शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

भावई उत्सव : सामाजिक एकात्मतेचे प्रतीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST

कोणत्याही शहराची ओळख केवळ दगडमातीच्या इमारती व रस्ते यावरून ठरवता येत नाही. तेथील नागरिक, त्यांच्या परंपरा, संस्कृती, इतिहास या ...

कोणत्याही शहराची ओळख केवळ दगडमातीच्या इमारती व रस्ते यावरून ठरवता येत नाही. तेथील नागरिक, त्यांच्या परंपरा, संस्कृती, इतिहास या सर्वांच्या मिलाफातून शहर घडत असते. काही विचारवंत, कलाकार आपल्या परंपरेचे, संस्कृतीचे जतन करत असतात. त्यांच्या विचाराने शहराचा विकास होत असतो. आष्टा नगरीचे शिल्पकार माजी आमदार दिवंगत विलासराव शिंदे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कल्पनेतून आष्टा शहराचा सर्वांगीण विकास होत आहे.

आष्टा हे कृषिप्रधान गाव. पूर्वीच्या काळी एका खातेदाराकडे चावडीची बाकी राहिली होती. ही बाकी सुमारे सव्वा लाख रुपये झाली. या खातेदाराने एकाच वेळी सव्वा लाख रुपये बाकी भरली म्हणून गावास सव्वालाखी आष्टा असे म्हटले जाते. आष्टा परिषदेची स्थापना ६ डिसेंबर १८५३ रोजी झाली. जिल्ह्याचे कलेक्टर हे अध्यक्ष होते. त्यांच्यासोबत गावातील पाच पंच असत. गावाची व्यवस्था कलेक्टर यांच्या हुकुमाने चालत असे. आष्टा पालिकेची पहिली निवडणूक १८८९ मध्ये झाली. १९१७ मध्ये पहिले नगराध्यक्ष म्हणून मूर्ग्याप्पा महाजन यांची निवड झाली. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून बापूसाहेब शिंदे यांची निवड झाली.

१९७४ मध्ये पहिले थेट नगराध्यक्ष काकासाहेब शिंदे तर २००१ दुसरे थेट नगराध्यक्ष झुंजारराव शिंदे यांची निवड झाली. पालिकेची इमारत १९६१ मध्ये बांधण्यात आली. आता पालिकेने २००३ मध्ये संत गाडगेबाबा शहर स्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. २००६ मध्ये पालिकेची निवडणूक बिनविरोध झाली.

आष्टा पालिका क वर्ग पालिका असूनही पालिकेने शहरात ठिकठिकाणी दुकान गाळे व इतर आर्थिक उत्पन्नाचे नवीन स्रोत उभारून उत्पन्नाचा नवीन मार्ग सुरू केला आहे. आष्टा इस्लामपूर मार्गावर विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल लग्न समारंभ यासाठी नागरिकांना वरदान ठरला आहे. शहरातील रस्ते गटारी यांची कामे झाली असून नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे शहराला नियमित स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा होत आहे.

अद्ययावत भाजी मंडई, मच्छी मार्केट यासह विविध प्रभागातील समाज मंदिरे नागरिकांना उपयोगी ठरत आहेत. राज्यात सर्वाधिक घरकुले आष्टा शहरात उभारण्यात आली आहेत. तसेच महादेवाच्या सात लिंगासह काशिलिंग बिरोबा मंदिर परिसराचा तीर्थक्षेत्र विकास योजनेतून जीर्णोद्धार करण्यात येत आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांमधून निधी मंजूर झाला आहे. कृषी पंढरी असणाऱ्या शहराने ऊस, केळी, हळद, फुले, भाजीपाला या पिकाबरोबर अत्याधुनिक शेतीची कास धरली आहे. बँका, पतसंस्था, सामाजिक, शैक्षणिक, सहकारी संस्थांच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. राज्यातील एक आदर्श शहर म्हणून या शहराची वाटचाल सुरू आहे.

- समीर गायकवाड