शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सांगलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा, एकमेकाला टोमणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 12:04 PM

अपक्षांना मत देणे धोक्याचे : जयंत पाटील

सांगली : सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या संघर्षावर काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. उमेदवारी मागील राजकारणात काहीही संबंध नसल्याचे सांगून दोषमुक्त होण्याचा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रयत्न केला. काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यासपीठावर उमेदवारी वाटपाच्या राजकारणावर खंत व्यक्त केली. उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची जागा कशी बरोबर आहे, हे ठणकावून सांगितले.पहिल्या दिवशी मला जर समजलं असतं की सांगली विश्वजीत कदम यांच्यासाठी सोडायची आहे तर मीसुद्धा ही जागा सोडली असती. इथल्या भविष्याच्या आड शिवसेना अजिबात येणार नाही. आपल्या विचाराकडून हिसकावून घेतलेली जागा जिंकण्यासाठी आम्ही सांगलीत आलोय, असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांवर शालूतून जोडे मारल्यानंतर आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याच्या आणाभाका व्यासपीठावरून मतदारांना दिल्या. त्यानंतर व्यासपीठावरून नेते निघून जाताच, नेत्यांच्या भाषणांची कार्यकर्त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला दममहाविकास आघाडीचे काम एकमुखी सुरू आहे. सांगलीत मात्र तसं झालं नाही. जागावाटप प्रत्येक पक्षाचा निर्णय होता. भाजपला जर हरवायचे असेल तर आता लढाईची दिशा बदलून चालणार नाही. आपण ताकदीने चंद्रहार पाटील यांचेच काम करायला पाहिजे. लोक काय म्हणतात, यापेक्षा सदसद्विवेक बुद्धी जागृत ठेवून काम करायला पाहिजे. राष्ट्रवादीच्या माझ्या कार्यकर्त्यांनी काही गडबड केली तर त्यांना माझा शेवटचा रामराम समजावा, असा इशाराही जयंत पाटील यांनी दिला.

अपक्षांना मत देणे धोक्याचे : जयंत पाटीलमराठी माणसांनी उभारलेले पक्ष फोडण्याचे काम केलेल्या भाजपला त्यांची जागा दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. नवनीत राणा यांना आम्ही निवडून दिले, त्या दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये गेल्या. त्यामुळे अपक्षांना मत देणे धोक्याचे आहे, ते कधी कुठं जातील सांगता येत नाही. मी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कुठंही नव्हतो, पण वारंवार माझं नाव घेतलं जातं. माझा कुठंही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले.

स्टेजवर एक, खाली एक नकोकुणाची तरी इच्छा होती, ती मान्य झाली नाही, परंतु आता महाविकास आघाडीचा उमेदवार उभा आहे. आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे रहावे, स्टेजवर एक आणि खाली एक अशी भूमिका घेतलेली चालणार नाही. राष्ट्रवादीतील लोकांनी शिवसेनेचे काम करायचे तरच पक्षात राहायचं... अन्यथा माझा त्यांना शेवटचा नमस्कार समजावा, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगलीsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीVishwajeet Kadamविश्वजीत कदमJayant Patilजयंत पाटील