शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

नामवंत मराठी शाळांतही बालवाड्या पडणार ओस- सांगलीतील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 23:57 IST

बालवाडी प्रवेशासाठी शहरातील अनेक नामवंत शाळांनाही विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षातच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी बालवाडी प्रवेशासाठी पालकांच्या रांगा लागत होत्या. यंदा महापालिका क्षेत्रात बालवाडीच्या पाचशेवर जागा रिक्त राहणार आहेत.

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांची वानवा; इंग्रजी माध्यमाकडे कल--मराठी माध्यमाच्या बालवाडी प्रवेशात पालकांची कमी झालेली रुची, हा चिंतेचा विषय ठरला आहे.

शीतल पाटील ।सांगली : बालवाडी प्रवेशासाठी शहरातील अनेक नामवंत शाळांनाही विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षातच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी बालवाडी प्रवेशासाठी पालकांच्या रांगा लागत होत्या. यंदा महापालिका क्षेत्रात बालवाडीच्या पाचशेवर जागा रिक्त राहणार आहेत. भविष्यात बालवाडी प्रवेशासाठीची सोडत पद्धत बंद करावी लागण्याची भीती असून, इंग्रजी माध्यमाकडे वाढलेला ओढा व आरटीईच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचा बालवाडी प्रवेशावर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

महापालिका क्षेत्रातील बालवाडी प्रवेशाची प्रक्रिया शिक्षण मंडळाच्यावतीने राबविली जाते. प्रवेश प्रक्रियेची घोषणा होताच अर्ज घेण्यासाठी शाळांसमोर लांबच लांब रांगा लागत असत. पहाटेपासून पालक रांगेत उभे राहत. हे अनुभवलेल्या सांगलीतील चित्र गेल्या तीन-चार वर्षात बदलले आहे. त्या रांगा संपल्या असून, बालवाडीच्या जागा रिक्त राहू लागल्या आहेत. यंदाचे चित्रही त्यापेक्षा वेगळे नाही.

बालवाडी प्रवेशासाठी महापालिका क्षेत्रातील २६ शाळांमधील ५१ तुकड्यांमध्ये २,४७० प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी १९६१ अर्जांची विक्री झाली आहे. पाचशे जागा रिक्त राहिल्या आहेत. सांगली शिक्षण संस्थेसह मिरजेतील काही शाळांचा अपवाद वगळता, क्षमतेइतकेही अर्ज विक्री झालेले नाहीत. अनेक शाळांची बालवाडी प्रवेश क्षमता २०० ते २५० आहे. प्रत्यक्षात ५० ते १०० अर्जांचीच विक्री झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून शहरातील पालकांचा ओढा मराठी माध्यमापेक्षा सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाकडे वाढला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्याही मराठी माध्यमांच्या तुलनेत वाढली आहे. त्यात घराजवळच्या शाळांना पालकांची अधिक पसंती दिसून येते. आरटीईनुसार २५ टक्के प्रवेशाचा परिणामही दिसून येत आहे. पहिलीला आरटीईनुसार प्रवेश मिळण्याची आशा असल्याने बालवाडीपासूनच पाल्याला पसंतीच्या शाळेत प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे बालवाडी प्रवेशासाठी रांगा लागल्याचे सांगली, मिरज शहरातील शाळांमध्ये चित्र आता दिसत नाही.काही शाळांतच : सोडतइंग्रजी माध्यमाच्या वाढत्या शाळा याचा विचार करता, यावर्षी २६ शाळांपैकी पाच ते सहा शाळांमध्येच बालवाडी प्रवेशासाठी सोडत होईल, अशी स्थिती आहे. क्षमता व दाखल अर्ज यात मोठी तफावत आहे.मराठी माध्यमशाळा क्षमता अर्जम. के. आठवले २०० १२५बापट बाल शाळा १५० २६२वसंत प्राथमिक १५० १२९बर्वे शाळा १०० ५०देशपांडे शाळा १०० ३३नूतन मराठी १०० १५इंग्रजी माध्यमशाळा क्षमता अर्जइमॅन्युअल १०० ८८अल्फोन्सा १०० १४०आयडीयल ५० ९१एसईएस इंग्लिश ५० ८०कांतिलाल शहा ५० २२ 

खासगी, विनाअनुदानित शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. आरटीईच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचाही परिणाम जाणवत आहे. पहिलीला प्रवेश घेतलेल्या शाळेतच पाल्याला बालवाडीपासून घातले जात आहे. शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढल्या नसल्या तरी, पूर्वीच्या शाळांमध्ये प्रवेशाकडेही पालकांचा कल वाढला.- हणमंत बिराजदार, प्रशासन अधिकारी, महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ.

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळाzp schoolजिल्हा परिषद शाळा