शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

गावगाड्याकडून नागरिकीकरणाकडे: ग्रामपंचायतींना कोट्यवधींचा निधी; मनुष्यबळ मात्र अत्यल्प

By संतोष भिसे | Updated: December 12, 2024 18:37 IST

वित्त आयोगामुळे स्वावलंबी : मात्र आराखड्यांसाठी परावलंबी, पैसा आला तसा भ्रष्टाचारही वाढला

संतोष भिसेसांगली : ग्रामपंचायतींना वित्त आयोगातून दरवर्षी कोट्यवधी रुपये मिळत आहेत, पण त्याच्या विनियोगाची यंत्रणा त्यांच्याकडे नाही. वर्षाकाठी चार-पाच लाखांचे अंदाजपत्रक असलेल्या ग्रामपंचायतींवर वित्त आयोगामुळे ५० लाख ते एक कोटी रुपये खर्चाची जबाबदारी येऊन पडली आहे.केंद्र शासनाकडून येणारा कोटयवधीचा निधी खर्चाच्या व योजनांच्या नियोजनासाठी ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायत तथा नगर परिषदांमध्ये होण्याची गरज आहे. वित्त आयोग सुरू होण्यापूर्वी गावखेड्यातील सर्व विकास प्रकल्प जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमार्फत राबविले जायचे. त्यामुळे ग्रामपंचायतींवर फार मोठी आर्थिक जबाबदारी नव्हती. पाणीपुरवठा, घरपट्टी वसुली, स्वच्छता, दिवाबत्ती आदी नाममात्र कामे होती. त्यामुळे ग्रामसेवक आणि मोजक्याच कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावगाडा हाकला जायचा. मोठी आर्थिक उलाढाल नसल्याने कारभाऱ्यांचे आर्थिक स्वारस्यही अत्यंत मर्यादित होते. अपहार आणि भ्रष्टाचाराची प्रकरणेही मर्यादितच होती. पण वित्त आयोग येताच ग्रामपंचायतींना जणू शिंगेच फुटली. कोट्यवधीचा निधी येऊ लागला आणि ग्रामपंचायतींत ठेकेदारी व टक्केवारीवरून हाणामाऱ्या सुरू झाल्या.गावाच्या लोकसंख्येनुसार वित्त आयोगाचा वाटा ग्रामपंचायतींना मिळतो. या पैशांतून गावातील विकासप्रकल्प गावकऱ्यांमार्फतच राबविले जावेत, असा शासनाचा हेतू आहे. पण हाच मुद्दा कळीचा बनला आहे. या निधीतून पाणीयोजना, रस्ते कॉंक्रिटीकरण, शौचालये, स्वच्छतागृहे, शेततळे, सिमेंट बांध, वर्गखोल्या अशी अनेक कामे करता येतात. पण या कामांचे आराखडे, कामे करून घेणारे तांत्रिक कर्मचारी, अभियंते, गुणवत्ता नियंत्रण विभाग, लेखा विभाग किंवा आवश्यक कोणतेही मनुष्यबळ ग्रामपंचायतींकडे नाहीत. प्रत्येक बाबीसाठी ग्रामपंचायतींना वरिष्ठ कार्यालयांकडे हेलपाटे मारावे लागतात. ग्रामपंचायती स्वायत्त असल्या, तरी या प्रकल्पांबाबत मात्र त्या परावलंबीच झाल्या आहेत.

गावे जिल्हा परिषद, पंचायत समितीवर अवलंबूनग्रामपंचायतींकडे कोट्यवधींचे प्रकल्प येऊ लागले आहेत. पण त्यांचे आराखडे, निविदाप्रक्रिया, कामावर देखरेख, गुणवत्ता नियंत्रण आदी तांत्रिक कामांसाठी ग्रामपंचायतींकडे मनुष्यबळ नाही. त्यासाठी ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीवरच अवलंबून रहावे लागत आहे. ही कामे यापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमार्फत गावोगावी राबविली जायची. त्यावेळी अधिकाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध निर्माण व्हायचे. आता कामे ग्रामपंचायतींकडे गेल्याने अधिकाऱ्यांचे हितसंबंध संपुष्टात आले आहेत. परिणामी प्रकल्पांच्या अंमलबजावणीकडे त्यांना फारसा रस राहत नाही. त्याचा परिणाम म्हणून ग्रामपंचायत स्तरावर कामे रखडतात.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतfundsनिधी