शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचे भूषण गणेशदुर्ग..; चारही बाजूंनी खंदक असलेला अष्टकोनी भुईकोट किल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 16:17 IST

देशाचा पहिला स्वातंत्र्य दिन अनुभवण्याचे भाग्यही या किल्ल्यास लाभले

दत्तात्रय शिंदेथोरले चिंतामणराव पटवर्धन यांनी मिरज संस्थानमधून बाहेर पडून इ.स. १८०१ साली सांगली स्वतंत्र संस्थान स्थापन केले. ‘दुर्ग हे राज्याचे सार’ याची पुरेपूर जाण असलेल्या चिंतामणरावांनी नंतरच्या काही वर्षांत सांगलीत भुईकाेटाचे काम हाती घेतले. चारही बाजूंनी खंदक असलेला हा अष्टकाेनी भुईकोट किल्ला म्हणजे सांगलीचे एक भूषणच.. देशाचा पहिला स्वातंत्र्य दिन अनुभवण्याचे भाग्यही या किल्ल्यास लाभले.

स्वतंत्र संस्थानच्या स्थापनेनंतर चिंतामणरावांनी सांगलीच्या सुरक्षेसाठी भुईकाेट उभारला. पटवर्धन घराणे परम गणेशभक्त. गणेशावरील श्रद्धेमुळे या किल्ल्याचे नावही ‘गणेशदुर्ग’ ठेवले. ‘हे राज्य गणेशाचे, आपण केवळ मुखत्यार आहाेत’, ही राजांची भावना हाेती. याच भावनेतून किल्ल्यातील दरबारात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.

सुरुवातीच्या काळात किल्ल्याच्या उत्तर बाजूस दाेन बुरुजांमध्ये एकच दरवाजा होता. दरवाजावर अणकुचीदार खिळे ठाेकलेले असल्याने हा काटेदरवाजा म्हणून ओळखला जात असे. काटेदरवाजाच्या आतमध्ये मधाेमध एक भव्य बुरूज आहे. या बुरुजास गणेश बुरूज म्हटले जाते. आता दक्षिण आणि पूर्व बाजूस आणखी दोन प्रवेशद्वारे आहेत. चारही बाजूंनी खंदक व अष्टकाेनी आकारातील हा भुईकाेट मिरज किल्ल्याची रचना समाेर ठेवून उभारला गेला असावा, असे सांगितले जाते.

सांगली संस्थानचा कारभार याच इमारतीतून चालत असे. पुढील काळात रेव्हॅन्यू ऑफिस म्हणून ओखळल्या जाणाऱ्या मुख्य इमारतीसह अनेक बांधकामे येथे झाली. राजांचे हुजूर कार्यालय, शस्त्रागार, घाेड्यांसाठी पागा उभारून किल्ल्यात एक भक्कम लष्करी ठाणे बनविण्यात आले. मुख्य प्रवेशद्वारासमाेर न्यायालयासाठी दाेन इमारती उभारण्यात आल्या. कैद्यांसाठी कारागृह तयार करण्यात आले. स्वातंत्र्यलढ्यामध्ये याच कारागृहाच्या भिंतीवरून बाजूच्या खंदकात उडी घेत वसंतदादा पाटील यांच्यासह स्वातंत्र्यसेनानींनी ऐतिहासिक पलायन केले हाेते.

आता किल्ला व त्याच्या परिसरात जिल्हाधिकारी यांचे भांडार, भूमिअभिलेख, केंद्रीय जेल, स्वच्छताविषयक उपविभाग, सार्वजनिक आरोग्य, होमगार्ड अशी विविध सरकारी कार्यालये आहेत. याशिवाय खासगी मालमत्ता, शाळा, महाविद्यालय, तसेच एक छोटेखानी प्रेक्षणीय संग्रहालयही आहे.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर सांगली संस्थान भारतात विलीन झाले. देशाचा पहिला स्वातंत्रसाेहळा येथेच साजरा झाला. दरबार हॉलसमाेरील चाैकात श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन (दुसरे) यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले हाेते. आज किल्ल्याचा बराचसा भाग काळाच्या ओघात नष्ट झाला असला तरीही तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार मात्र सुस्थितीत आहे. हा ऐतिहासिक ठेवा सांगलीचे भूषण ठरणारा आहे.

टॅग्स :Sangliसांगली