शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

जॉबलेस झाल्यानंतर येणाऱ्या समस्या टाळण्यासाठी 'हे' नक्की वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 4:34 PM

नोकरी सुटणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील ताण-तणाव निर्माण  करणारा प्रसंग असतो.

(image credit- freepressjournal.in)

नोकरी सुटणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील ताण-तणाव निर्माण  करणारा प्रसंग असतो. यामुळे प्रत्येक स्त्री किंवा पुरूष ताण-तणावाखाली येत असतो. नोकरी सुटल्यानंतर एका विशिष्ट प्रकारचं दडपण मनावर येत असतं. सध्या आर्थिक मंदिच्या काळात अनेकजणांच्या नोकऱ्या गेल्यामुळे  लोक डिप्रेशनमध्ये जात आहेत. पण असं होणं हि सामान्य बाब आहे. कारण नोकरी गेल्यानंतर एका प्रकारच्या ओझ्याखाली असल्यासारख वाटतं असतं. आयुष्यात अचानक झालेल्या बदलांमुळे नैराश्य येत असतं. पण जर तुम्ही त्या गोष्टी स्वीकारल्या तर तुम्ही पुढे नक्कीच काहीतरी करू शकता. आज आम्ही तुम्हाला जॉबलेस असलेल्या परिस्थिती स्वतःला तुम्ही कसं सावरू शकता हे सांगणार आहोत. 

(image credit- Greter kashmir)

ज्यापद्धतीचे जीवन आपण जगत असतो. त्यात नोकरी जाणे ही असामान्य गोष्ट आहे. या गोष्टीचा आपल्या जीवनावर नकारात्मक परीणाम होत असतो. कारण त्यामुळे मिळकत बंद होणार असते.  मोठ्या नुकसानांचा सामना करावा लागू शकतो. त्यात आपली प्रोफेशनल ओळख, सुरक्षिततेचा अभाव, कामासाठी जोडले गेलेलं सोशल नेटवर्क यांचा समावेश असतो. पण या परिस्थितीत आपण स्वतःला कसं सावरतो हे महत्वाचं  असतं. 

स्वतःला वेळ द्या

(image credit-chicago santime.com)

नोकरी सुटल्यानंतर त्या गोष्टीचे दुःख विसरण्यासाठी वेळ लागत असतो.  अशावेळी  स्वतःच्या भावना स्वीकारून आपल्या चुकांना सुधारण्याचा प्रयत्न करा. या चुका पुन्हा नव्याने काम करत असताना टाळा. स्वतःला काय वाटत आहे. आपण कुठे चुकत आहोत का या गोष्टींचा विचार करा. 

भावनांना व्यक्त करा

(image credit- buisness standered.com)

जेव्हा तुम्ही नैराश्यात असता तेव्हा  आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी  काहतरी लिहण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातील उणीवा काय आहेत तसंच कोणच्या गोष्टी स्वतःमध्ये अजून विकसीत करायला हव्यात याचं  आत्मपरिक्षण करा. 

नवीन मित्र बनवा

नवीन मित्र बनवा किंवा स्पोटर्स कल्ब किंवा सोशल मिडीयाचा वापर करून नवीन माणसांशी बोलण्याचा विचार करा. त्यामुळे तुम्ही जुन्या गोष्टी विसरून नव्याने काम कराल.  कारण चांगले मित्र तुम्हाला नवीन आईडीया देतील. 

आपल्या  कुंटूंबाला वेळ द्या 

( image credit- aisaforlife)

जर  तुम्हाला खूप ताण आला असेल तर आपल्या घरातील लोकांना विश्वासात घेऊन  त्यांना तुमची समस्या सांगा. या कालावधीत घरच्यां व्यक्तींना वेळ दिल्याने तसंच त्यांचाशी मनमोकळ्या गप्पा मारल्याने  तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि ताण हलका होईल.  तसंच घरातल्या व्यक्तींनी दिलेले सल्ले तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरतील 

 भावनांवर नियंत्रण ठेवा

जर  तुम्हाला जास्त राग किंवा  दडपण येत असेल तर ताण घालवण्यासाठी मद्याचे अतिसेवन करणे, बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा.  असं केल्यास तुमचे विचार नकारात्मक होण्याची शक्यता असते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स