शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

"‘अलमट्टी’तून दोन लाख विसर्ग करा; तरच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर थांबेल"

By अशोक डोंबाळे | Updated: July 20, 2024 17:41 IST

मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी : स्थानिक प्रशासन निष्क्रिय असल्याची तक्रार

सांगली : सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांसमोर महापुराचे पुन्हा संकट उभे राहिले आहे; मात्र सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. अलमट्टी धरणातून किमान दोन लाख क्युसेक विसर्ग वाढवण्यासाठी कर्नाटक शासनावर दबाव आणा, अशी मागणी कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समिती आणि आंदोलन अंकुश यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शनिवारी केली आहे.मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार आणि आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी म्हटले आहे की, कृष्णा खोऱ्यातील कोयना, वारणा (चांदोली), राधानगरी यासह सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेले काही दिवस तुफान पाऊस सुरू आहे. सर्व धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढतो आहे. तसेच कृष्णा, कोयना, वारणा, तारळी, पंचगंगा या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांचे पाणीही वेगाने वाढत आहे.परिणामी ‘कृष्णा’, ‘वारणा’ आणि ‘पंचगंगा’ या नद्यांच्या काठावरील सांगली, कोल्हापूर, सातारा या सर्व जिल्ह्यांतील शहरे आणि गावांना महापुराचा धोका निर्माण झाला आहे; परंतु सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे स्थानिक प्रशासन तसेच जलसंपदा विभागातर्फे अलमट्टी धरणातील पाणीसाठा कमी करण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यामध्ये नियमबाह्यरीत्या पाणीसाठा केला आहे. वास्तविक अलमट्टी धरणातून तातडीने किमान दोन लाख क्युसेकने विसर्ग वाढवण्याची गरज आहे. तरच महापुरावर नियंत्रण करता येईल; परंतु सांगली व कोल्हापूर जिल्हा प्रशासन; तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. आम्ही आपल्याशी वारंवार संवाद केला. संपर्क साधला. तुम्ही तातडीने त्याची दखल घेऊन महापूर रोखण्यासंदर्भात सांगली व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि दोन्ही जिल्ह्यांतील जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे आदेशही दिले होते. यासंदर्भात आपण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगही घेतली होती. त्यावेळी कर्नाटकातील अलमट्टी आणि हिप्परगा बंधारा येथील पाणीसाठ्यावर लक्ष ठेवा, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या; परंतु त्या सूचनांचे पालन प्रशासनाकडून होताना दिसत नाही. अलमट्टी धरणातून सध्या किमान दोन लाख क्युसेक विसर्ग सुरू झाला पाहिजे, तरच येत्या दहा-बारा दिवसांत येऊ शकणाऱ्या महापुराच्या संकटावर नियंत्रण मिळवता येईल. पावसाचा जोर ३० ऑगस्टपर्यंत राहणार आहे आणि अलमट्टी धरण आताच भरले आहे. अशावेळी कृष्णा खोऱ्यामध्ये महापुराचा १०० टक्के धोका आहे. सांगली व कोल्हापूर जिल्हा प्रशासन, तसेच जलसंपदा विभागांना याबाबत तातडीने हालचाल करण्याचे आदेश द्यावेत. अलमट्टी धरणातून तातडीने विसर्ग वाढविण्याची गरज आहे.

आताच धरणात १०० टीएमसी पाणीसाठाअलमट्टी धरणातील पाणीसाठा जवळजवळ शंभर टीएमसी झाला आहे. तसेच त्या धरणाची पाणीपातळी आताच ५१८ मीटर झाली आहे. वास्तविक ही पाणीपातळी पावसाळा संपताना असायला हवी आहे. ती आताच त्यांनी गाठली आहे. याबद्दल महाराष्ट्राच्या जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी केली.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूरChief Ministerमुख्यमंत्री