शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

वाहतुकीचा खर्चही निघेना; शेतकऱ्याकडून रताळे शेती जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 7:26 PM

पन्नास किलोच्या पोत्याला दोनशे रुपये वाहतूक भाडे सांगितले आहे. लावणीपासून काढणीपर्यंतचा व पुन्हा बाजारपेठेत माल पोहोचवेपर्यंतचा खर्च काढल्यास, हाती काय? हा प्रश्न शेतकºयांना भेडसावत असल्यानेच पाटील यांनी रताळ्याचे काढणीला आलेले पीक शेतातच मुजविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे येडेमच्छिंद्रेत लॉकडाऊनमुळे मिळेना दर

निवास पवार

शिरटे : कोरोना संसर्गाच्या महामारीने अनेकांना मेटाकुटीला आणले आहे. शेतकऱ्यांना तर त्याचा मोठा फटका बसला आहे. अनेकांची विविध पिके दराअभावी आणि ग्राहकांअभावी सडून गेली. येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील शेतकरी अधिक जयसिंग पाटील यांनी दराअभावी त्यांचे दोन एकर शेतातील रताळांचे क्षेत्र बुधवारी ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमीनदोस्त करून टाकले.

लॉकडाऊनच्या काळात वाहतुकीचा प्रश्नही गंभीर बनला. बाजार भरविण्यावर बंदी असल्याने शेतीमालाला दरही मिळेना. त्यामुळे अनेक शेतकºयांना त्यांनी उत्पादित केलेला माल डोळ्यादेखल कुजून जाताना पाहावा लागला. जो काही माल हाताला लागला, त्याला दरही मातीमोल मिळत होता. त्यामुळे शेतकरी वर्गाचे आर्थिक गणित चांगलेच कोलमडले आहे.

साधारणत: चार महिन्यांच्या कालावधीचे असणारे रताळे हे पीक आर्थिक उत्पन्नाबरोबरच जमिनीचा पोत सुधारण्यासही मदत करीत असते. डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान रताळांची लावण केल्यास मे महिन्यात परिपक्व रताळांची काढणी होते. गतवर्षी या महिन्यातील रताळांचा किलोचा दर सव्वीस ते तीस रुपये होता. पण सध्या देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकºयांची अर्थव्यवस्थाच कोलमडून पडली आहे. बाजारपेठेत शाश्वतीचा व हमीचा दर नसल्याने भाडेखर्च मिळणेही मुश्किल होत आहे.

सध्या अनेक शेतकºयांचे रताळी काढणीचे काम सुरु आहे. मुंबई व पुण्याच्या बाजारपेठेत रताळांची उलाढाल होत असते. परंतु लॉकडाऊनमुळे बाजारपेठा ठप्प आहेत. दराबाबत व्यापाºयांशी संपर्क साधला असता, त्यांनी मालाच्या प्रतीनुसार सहा ते दहा रुपये प्रतिकिलो दर, तसेच पन्नास किलोच्या पोत्याला दोनशे रुपये वाहतूक भाडे सांगितले आहे. लावणीपासून काढणीपर्यंतचा व पुन्हा बाजारपेठेत माल पोहोचवेपर्यंतचा खर्च काढल्यास, हाती काय? हा प्रश्न शेतकºयांना भेडसावत असल्यानेच पाटील यांनी रताळ्याचे काढणीला आलेले पीक शेतातच मुजविण्याचा निर्णय घेतला आहे.

 

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीMONEYपैसा