शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांची दुकाने भरण्यासाठी पीकविमा काढायचा काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:27 IST

संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पीकविम्याचे परतावे मिळत नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे, त्यामुळे यावर्षी विम्याचा हप्ता भरण्याविषयी शेतकऱ्यांत ...

संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पीकविम्याचे परतावे मिळत नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे, त्यामुळे यावर्षी विम्याचा हप्ता भरण्याविषयी शेतकऱ्यांत निरुत्साह दिसत आहे. जुलै संपत आला तरी १५ हजार शेतकऱ्यांनीच लाभ घेतला आहे.

शेतकऱ्यांनी विमा घ्यावा यासाठी शासनाने दोन ते तीनवेळा मुदत वाढविली. २३ जुलैची अंतिम मुदत ३० जुलै केली, तरीही पुरेसा प्रतिसाद नाही. विम्याचे हप्ते भरले तरी नुकसान भरपाई देताना कंपन्या फसवेगिरी करतात, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. भरपाई देताना पन्नास त्रुटी काढल्या जातात. भरपाई मिळूच नये यासाठी अडथळे आणले जातात. या स्थितीत कंपन्यांची दुकाने भरण्यासाठी पीकविमा काढायचा काय, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

पॉईंटर्स

जिल्ह्यातील एकूण शेतकरी - ५ लाख ३६ हजार

गेल्या वर्षी विमा काढलेेले शेतकरी - ३७,०००

यावर्षी विमा काढलेले शेतकरी १५,०००

एकूण खरीप क्षेत्र (हेक्टरमध्ये)

भात १७,४००, ज्वारी ५० हजार ६००, बाजरी ५६,०००, मका ३७,१००, सोयाबीन ५९,०००, भुईमूग ३२,२००, ऊस १,०४,२१, तूर ८,२००, मूग ७,७००, उडीद १३,६००.

बॉक्स

यंदा अत्यल्प विमा

यावर्षी शासनाने वारंवार मुदतवाढ देऊनही अवघ्या १५ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. विमा कंपन्यांकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरवली आहे. आजवर विम्यासाठी भरलेले पैसे वाया गेल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

कोट

विमा कंपन्या चुना लावतात

पीकविमा म्हणजे कंपन्यांसाठी शासनाने तयार केलेले कुरण आहे. २०१९ मध्ये विम्याचा हप्ता भरला होता, पण अतिवृष्टीमुळे पीक हातचे गेले. कंपनीने अनेक त्रुटी काढत नुकसान भरपाई नाकारली, त्यामुळे यावर्षी विम्याचा हप्ता भरला नाही.

- महादेव कोरे, शेतकरी, मिरज

पूर आल्यानंतर ७२ तासांच्या आता नुकसानीचे फोटो पाठवावेत असे कंपनी सांगते, पण पुराचे पाणी रानातून १० ते १५ दिवस हटत नाही, हे कंपनीला पटत नाही. भरपाईचा दावा फेटाळला जातो. या स्थितीत विम्यासाठी पैसे न भरलेलेच चांगले ,अशी मानसिकता होते. कंपन्यांचा अनुभव चांगला नाही.

- कमलेश्वर कांबळे, शेतकरी, वड्डी

शेतकरी विम्याचे हप्ते भरत आहेत. पावसात अडकलेल्या शेतकऱ्यांना संधी मिळावी म्हणून अंतिम मुदत वेळोवेळी वाढवली आहे. सध्या ती शुक्रवारपर्यंत (दि. ३०) आहे. शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर अपलोड करण्याचे काम अद्याप सुरू आहे.

- बसवराज मास्तोळी, कृषी अधीक्षक, सांगली.