शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

सांगली जिल्ह्यात ९७ निवारा केंद्रात ३६२२० व्यक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 18:25 IST

यामध्ये जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या 97 निवारा केंद्रामधून सद्यस्थितीत 36 हजार 220 लोकांची सोय करण्यात आली आहे. महानगरपालिका अंतर्गत 2 ठिकाणी कम्युनिटी किचन स्थापन करण्यात आले असून त्या अंतर्गत 902 लोकांना जेवण देण्यात येत आहे.

 

सांगली :. कोरोना संसर्गापासून बचावासाठी घराबाहेर न पडणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे जेथे आहात तेथेच राहा असे आवाहन शासनामार्फत वारंवार करण्यात येत आहे. त्यासाठी लॉकडाउन, संचारबंदी, जिल्हाबंदी यासारख्या विविध्‍ अंगी उपाय योजना करण्यात येत आहेत.

रोजंदारीवरील मजूर, निराधार व्यक्ती, ऊस तोड मजूर, भटके लोक तसेच कायमस्वरूपी ज्यांना रहाण्याची आणि खाण्यापिण्याची सोय उपलब्ध नाही अशांसाठी ते सद्या ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी त्यांना आसरा देण्यासाठी निवारागृहे स्थापन करण्यातआली आहेत. यामध्ये जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या 97 निवारा केंद्रामधून सद्यस्थितीत 36 हजार 220 लोकांची सोय करण्यात आली आहे. महानगरपालिका अंतर्गत 2 ठिकाणी कम्युनिटी किचन स्थापन करण्यात आले असून त्या अंतर्गत 902 लोकांना जेवण देण्यात येत आहे.

यासह जिल्ह्यात एकूण 9 कम्युनिटी किचन अंतर्गत 1258 लोकांना जेवण देण्यात येत आहे अशी माहितीजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. कवठेमहांकाळ तालुक्यात 1 ठिकाणी कम्युनिटी किचन अंतर्गत 11, जत तालुक्यात 1ठिकाणी कम्युनिटी किचन अंतर्गत 61 लोकांना, खानापूर तालुक्यात 1 ठिकाणी कम्युनिटी किचन अंतर्गत 22 लोकांना, आटपाडी तालुक्यात 1 ठिकाणी कम्युनिटी किचन अंतर्गत 96 लोकांना, कडेगाव तालुक्यात 1 ठिकाणी कम्युनिटी किचन अंतर्गत 20 लोकांना ,वाळवा तालुक्यात 1  ठिकाणी कम्युनिटी किचन अंतर्गत 102 लोकांना, शिराळा तालुक्यात 1 ठिकाणी कम्युनिटी किचनअंतर्गत 44 लोकांना जेवण देण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यात 8 निवारा केंद्रामध्ये 1921 व्यक्ती, तासगाव तालुक्यात 1 निवारा केंद्रामध्ये 155 व्यक्ती, कवठेमहांकाळ तालुक्यात 3 निवारा केंद्रामध्ये 481 व्यक्ती, जततालुक्यात 8 निवारा केंद्रामध्ये 310 व्यक्ती, खानापूर तालुक्यात 18 निवारा केंद्रात 2576 व्यक्ती, आटपाडी तालुक्यात 6 निवारा केंद्रात 788 व्यक्ती, पलूस तालुक्यात 8 निवारा केंद्रात 7648 व्यक्ती, कडेगाव तालुक्यात 19 निवारा केंद्रामध्ये 10 हजार 246 व्यक्ती, वाळवा तालुक्यात 18 केंद्रामध्ये 10 हजार 964 व्यक्ती, शिराळा तालुक्यात 3 केंद्रामध्ये 229 तर सांगली-मिरज-कुपवाडमहानगरपालिका क्षेत्रात 5 निवारा केंद्रामध्ये 902 व्यक्ती आहेत. अशा एकूण 97 निवारा केंद्रामधून36 हजार 220 व्यक्तींची सोय करण्यात आली आहे.

यामध्ये साखर कारखाना कॅम्पमधील 31 हजार 81 ऊसतोड कामगारांचा समावेश आहे. तसेच 85 एनजीओंची निवारा केंद्रात खाद्यपदार्थ वितरणासाठी मदत होत आहे. निवारा केंद्रामध्ये आसरा देण्यात आलेल्या लोकांमध्ये हॉटेल कामगार, रोजंदारीवरील मजूर, निराधार व्यक्ती, ऊस तोड मजूर, भटके लोक असून या सर्वांना जेवण, औषधे त्याचबरोबर दैनंदिन गरजेच्या वस्तूपुरवल्या जात आहेत. वैद्यकीय पथकामार्फत त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. निवारा केंद्रात भरती करताना त्यांना ताप, खोकला, सर्दी अशी काही लक्षणे आहेत का याची तपासणी करण्यात आली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची दक्षता प्रशासन घेत आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस