शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

भावई उत्सव : सामाजिक एकात्मतेचे प्रतीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST

कोणत्याही शहराची ओळख केवळ दगडमातीच्या इमारती व रस्ते यावरून ठरवता येत नाही. तेथील नागरिक, त्यांच्या परंपरा, संस्कृती, इतिहास या ...

कोणत्याही शहराची ओळख केवळ दगडमातीच्या इमारती व रस्ते यावरून ठरवता येत नाही. तेथील नागरिक, त्यांच्या परंपरा, संस्कृती, इतिहास या सर्वांच्या मिलाफातून शहर घडत असते. काही विचारवंत, कलाकार आपल्या परंपरेचे, संस्कृतीचे जतन करत असतात. त्यांच्या विचाराने शहराचा विकास होत असतो. आष्टा नगरीचे शिल्पकार माजी आमदार दिवंगत विलासराव शिंदे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कल्पनेतून आष्टा शहराचा सर्वांगीण विकास होत आहे.

आष्टा हे कृषिप्रधान गाव. पूर्वीच्या काळी एका खातेदाराकडे चावडीची बाकी राहिली होती. ही बाकी सुमारे सव्वा लाख रुपये झाली. या खातेदाराने एकाच वेळी सव्वा लाख रुपये बाकी भरली म्हणून गावास सव्वालाखी आष्टा असे म्हटले जाते. आष्टा परिषदेची स्थापना ६ डिसेंबर १८५३ रोजी झाली. जिल्ह्याचे कलेक्टर हे अध्यक्ष होते. त्यांच्यासोबत गावातील पाच पंच असत. गावाची व्यवस्था कलेक्टर यांच्या हुकुमाने चालत असे. आष्टा पालिकेची पहिली निवडणूक १८८९ मध्ये झाली. १९१७ मध्ये पहिले नगराध्यक्ष म्हणून मूर्ग्याप्पा महाजन यांची निवड झाली. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून बापूसाहेब शिंदे यांची निवड झाली.

१९७४ मध्ये पहिले थेट नगराध्यक्ष काकासाहेब शिंदे तर २००१ दुसरे थेट नगराध्यक्ष झुंजारराव शिंदे यांची निवड झाली. पालिकेची इमारत १९६१ मध्ये बांधण्यात आली. आता पालिकेने २००३ मध्ये संत गाडगेबाबा शहर स्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. २००६ मध्ये पालिकेची निवडणूक बिनविरोध झाली.

आष्टा पालिका क वर्ग पालिका असूनही पालिकेने शहरात ठिकठिकाणी दुकान गाळे व इतर आर्थिक उत्पन्नाचे नवीन स्रोत उभारून उत्पन्नाचा नवीन मार्ग सुरू केला आहे. आष्टा इस्लामपूर मार्गावर विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल लग्न समारंभ यासाठी नागरिकांना वरदान ठरला आहे. शहरातील रस्ते गटारी यांची कामे झाली असून नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे शहराला नियमित स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा होत आहे.

अद्ययावत भाजी मंडई, मच्छी मार्केट यासह विविध प्रभागातील समाज मंदिरे नागरिकांना उपयोगी ठरत आहेत. राज्यात सर्वाधिक घरकुले आष्टा शहरात उभारण्यात आली आहेत. तसेच महादेवाच्या सात लिंगासह काशिलिंग बिरोबा मंदिर परिसराचा तीर्थक्षेत्र विकास योजनेतून जीर्णोद्धार करण्यात येत आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांमधून निधी मंजूर झाला आहे. कृषी पंढरी असणाऱ्या शहराने ऊस, केळी, हळद, फुले, भाजीपाला या पिकाबरोबर अत्याधुनिक शेतीची कास धरली आहे. बँका, पतसंस्था, सामाजिक, शैक्षणिक, सहकारी संस्थांच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. राज्यातील एक आदर्श शहर म्हणून या शहराची वाटचाल सुरू आहे.

- समीर गायकवाड