी तीन कोटींचा खर्च असणारे डॉपलर रडार पश्चिम महाराष्ट्रातील महापूरहानी टाळण्यात निरुपयोगी ठरल्याची टीका हवामान अभ्यासक व ढगफुटी तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केली. त्याच्या तंत्रशुद्ध वापराने पूरहानीची तीव्रता टाळणे शक्य असल्याचे ते म्हणाले.

प्रा. जोहरे म्हणाले, आजवरच्या प्रत्येक महापुरावेळी संबंधित जिल्ह्यांच्या महसूल यंत्रणांना योग्य अलर्ट मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अतिवृष्टी रोखणे आपल्या हाती नाही, पण धरणांतील पाणीसाठ्याचे नियोजन शास्त्रशुद्धरित्या करणे शक्य आहे. धरणक्षेत्रातील पावसाची तीव्रता रडारकडून तंतोतंत समजते. धरणात किती पाणी येणार, याचाही तपशील समजतो. त्याद्वारे धरणातून पाणी सोडून महापूर नियंत्रण शक्य आहे. काहीवेळा ४८ तास अगोदर, तर काहीवेळा आठ तास अगोदर रडारकडून माहिती मिळू शकते. महापूर नियंत्रणासाठी हा वेळ पुरेसा ठरतो.प्रा. जोहरे म्हणाले, तंत्रशुद्ध माहितीअभावी महसूल यंत्रणा जीवित आणि वित्तहानी रोखण्यातच गुंतून पडते. जागतिक दर्जाची यंत्रणा असतानाही स्मार्ट वर्क होत नाही. पावसाचे निश्चित विश्लेषण धरण व्यवस्थापनाला मिळाले व त्यानुसार प्रचलन झाले, तर महापूर येणारच नाही, असाही दावा करता येईल.

निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण म्हणाले, धरणांत अनावश्यक पाणी शिल्लक ठेवून सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना महापुरात लोटले जाते. केंद्रीय जल आयोगाने पावसाळ्याच्या प्रत्येक महिन्यात धरणांतील जलसाठ्यांविषयी स्पष्ट निर्देश दिलेत. त्यांचे पालन झाल्यास पुराचे संकट उद्भवणारच नाही. पण धरणांतून पाणी सोडण्याचे धाडस केले जात नाही. पाऊस पडला नाही, तर संकट येईल, अशी भीती बाळगली जाते. आजवरच्या नोंदींनुसार कोयना धरण रिकामे झाल्याचा इतिहास नाही.गेल्या दोन-तीन वर्षांत रडारसारखी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध असतानाही प्रशासनाचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसत नाही. पूरग्रस्त भागासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. नदीला भिंत, बोगदे, पूरग्रस्तांच्या स्थलांतरासाठी इमारती आदी उपायांचा विचार होतो, पण रडारच्या माहितीचे शास्त्रशुद्ध विश्लेषण करून नदीची पातळी नियंत्रित ठेवण्याचा तंत्रशुद्ध विचार होत नाही.

तंत्रज्ञानाचा वापर हेच पूरहानी रोखण्याचे शस्त्र आहे. सुदैवाने ते उपलब्ध आहे. शासनाने थोडाफार खर्च करून तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. महसूल, पाटबंधारे व धरण व्यवस्थापनाशी त्याचा समन्वय ठेवावा. यातून महापुरावर नियंत्रण मिळविणे १०० टक्के शक्य आहे. - सुकुमार पाटील, सदस्य-महापूर नियंत्रण नागरी कृती समिती

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसweatherहवामान