शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

'या' संकेतांवरुन ओळखा तुम्हाला नात्यातून बाहेर पडण्याची आहे गरज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 13:17 IST

कोणतीही नाती ही फार नाजूक असतात त्यामुळे नाती फार काळजीने जपावी लागतात. कोणतही रिलेशनशिप पुढे घेऊन जाण्यासाठी खूपकाही द्यावं लागतं, पण त्यानंतरही काही कारणांनी नातं कमजोर होऊन तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं.

(Image Credit : www.independent.co.uk)

कोणतीही नाती ही फार नाजूक असतात त्यामुळे नाती फार काळजीने जपावी लागतात. कोणतही रिलेशनशिप पुढे घेऊन जाण्यासाठी खूपकाही द्यावं लागतं, पण त्यानंतरही काही कारणांनी नातं कमजोर होऊन तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं. अशात काय तुम्हाला स्वत:ची किंमत माहीत आहे? काय तुम्हाला माहीत आहे की, नात्याच्या कोणत्या वळणावर तुम्हाला पुढे एकट्याने निघून जाण्याची गरज आहे? चला जाणून घेऊ असेच काही संकेत केव्हा प्रेमाच्या नात्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. 

तुमचा फायदा घेतला जात असेल तर....

काय नात्यात तुमचा केवळ फायदा घेतला जात आहे? ही गुलामी करण्यासारखंच आहे. जेव्हा दोन लोक प्रेमात असतात तेव्हा समानतेची भावना असते किंवा सामान्यपणे असायला हवी. पण जेव्हा नात्यातील समानता संपलेली असते आणि नातं केवळ तुम्ही एकट्यांनी धरुन ठेवलं असेल तर फायदा काय? केवळ तुमचा फायदा घेतला जात असेल आणि हे तुम्हाला कळत असेल तर या नात्यातून वेळीच बाहेर पडलेले बरे...

आधीसारखा सन्मान नसेल तर...

वेळेनुसार नात्यात काही चढ-उतार येत असतात. पण सन्मान ही कोणत्याही व्यक्तीसाठी महत्त्वाची बाब आहे. आत्मसन्मानाबाबत कोणतीही व्यक्ती तडजोड करत नाही. व्यक्ती खाणं, पिणं, कपडे, राहणं याबाबत अॅडजस्ट करु शकतो, पण आत्मसन्मान या गोष्टींपेक्षा मोठी बाब आहे. जर तुम्ही तुमच्या पार्टनरचा सन्मान करत असाल आणि त्याबदल्यात तुम्हाला अपमान मिळत असेल तर हा नात्यातून बाहेर पडण्याचा संकेत आहे. 

संधी देऊन थकला आहात?

दुसरी संधी देण्याचीही एक सीमा असते. जर तुमचा/तुमची पार्टनर नेहमी माफ न केल्या जाणाऱ्या चुका करत असेल आणि त्यांनतरही तो व्यक्ती तुम्हाला माफी मागायला येत असेल, तुम्ही समोरच्या व्यक्तीवर प्रेम करता म्हणून सतत माफ करत असालही. पण प्रश्न हा आहे की, अशा किती संधी देणार? दुसरी संधी देण्याचीही एक लिमिट असते. तुम्ही जितक्या जास्त संधी द्याल तितका तुमचा फायदा घेतला जाणार. अशाप्रकारच्या नात्यात पुढे जाण्यात काहीच अर्थ उरत नाही. 

आधीसारखं प्रेम नसेल तर...

कोणतही नातं ओझं म्हणून केवळ ओढून-ताणून जपत असाल तर अशा नात्यात राहण्याचा काय अर्थ? कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त ताणली की, ती खराब होते. प्रेमाचं नातं तर फार नाजूक असतं. असं ओझं म्हणून केवळ जपायचं म्हणून जपल्या जाणाऱ्या नात्याचा काहीच अर्थ उरत नाही. दोघांसाठीही फायद्याचं हे ठरेल की, तुम्ही आता थांबावं. 

कधीही न संपणारी भांडणे

भांडणं ही कोणत्याही नात्यात होत असतात. पण ही भांडणं कधीच संपत नसतील तर काय? जर हे तुमच्या रोजच्या जगण्याचा भाग झाले तर? जर तुम्ही रोज भांडत असाल आणि त्यानंतरही कोणत्याही निष्कर्षावर पोहोचत नसाल तर हे नातं थांबवलेलं बरं. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPersonalityव्यक्तिमत्व