शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
8
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
9
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
10
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
11
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
12
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
13
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
14
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
15
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
16
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
17
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
18
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
19
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...

कारखान्यांना साखर निर्यातीतून २१४ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 22:32 IST

अशोक डोंबाळे । सांगली : जिल्ह्यातील कारखान्यांनी वीस लाख क्विंटल साखरेची निर्यात केल्यामुळे कारखान्यांना अडचणीच्या कालावधित २१४ कोटी उपलब्ध ...

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यातून वीस लाख क्विंटल साखर निर्यात; जून महिन्यापर्यंत जादा कोटा मिळणार ‘राजारामबापू’ आघाडीवर :

अशोक डोंबाळे ।

सांगली : जिल्ह्यातील कारखान्यांनी वीस लाख क्विंटल साखरेची निर्यात केल्यामुळे कारखान्यांना अडचणीच्या कालावधित २१४ कोटी उपलब्ध झाले आहेत. राजारामबापू कारखान्याने आघाडी घेतली असून, सात लाख क्विंटल साखरेची विक्री केली आहे. लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या कारखान्यांसाठी हा चांगला पर्याय असल्याचे साखर उद्योगाशी संबंधितांचे मत आहे. दि. ३० जूनपर्यंतच निर्यातीसाठी कारखान्यांना मुदत आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांनी ६६ लाख ९८ हजार ४०० टन उसाचे गाळप करून ८२ लाख ८७ हजार ५११ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. गतवर्षीच्या तुलनेत १७ लाख क्विंटलने साखरेचे उत्पादन घटले आहे. उत्पादन घटल्यामुळे दर चांगला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण लॉकडाऊनमुळे मिठाई, शीतपेये, आईस्क्रिम, गोळ्या तयार करणाऱ्या कंपन्या बंद असल्यामुळे ७५ टक्के साखरेला मागणीच नाही.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, २५ टक्केच साखर घरगुती वापरासाठी लागते. यामुळे रेशनिंगवर साखर विक्री करायची म्हटले तरीही कारखान्यांसमोरील आर्थिक संकट संपणारे नाही. शिल्लक साखरेची निर्यात करूनच प्रश्न सोडवावा लागणार आहे.भारतात साखरेचा दर प्रतिक्विंटल ३१०० ते ३१७० रुपये आहे. निर्यात केल्यास परदेशात २२०० ते २४०० रुपये दर मिळत आहे. केंद्र शासनाकडून निर्यातीसाठी १०४४.८० रुपये अनुदान आहे. त्यामुळे ३२४४.८० रुपये ते ३४४४.८० रुपयेपर्यंत दर मिळत आहे. शिल्लक साखर गोदामात ठेवल्यास बँकेच्या व्याजाचा बोजा वाढणारच आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून कारखानदारांनी निर्यात करून शिलकीचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी वीस लाखांपर्यंतची साखर निर्यात करून २१४ कोटी रुपये पदरात पाडून घेतले आहेत.

‘राजारामबापू’च्या तीनही युनिटने सात लाख सात हजार ८३० क्विंटल साखरेची विक्री केली आहे. अतिरिक्त कोट्यातील साखरही त्यांनी विक्री केली. दालमिया, दत्त इंडिया, विश्वास कारखान्यांनीही अतिरिक्त साखर निर्यात केली आहे.उर्वरित कारखाने साखर निर्यातीत मागे राहिल्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. या कारखान्यांना दि. ३० जूनपर्यंत साखर विक्रीची मुदत आहे.

जिल्ह्यातील साखर निर्यात (क्विंटल)कारखाना साखरराजारामबापू ३५४०४०राजारामबापू-वाटेगाव २०३३२०राजारामबापू-कारंदवाडी १५४०७०हुतात्मा १७२९९०सोनहिरा २०६०१०क्रांती २०७२५०उदगिरी १०४६९०सद्गुरू श्री श्री ९५५५०दालमिया-निनाईदेवी ६३५८०दत्त इंडिया-वसंतदादा १५७१००विश्वास १४७२००मोहनराव शिंदे ४०५००केन अ‍ॅग्रो ६५४९०महांकाली ३१३१०माणगंगा २९७९०यशवंत-नागेवाडी १३४७०एकूण २०४६३६०

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जास्तीत जास्त साखर निर्यात करून अडचणीतून बाहेर पडण्याची गरज आहे. साखर शिल्लक ठेवल्यास त्या रकमेवर बँकांचा कर्जाचा बोजा वाढणारच आहे. त्यापेक्षा साखर निर्यात केल्यास त्याचा कारखान्यांना फायदाच होणार आहे. तसेच केंद्र शासनाने साखर खरेदी करून रेशनिंगवर वाटप करण्याची गरज आहे. यामुळे शिल्लक साखरेचा साठा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.- आर. डी. माहुली, व्यवस्थापकीय संचालक, राजारामबापू पाटील कारखाना, साखराळे

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSangliसांगली