शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
3
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
4
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
5
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
6
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
7
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
8
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
9
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
10
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
11
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
12
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
13
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
14
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
15
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
16
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
17
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
18
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
19
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
20
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
Daily Top 2Weekly Top 5

पाणी मागणीअभावी म्हैसाळ योजना बंद

By admin | Updated: December 1, 2014 00:07 IST

पिके अडचणीत : नियोजन कोलमडले

मिरज : म्हैसाळ योजनेच्या रब्बी आवर्तनासाठी शेतकऱ्यांनी मागणी नोंदविली नसल्याने म्हैसाळचा पाणी उपसा बंद करण्यात आला आहे. फेब्रुवारीअखेर रब्बी आवर्तनाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र मागणी नसल्याने पाणी बंद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरून मागणी नोंदविल्यास यापुढे म्हैसाळचे पाणी सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
म्हैसाळच्या रब्बी आवर्तनासाठी पंप सुरू करण्यात आले होते. मात्र १ कोटी ६२ लाख वीज बिलाच्या थकबाकीसाठी महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला. पाटबंधारे विभागाने टंचाई निधीतून वीज बिल भरण्याची हमी दिल्यानंतर म्हैसाळचे पंप दि. ७ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू झाले. म्हैसाळचे हजारो हेक्टर लाभक्षेत्र असताना, एकाही शेतकऱ्याने पाण्याची मागणी नोंदविली नसल्याने पाणी उपसा करणाऱ्या पंपाची व जतपर्यंतच्या कालव्याची चाचणी घेण्यात आली. फेब्रुवारीत खरड छाटणीला पाण्याची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितल्याने मागणीअभावी रब्बी आवर्तन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी म्हैसाळचे पाणी बंद करण्यात आले असून, पुढील हंगामात शेतकऱ्यांनी पाणी बिलाची रक्कम भरून मागणी नोंदविल्यास पाणी सुरू करण्यात येणार असल्याचे म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मिरज व तासगाव तालुक्यात पावसाचे पाणी अद्याप ओढे-नाल्यात आहे. जत व कवठेमहांकाळ तालुक्यात झालेल्या पावसामुळे अद्याप येथील शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता नसल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)