शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

"‘अलमट्टी’तून दोन लाख विसर्ग करा; तरच सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूर थांबेल"

By अशोक डोंबाळे | Updated: July 20, 2024 17:41 IST

मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी : स्थानिक प्रशासन निष्क्रिय असल्याची तक्रार

सांगली : सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांसमोर महापुराचे पुन्हा संकट उभे राहिले आहे; मात्र सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. अलमट्टी धरणातून किमान दोन लाख क्युसेक विसर्ग वाढवण्यासाठी कर्नाटक शासनावर दबाव आणा, अशी मागणी कृष्णा नदी महापूर नियंत्रण कृती समिती आणि आंदोलन अंकुश यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शनिवारी केली आहे.मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीचे समन्वयक सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार आणि आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी म्हटले आहे की, कृष्णा खोऱ्यातील कोयना, वारणा (चांदोली), राधानगरी यासह सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेले काही दिवस तुफान पाऊस सुरू आहे. सर्व धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढतो आहे. तसेच कृष्णा, कोयना, वारणा, तारळी, पंचगंगा या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांचे पाणीही वेगाने वाढत आहे.परिणामी ‘कृष्णा’, ‘वारणा’ आणि ‘पंचगंगा’ या नद्यांच्या काठावरील सांगली, कोल्हापूर, सातारा या सर्व जिल्ह्यांतील शहरे आणि गावांना महापुराचा धोका निर्माण झाला आहे; परंतु सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे स्थानिक प्रशासन तसेच जलसंपदा विभागातर्फे अलमट्टी धरणातील पाणीसाठा कमी करण्यासाठी कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्यामध्ये नियमबाह्यरीत्या पाणीसाठा केला आहे. वास्तविक अलमट्टी धरणातून तातडीने किमान दोन लाख क्युसेकने विसर्ग वाढवण्याची गरज आहे. तरच महापुरावर नियंत्रण करता येईल; परंतु सांगली व कोल्हापूर जिल्हा प्रशासन; तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत आहेत. आम्ही आपल्याशी वारंवार संवाद केला. संपर्क साधला. तुम्ही तातडीने त्याची दखल घेऊन महापूर रोखण्यासंदर्भात सांगली व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि दोन्ही जिल्ह्यांतील जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसे आदेशही दिले होते. यासंदर्भात आपण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगही घेतली होती. त्यावेळी कर्नाटकातील अलमट्टी आणि हिप्परगा बंधारा येथील पाणीसाठ्यावर लक्ष ठेवा, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या; परंतु त्या सूचनांचे पालन प्रशासनाकडून होताना दिसत नाही. अलमट्टी धरणातून सध्या किमान दोन लाख क्युसेक विसर्ग सुरू झाला पाहिजे, तरच येत्या दहा-बारा दिवसांत येऊ शकणाऱ्या महापुराच्या संकटावर नियंत्रण मिळवता येईल. पावसाचा जोर ३० ऑगस्टपर्यंत राहणार आहे आणि अलमट्टी धरण आताच भरले आहे. अशावेळी कृष्णा खोऱ्यामध्ये महापुराचा १०० टक्के धोका आहे. सांगली व कोल्हापूर जिल्हा प्रशासन, तसेच जलसंपदा विभागांना याबाबत तातडीने हालचाल करण्याचे आदेश द्यावेत. अलमट्टी धरणातून तातडीने विसर्ग वाढविण्याची गरज आहे.

आताच धरणात १०० टीएमसी पाणीसाठाअलमट्टी धरणातील पाणीसाठा जवळजवळ शंभर टीएमसी झाला आहे. तसेच त्या धरणाची पाणीपातळी आताच ५१८ मीटर झाली आहे. वास्तविक ही पाणीपातळी पावसाळा संपताना असायला हवी आहे. ती आताच त्यांनी गाठली आहे. याबद्दल महाराष्ट्राच्या जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांनी केली.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूरChief Ministerमुख्यमंत्री