शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
2
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
3
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
4
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
5
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
6
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
8
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
9
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
10
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
11
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
12
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
13
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
14
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
15
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
16
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
17
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
18
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
19
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
20
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल

या कारणांनी प्रेमात पार्टनरला दगा देतात लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2018 1:43 PM

व्यक्तींच्या राशींवरुन माणसांच्या व्यक्तीत्वाबद्दल बरंच काही जाणून घेता येतं. त्यानुसारच ब्रेकअप होण्याची कारणेही यावरुन जाणून घेता येतात. बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डला दगा का देतात हे जाणून घेऊया त्यांच्या राशीनुसार...

प्रेमात मिळालेल्या दग्यातून सावरणं हे कुणासाठीही सोपं नसतं. ज्या व्यक्तीवर आपण जीवापेक्षा जास्त प्रेम करतो ती व्यक्तीच जेव्हा साथ सोडून जाते तेव्हा जगण्यातला उत्साहच निघून जातो. ब्रेकअप होण्याची वेगवेगळी कारणे असतात. पण याचं नेमकं कारण काय आहे हे त्यांच्या राशीमध्ये दडलं आहे. व्यक्तींच्या राशींवरुन माणसांच्या व्यक्तित्वाबद्दल बरंच काही जाणून घेता येतं. त्यानुसारच ब्रेकअप होण्याची कारणेही यावरुन जाणून घेता येतात. बॉयफ्रेन्ड गर्लफ्रेन्डला दगा का देतात हे जाणून घेऊया त्यांच्या राशीनुसार...

मेष राशी

मेष राशीचे लोक हे चंचल स्वभावाचे असतात. त्यांना त्यांच्या अंदाजात आयुष्य जगायचं असतं. प्रत्येकवळी काहीतरी नवीन आणि रोमांचक करण्यात त्यांना आनंद मिळतो. पण जेव्हा त्यांचे पार्टनर त्यांना एका साच्यात बांधायला लागतात तेव्हा ते त्यांच्यापासून दूर होऊ लागतात. काही भलेही सोबत राहत असतील पण त्यांच्यात प्रेम राहत नाही. अशावेळी हे दूर जाणं ब्रेकअपचं कारण बनतं. 

वृषभ राशी

या राशीच्या लोकांना जेव्हा असं वाटायला लागतं की, त्यांच्यासोबत पार्टनर चुकीचं वागत आहे तेव्हा ते स्वत:हून पार्टनरपासून दूर राहण्याचा निर्णय घेतात. नातं जेव्हा केवळ फक्त नावाला शिल्लक राहतं, तेव्हा हे लोक नातं संपवण्यासाठी ठोस पाऊल उचलतात. 

मिथुन राशी

या राशीच्या लोकांना फ्लर्ट करण्याची वाईट सवय असते. अनेकदा हे लोक फ्लर्ट करताना आपल्या सीमा विसरुन जातात हेच त्यांना महागात पडतं. त्यांचा फ्लर्ट करण्याचा स्वभावच त्यांना पार्टनरला दगा देण्याला भाग पाडतो. 

कर्क राशी

प्रेम या राशींच्या लोकांसाठी सगळंकाही असतं. पार्टनरला भरभरुन प्रेम देणे, पार्टनरकडून प्रेमाची अपेक्षा करणे हेच या लोकांना यशस्वी नातं वाटत असतं. आणि जेव्हा पार्टनरकडून भरपूर प्रेम मिळत नाही तेव्हा नात्यात दरी निर्माण होते.

सिंह राशी

या राशीच्या लोकांना असं वाटत असतं की, त्यांच्या पार्टनरने सतत त्यांना काय हवंय, त्यांचा आनंद कशात आहे, ते काय करत आहे, या सगळ्या गोष्टींचं लक्ष ठेवावं. पण त्यांच्या या अपेक्षा पार्टनर जेव्हा पूर्ण करु शकत नाही, तेव्हा या राशीच्या लोकांचा त्या नात्यातील इंटरेस्ट कमी होतो.

कन्या राशी

असे म्हणतात की, सफाईदारपणे खोटं कसं बोलावं हे कन्या राशीच्या लोकांकडून शिकावं. या लोकांकडे पार्टनरला दगा देण्याचं ठोस कारण नसतं. पण पार्टनरला दिलेला दगा लपवण्यासाठी त्यांच्याकडे शेकडो खोट्या गोष्टी असतात. या लोकांची प्रत्येक खोटी गोष्ट पार्टनरला खरी वाटत असते.  

तुळ राशी

या राशीच्या लोकांच्या स्वभावात स्थिरता कमी असते. जर या लोकांना काही अडचण वाटली तर ते त्या अडचणीला दूर करण्याचा सतत प्रयत्न करत राहतात. प्रेमातही यांचं वागणं असंच असतं.  

वृश्चिक राशी

प्रेम तर आवश्यक आहेच. पण या राशीच्या लोकांचं लैंगिक जीवन परफेक्ट असणं गरजेचं असतं. आणि जेव्हा त्यांच्या पार्टनरकडून ते मिळत नाही, तेव्हा या राशीचे लोक यावर उपायही बाहेरच शोधतात. 

धनु राशी

या राशीचे लोक फारच मनमौजी असतात. प्रेमाच्या नात्यातही या लोकांची आनंदी राहणं, एन्जॉय करणं अशी इच्छा असते. पण जेव्हा यांचे पार्टनर यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हे लोक त्यांच्यापासून दूर जातात.  

मकर राशी

या राशीच्या लोकांना जेव्हा असं वाटतं की, आता या नात्यात काही राहिलं नाही. या नात्यात भविष्य नाही त्यावेळी हे लोक स्वत:हून खूप माघार घेतात. अशात त्यांना कुणी नवीन साथीदार भेटल्यास हे लोक आपल्या पार्टनरसोबतचं नातं तोडतात. 

कुंभ राशी

या राशीचे लोक फारच रोमॅंटिक असतात. पण पार्टनर केवळ यांनाच चिकटून राहिली तर यांना राग येतो. या लोकांना प्रेमातही फ्रिडम हवं असतं. जेव्हा त्यांना हे फ्रिडम मिळत नाही तेव्हा ते वेगळ पर्याय शोधायला लागतात. 

मीन राशी

रोमान्स आणि रोमान्स कायम टिकून रहावा याचे स्वप्न या राशीचे लोक सतत बघत असतात. पण जर पार्टनरने यांचे स्वप्न मोडले किंवा  त्यांच्या भावनांची गंमत केली तर हे पार्टनरपासून दूर जातात.

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट