शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्यांना साखर निर्यातीतून २१४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 22:32 IST

अशोक डोंबाळे । सांगली : जिल्ह्यातील कारखान्यांनी वीस लाख क्विंटल साखरेची निर्यात केल्यामुळे कारखान्यांना अडचणीच्या कालावधित २१४ कोटी उपलब्ध ...

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातून वीस लाख क्विंटल साखर निर्यात; जून महिन्यापर्यंत जादा कोटा मिळणार ‘राजारामबापू’ आघाडीवर :

अशोक डोंबाळे ।

सांगली : जिल्ह्यातील कारखान्यांनी वीस लाख क्विंटल साखरेची निर्यात केल्यामुळे कारखान्यांना अडचणीच्या कालावधित २१४ कोटी उपलब्ध झाले आहेत. राजारामबापू कारखान्याने आघाडी घेतली असून, सात लाख क्विंटल साखरेची विक्री केली आहे. लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या कारखान्यांसाठी हा चांगला पर्याय असल्याचे साखर उद्योगाशी संबंधितांचे मत आहे. दि. ३० जूनपर्यंतच निर्यातीसाठी कारखान्यांना मुदत आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांनी ६६ लाख ९८ हजार ४०० टन उसाचे गाळप करून ८२ लाख ८७ हजार ५११ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. गतवर्षीच्या तुलनेत १७ लाख क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले आहे. उत्पादन घटल्यामुळे दर चांगला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण लॉकडाऊनमुळे मिठाई, शीतपेये, आईस्क्रिम, गोळ्या तयार करणाऱ्या कंपन्या बंद असल्यामुळे ७५ टक्के साखरेला मागणीच नाही.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, २५ टक्केच साखर घरगुती वापरासाठी लागते. यामुळे रेशनिंगवर साखर विक्री करायची म्हटले तरीही कारखान्यांसमोरील आर्थिक संकट संपणारे नाही. शिल्लक साखरेची निर्यात करूनच प्रश्न सोडवावा लागणार आहे.भारतात साखरेचा दर प्रतिक्विंटल ३१०० ते ३१७० रुपये आहे. निर्यात केल्यास परदेशात २२०० ते २४०० रुपये दर मिळत आहे. केंद्र शासनाकडून निर्यातीसाठी १०४४.८० रुपये अनुदान आहे. त्यामुळे ३२४४.८० रुपये ते ३४४४.८० रुपयेपर्यंत दर मिळत आहे. शिल्लक साखर गोदामात ठेवल्यास बँकेच्या व्याजाचा बोजा वाढणारच आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून कारखानदारांनी निर्यात करून शिलकीचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी वीस लाखांपर्यंतची साखर निर्यात करून २१४ कोटी रुपये पदरात पाडून घेतले आहेत.

‘राजारामबापू’च्या तीनही युनिटने सात लाख सात हजार ८३० क्विंटल साखरेची विक्री केली आहे. अतिरिक्त कोट्यातील साखरही त्यांनी विक्री केली. दालमिया, दत्त इंडिया, विश्वास कारखान्यांनीही अतिरिक्त साखर निर्यात केली आहे.उर्वरित कारखाने साखर निर्यातीत मागे राहिल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. या कारखान्यांना दि. ३० जूनपर्यंत साखर विक्रीची मुदत आहे.

जिल्ह्यातील साखर निर्यात (क्विंटल)कारखाना साखरराजारामबापू ३५४०४०राजारामबापू-वाटेगाव २०३३२०राजारामबापू-कारंदवाडी १५४०७०हुतात्मा १७२९९०सोनहिरा २०६०१०क्रांती २०७२५०उदगिरी १०४६९०सद्गुरू श्री श्री ९५५५०दालमिया-निनाईदेवी ६३५८०दत्त इंडिया-वसंतदादा १५७१००विश्वास १४७२००मोहनराव शिंदे ४०५००केन अ‍ॅग्रो ६५४९०महांकाली ३१३१०माणगंगा २९७९०यशवंत-नागेवाडी १३४७०एकूण २०४६३६०

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जास्तीत जास्त साखर निर्यात करून अडचणीतून बाहेर पडण्याची गरज आहे. साखर शिल्लक ठेवल्यास त्या रकमेवर बँकांचा कर्जाचा बोजा वाढणारच आहे. त्यापेक्षा साखर निर्यात केल्यास त्याचा कारखान्यांना फायदाच होणार आहे. तसेच केंद्र शासनाने साखर खरेदी करून रेशनिंगवर वाटप करण्याची गरज आहे. यामुळे शिल्लक साखरेचा साठा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.- आर. डी. माहुली, व्यवस्थापकीय संचालक, राजारामबापू पाटील कारखाना, साखराळे

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSangliसांगली