शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

नामवंत मराठी शाळांतही बालवाड्या पडणार ओस- सांगलीतील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 23:57 IST

बालवाडी प्रवेशासाठी शहरातील अनेक नामवंत शाळांनाही विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षातच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी बालवाडी प्रवेशासाठी पालकांच्या रांगा लागत होत्या. यंदा महापालिका क्षेत्रात बालवाडीच्या पाचशेवर जागा रिक्त राहणार आहेत.

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांची वानवा; इंग्रजी माध्यमाकडे कल--मराठी माध्यमाच्या बालवाडी प्रवेशात पालकांची कमी झालेली रुची, हा चिंतेचा विषय ठरला आहे.

शीतल पाटील ।सांगली : बालवाडी प्रवेशासाठी शहरातील अनेक नामवंत शाळांनाही विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षातच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी बालवाडी प्रवेशासाठी पालकांच्या रांगा लागत होत्या. यंदा महापालिका क्षेत्रात बालवाडीच्या पाचशेवर जागा रिक्त राहणार आहेत. भविष्यात बालवाडी प्रवेशासाठीची सोडत पद्धत बंद करावी लागण्याची भीती असून, इंग्रजी माध्यमाकडे वाढलेला ओढा व आरटीईच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचा बालवाडी प्रवेशावर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

महापालिका क्षेत्रातील बालवाडी प्रवेशाची प्रक्रिया शिक्षण मंडळाच्यावतीने राबविली जाते. प्रवेश प्रक्रियेची घोषणा होताच अर्ज घेण्यासाठी शाळांसमोर लांबच लांब रांगा लागत असत. पहाटेपासून पालक रांगेत उभे राहत. हे अनुभवलेल्या सांगलीतील चित्र गेल्या तीन-चार वर्षात बदलले आहे. त्या रांगा संपल्या असून, बालवाडीच्या जागा रिक्त राहू लागल्या आहेत. यंदाचे चित्रही त्यापेक्षा वेगळे नाही.

बालवाडी प्रवेशासाठी महापालिका क्षेत्रातील २६ शाळांमधील ५१ तुकड्यांमध्ये २,४७० प्रवेश क्षमता आहे. त्यासाठी १९६१ अर्जांची विक्री झाली आहे. पाचशे जागा रिक्त राहिल्या आहेत. सांगली शिक्षण संस्थेसह मिरजेतील काही शाळांचा अपवाद वगळता, क्षमतेइतकेही अर्ज विक्री झालेले नाहीत. अनेक शाळांची बालवाडी प्रवेश क्षमता २०० ते २५० आहे. प्रत्यक्षात ५० ते १०० अर्जांचीच विक्री झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून शहरातील पालकांचा ओढा मराठी माध्यमापेक्षा सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाकडे वाढला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्याही मराठी माध्यमांच्या तुलनेत वाढली आहे. त्यात घराजवळच्या शाळांना पालकांची अधिक पसंती दिसून येते. आरटीईनुसार २५ टक्के प्रवेशाचा परिणामही दिसून येत आहे. पहिलीला आरटीईनुसार प्रवेश मिळण्याची आशा असल्याने बालवाडीपासूनच पाल्याला पसंतीच्या शाळेत प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे बालवाडी प्रवेशासाठी रांगा लागल्याचे सांगली, मिरज शहरातील शाळांमध्ये चित्र आता दिसत नाही.काही शाळांतच : सोडतइंग्रजी माध्यमाच्या वाढत्या शाळा याचा विचार करता, यावर्षी २६ शाळांपैकी पाच ते सहा शाळांमध्येच बालवाडी प्रवेशासाठी सोडत होईल, अशी स्थिती आहे. क्षमता व दाखल अर्ज यात मोठी तफावत आहे.मराठी माध्यमशाळा क्षमता अर्जम. के. आठवले २०० १२५बापट बाल शाळा १५० २६२वसंत प्राथमिक १५० १२९बर्वे शाळा १०० ५०देशपांडे शाळा १०० ३३नूतन मराठी १०० १५इंग्रजी माध्यमशाळा क्षमता अर्जइमॅन्युअल १०० ८८अल्फोन्सा १०० १४०आयडीयल ५० ९१एसईएस इंग्लिश ५० ८०कांतिलाल शहा ५० २२ 

खासगी, विनाअनुदानित शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. आरटीईच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेचाही परिणाम जाणवत आहे. पहिलीला प्रवेश घेतलेल्या शाळेतच पाल्याला बालवाडीपासून घातले जात आहे. शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढल्या नसल्या तरी, पूर्वीच्या शाळांमध्ये प्रवेशाकडेही पालकांचा कल वाढला.- हणमंत बिराजदार, प्रशासन अधिकारी, महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ.

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळाzp schoolजिल्हा परिषद शाळा