शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीचे भूषण गणेशदुर्ग..; चारही बाजूंनी खंदक असलेला अष्टकोनी भुईकोट किल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 16:17 IST

देशाचा पहिला स्वातंत्र्य दिन अनुभवण्याचे भाग्यही या किल्ल्यास लाभले

दत्तात्रय शिंदेथोरले चिंतामणराव पटवर्धन यांनी मिरज संस्थानमधून बाहेर पडून इ.स. १८०१ साली सांगली स्वतंत्र संस्थान स्थापन केले. ‘दुर्ग हे राज्याचे सार’ याची पुरेपूर जाण असलेल्या चिंतामणरावांनी नंतरच्या काही वर्षांत सांगलीत भुईकाेटाचे काम हाती घेतले. चारही बाजूंनी खंदक असलेला हा अष्टकाेनी भुईकोट किल्ला म्हणजे सांगलीचे एक भूषणच.. देशाचा पहिला स्वातंत्र्य दिन अनुभवण्याचे भाग्यही या किल्ल्यास लाभले.

स्वतंत्र संस्थानच्या स्थापनेनंतर चिंतामणरावांनी सांगलीच्या सुरक्षेसाठी भुईकाेट उभारला. पटवर्धन घराणे परम गणेशभक्त. गणेशावरील श्रद्धेमुळे या किल्ल्याचे नावही ‘गणेशदुर्ग’ ठेवले. ‘हे राज्य गणेशाचे, आपण केवळ मुखत्यार आहाेत’, ही राजांची भावना हाेती. याच भावनेतून किल्ल्यातील दरबारात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.

सुरुवातीच्या काळात किल्ल्याच्या उत्तर बाजूस दाेन बुरुजांमध्ये एकच दरवाजा होता. दरवाजावर अणकुचीदार खिळे ठाेकलेले असल्याने हा काटेदरवाजा म्हणून ओळखला जात असे. काटेदरवाजाच्या आतमध्ये मधाेमध एक भव्य बुरूज आहे. या बुरुजास गणेश बुरूज म्हटले जाते. आता दक्षिण आणि पूर्व बाजूस आणखी दोन प्रवेशद्वारे आहेत. चारही बाजूंनी खंदक व अष्टकाेनी आकारातील हा भुईकाेट मिरज किल्ल्याची रचना समाेर ठेवून उभारला गेला असावा, असे सांगितले जाते.

सांगली संस्थानचा कारभार याच इमारतीतून चालत असे. पुढील काळात रेव्हॅन्यू ऑफिस म्हणून ओखळल्या जाणाऱ्या मुख्य इमारतीसह अनेक बांधकामे येथे झाली. राजांचे हुजूर कार्यालय, शस्त्रागार, घाेड्यांसाठी पागा उभारून किल्ल्यात एक भक्कम लष्करी ठाणे बनविण्यात आले. मुख्य प्रवेशद्वारासमाेर न्यायालयासाठी दाेन इमारती उभारण्यात आल्या. कैद्यांसाठी कारागृह तयार करण्यात आले. स्वातंत्र्यलढ्यामध्ये याच कारागृहाच्या भिंतीवरून बाजूच्या खंदकात उडी घेत वसंतदादा पाटील यांच्यासह स्वातंत्र्यसेनानींनी ऐतिहासिक पलायन केले हाेते.

आता किल्ला व त्याच्या परिसरात जिल्हाधिकारी यांचे भांडार, भूमिअभिलेख, केंद्रीय जेल, स्वच्छताविषयक उपविभाग, सार्वजनिक आरोग्य, होमगार्ड अशी विविध सरकारी कार्यालये आहेत. याशिवाय खासगी मालमत्ता, शाळा, महाविद्यालय, तसेच एक छोटेखानी प्रेक्षणीय संग्रहालयही आहे.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर सांगली संस्थान भारतात विलीन झाले. देशाचा पहिला स्वातंत्रसाेहळा येथेच साजरा झाला. दरबार हॉलसमाेरील चाैकात श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन (दुसरे) यांच्या हस्ते ध्वजाराेहण करण्यात आले हाेते. आज किल्ल्याचा बराचसा भाग काळाच्या ओघात नष्ट झाला असला तरीही तटबंदी आणि भव्य प्रवेशद्वार मात्र सुस्थितीत आहे. हा ऐतिहासिक ठेवा सांगलीचे भूषण ठरणारा आहे.

टॅग्स :Sangliसांगली