शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

भावई उत्सव : सामाजिक एकात्मतेचे प्रतीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST

कोणत्याही शहराची ओळख केवळ दगडमातीच्या इमारती व रस्ते यावरून ठरवता येत नाही. तेथील नागरिक, त्यांच्या परंपरा, संस्कृती, इतिहास या ...

कोणत्याही शहराची ओळख केवळ दगडमातीच्या इमारती व रस्ते यावरून ठरवता येत नाही. तेथील नागरिक, त्यांच्या परंपरा, संस्कृती, इतिहास या सर्वांच्या मिलाफातून शहर घडत असते. काही विचारवंत, कलाकार आपल्या परंपरेचे, संस्कृतीचे जतन करत असतात. त्यांच्या विचाराने शहराचा विकास होत असतो. आष्टा नगरीचे शिल्पकार माजी आमदार दिवंगत विलासराव शिंदे व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या कल्पनेतून आष्टा शहराचा सर्वांगीण विकास होत आहे.

आष्टा हे कृषिप्रधान गाव. पूर्वीच्या काळी एका खातेदाराकडे चावडीची बाकी राहिली होती. ही बाकी सुमारे सव्वा लाख रुपये झाली. या खातेदाराने एकाच वेळी सव्वा लाख रुपये बाकी भरली म्हणून गावास सव्वालाखी आष्टा असे म्हटले जाते. आष्टा परिषदेची स्थापना ६ डिसेंबर १८५३ रोजी झाली. जिल्ह्याचे कलेक्टर हे अध्यक्ष होते. त्यांच्यासोबत गावातील पाच पंच असत. गावाची व्यवस्था कलेक्टर यांच्या हुकुमाने चालत असे. आष्टा पालिकेची पहिली निवडणूक १८८९ मध्ये झाली. १९१७ मध्ये पहिले नगराध्यक्ष म्हणून मूर्ग्याप्पा महाजन यांची निवड झाली. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून बापूसाहेब शिंदे यांची निवड झाली.

१९७४ मध्ये पहिले थेट नगराध्यक्ष काकासाहेब शिंदे तर २००१ दुसरे थेट नगराध्यक्ष झुंजारराव शिंदे यांची निवड झाली. पालिकेची इमारत १९६१ मध्ये बांधण्यात आली. आता पालिकेने २००३ मध्ये संत गाडगेबाबा शहर स्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. २००६ मध्ये पालिकेची निवडणूक बिनविरोध झाली.

आष्टा पालिका क वर्ग पालिका असूनही पालिकेने शहरात ठिकठिकाणी दुकान गाळे व इतर आर्थिक उत्पन्नाचे नवीन स्रोत उभारून उत्पन्नाचा नवीन मार्ग सुरू केला आहे. आष्टा इस्लामपूर मार्गावर विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल लग्न समारंभ यासाठी नागरिकांना वरदान ठरला आहे. शहरातील रस्ते गटारी यांची कामे झाली असून नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे शहराला नियमित स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा होत आहे.

अद्ययावत भाजी मंडई, मच्छी मार्केट यासह विविध प्रभागातील समाज मंदिरे नागरिकांना उपयोगी ठरत आहेत. राज्यात सर्वाधिक घरकुले आष्टा शहरात उभारण्यात आली आहेत. तसेच महादेवाच्या सात लिंगासह काशिलिंग बिरोबा मंदिर परिसराचा तीर्थक्षेत्र विकास योजनेतून जीर्णोद्धार करण्यात येत आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांमधून निधी मंजूर झाला आहे. कृषी पंढरी असणाऱ्या शहराने ऊस, केळी, हळद, फुले, भाजीपाला या पिकाबरोबर अत्याधुनिक शेतीची कास धरली आहे. बँका, पतसंस्था, सामाजिक, शैक्षणिक, सहकारी संस्थांच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास होत आहे. राज्यातील एक आदर्श शहर म्हणून या शहराची वाटचाल सुरू आहे.

- समीर गायकवाड