शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

फॅशनच्या नावाखाली मुलं वाट्टेल ते करतात, असं वाटतं तुम्हाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 5:27 PM

मुलं जे कपडे घालतात, ज्या केशरचना करतात, त्याचं कौतूक खरंच नाहीच का करता येत?

ठळक मुद्देमुलं जे जे करतात ते ते चूक, असं पालकांना का वाटतं?

-योगिता तोडकर

चार-पाच दिवसांपूर्वी माझ्या घरी एक छोटा स्नेहमेळावा झाला. जेवणं झाली, गप्पा चालू होत्या. एका बाजूला मुलं टीव्ही पाहत होती. मध्येच एकजण म्हणाला की हे असं टीव्ही पहायचा आणि मग त्यातल्या नवीन फॅशन्स पाहायच्या. तेच करायचं. घालायचं. थोडय़ा वेळानं सगळी मुलं उठून गच्चीत गप्पा मारायला निघून गेली. पण आम्हाला चर्चेला जणू विषय देऊन गेली. आजकालच्या मुलांचा पेहराव, त्यांच्या  केसांच्या स्टाईल्स यावर सत्नच सुरु  झालं. वाटलं अनेक पालकांच्या दृष्टीनं गंभीर विषय असतो हा.मी त्यांना म्हटलं आपल्या आवडी निवडी आपल्या त्यांच्याकडून असणार्‍या  अपेक्षा हा त्यांच्या पेहरावाच्या निर्णयाचा पाया असावा का? आपल्या पिढीत नाही का आपण बदल केले? आपल्या पालकांना तरी कुठे मान्य होतं जे आपण घालायचो ते? ज्याप्रमाणे मुलांचा  अभ्यास, कामाचं स्वरूप यातील बदल आपण स्वीकारले, मग हे का नाही? एरव्ही आपण म्हणतोच की बदल ही जगातील स्थिर गोष्ट आहे. मग ती मुलं हे जगतायत तर आपण का आडवावं त्यांना? आपलं मुल जेंव्हा एखादा वेगळा पेहराव अथवा केशरचना करत तेंव्हा आपण खरंच उत्सुकतेने, कौतुकाने त्याकडे पाहतो का? ते त्याला कसं दिसतंय याबद्दल काही टिप्पणी देतो का? त्याने काही वेळा वेगवेगळ्या गोष्टी केल्यावर, त्यातली त्याला कुठली आवडली, का आवडली, मित्नाची  पाहून केली की स्वतर्‍च डोकं वापरून केली? यातलं नेमकं काय विचारतो आपण त्यांना? काहीच नाही. फक्त टीका सुरु.मंडळी आपले मुलं काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असेल आणि तेही त्यांच्या स्वतर्‍च्या कल्पकतेतून तर त्यांना  वाव देणं हे पालक म्हणून आपलं काम आहे. ते करत असलेल्या या छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांची विचारसरणी, आत्मविश्वास, स्वतर्‍ला सादर करण्याची पद्धत, स्वतर्‍ची मतं असणं, ती मांडणं या सगळ्यात सुसूत्नता यायला लागते. दर वेळेस आपण त्यांच्याबरोबर रंगभूमीवर असणं गरजेचं नाही. काही भूमिका पालकांनी पडद्यामागुनही कराव्यात. आणि अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण सगळ्यांनी. आपली मुलं तरुण होतात. पण अनेक पालक, त्यांचं  तरु णपण पेहरावातून  उठून दिसत असेल तर घरातच त्यांना एक स्पर्धक मिळतो. माणसाने मनाने तरु ण असावं असं म्हणतात, पेहरावाने नाही! पण पालक स्वतर्‍ तसं करत नाहीत. विचारा स्वतर्‍ला की पालक म्हणून  आपली पिढी खरंच फिटनेस साठी व्यायाम करते की जिम, डाएट फिगर मेंटेन करण्यासाठी होतो. आजकालच्या किती स्त्रिया चेहरे सुरकुतेपर्यंत शरीराला त्नास देतात. चेहराच तजेलदार नसेल तर तुम्ही किती बारीक आहात याला काय अर्थ? मुलांच्या लहानपणासून आपले वय, आपली शरीरयष्टी याला अनुरूप तुमचा पेहराव असेल तर मुलांवर संस्कारही तसेच होतात.  तुम्ही स्वीकारा अथवा स्वीकारू नका बदल होणारच आहेत. मग होणार्‍या बदलांकडे आपण सकारात्मकपणे पाहिलं तर त्यातून निश्चित काहीतरी चांगले निष्पन्न करता येईल. मुलांवर सतत टीका केली, शेरे मारले तरी ते त्यांना घालायचं तेच घालणार? पोषाखाबाबतची जी डिसेन्सी आपण त्यांना शिकवू पाहतो ती ही ते शिकणार नाहीत.

(लेखिका समुपदेशक आहेत)yogita1883@gmail.com