शहरं
Join us  
Trending Stories
1
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
2
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
3
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
4
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
5
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
6
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
7
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
8
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
9
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
10
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
11
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
12
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
13
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
14
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
15
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
17
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
18
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
19
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
20
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील साडेसातशे व्यापाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: April 4, 2015 00:05 IST

ग्राहकांची फसवणूक : २७ लाखांचा दंड वसूल; शेतकऱ्यांकडून माल विकत घेतानाही काटामारी

सचिन लाड - सांगली --ग्राहकांची फसवणूक करून व्यवसाय करणाऱ्या जिल्ह्यातील ७४७ व्यापाऱ्यांवर वैधमापन शास्त्र विभागाने गेल्या वर्षभरात कारवाई केली आहे. यामध्ये लहान व मोठ्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे. व्यापाऱ्यांविरुद्ध खटले दाखल करून त्यांच्याकडून सुमारे २७ लाख १८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत शेतकऱ्यांकडून माल विकत घेताना ‘काटा’ मारणारे व्यापारीही सापडले आहेत. सहायक नियंत्रक पांडुरंग बिरादार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
मूळ किमतीपेक्षा जादा दराने मालाची विक्री करणे, मालाच्या पॅकिंगवरील मूळ किंमत खोडून त्यावर जादा किंमत टाकणे, कंपनीचे लेबल नसलेल्या मालाची विक्री करणे, माल देताना कमी देऊन मापात पाप करणे, शेतकऱ्याचा माल खरेदी करताना काटा मारणे, माल खरेदी केल्यानंतर ग्राहकांना त्याचे बिल देण्यास टाळाटाळ करणे, साधा माल खरेदी करुन त्यावर मोठ्या कंपनीच्या नावाचे लेबल लावून विक्री करणे, अशा स्वरूपाची व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ग्राहक प्रत्यक्षात तक्रारी करत नसल्याने वैधमापन शास्त्र विभागास कारवाई कुठे आणि कुणावर करायची? असा प्रश्न पडतो. यासाठी ते कारवाईसाठी स्वतंत्र पथके नेमतात. अचानक दुकानात बोगस ग्राहक म्हणून जातात. शेतकऱ्यांचा माल खरेदीवेळीही ते उपस्थित राहतात. गौडबंगाल दिसून आल्यास ते जागेवरच कारवाई करतात. सर्वाधिक सांगली, मिरजेतील साडेतीनशेहून अधिक व्यापाऱ्यांवर कारवाई झाली आहे.


व्यापाऱ्यांवर कारवाई करुन महसूल उद्दिष्ट पूर्ण करणे, हा उद्देश नाही. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, त्यांना मूळ किमतीपेक्षा जादा दराने माल मिळू नये, मापात माप होऊ नये, यासाठी सातत्याने कारवाई केली जाते. लोकांनीही तक्रारी करण्यासाठी पुढे आले पाहिजे.
- पांडुरंग बिरादार, सहायक नियंत्रक, वैधमापन शास्त्र विभाग, सांगली.


उद्दिष्टापेक्षा ४९ लाख जादा
शासनाने २०१४-१५ या वर्षासाठी सांगलीच्या वैधमापन शास्त्र विभागास ७७ लाखांचे महसूल उद्दिष्ट दिले होते. मात्र या विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याने उद्दिष्ट पूर्ण होऊन ४९ लाख रुपये जादा महसूल गोळा केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होऊनही व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढतच आहे. यासाठी आता दंडात्मक कारवाईबरोबरच व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.