शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तरी महामार्ग चाैपदरीकरणाचे त्रांगडे सुटेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:35 IST

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे ११ वर्षे रखडलेले चौपदरीकरणाचे काम पूर्ण केल्याखेरीज अन्य कोणत्याही कामाला परवानी मिळणार नाही, अशा स्पष्ट ...

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे ११ वर्षे रखडलेले चौपदरीकरणाचे काम पूर्ण केल्याखेरीज अन्य कोणत्याही कामाला परवानी मिळणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य सरकारला सुनावले आहे. महामार्गाच्या रखडलेल्या कामावर सोमवारी न्यायालयाने ताशेरे ओढल्याने आता न्यायालयाच्या या दट्ट्यानंतर महामार्ग चाैपदरीकरणाचे त्रांगडे सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६च्या (जुना क्र. १७) चाैपदरीकरणाच्या ४५० किलोमीटरचे रुंदीकरण सुरू आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा तीन जिल्ह्यांमध्ये १० टप्प्यांत होत असून, रत्नागिरीत पाच टप्प्यांमध्ये काम सुरू असून कशेडी घाट ते राजापूर या १९८.५२८ किलोमीटरचे चाैपदरीकरण सुरू आहे. इंदापूर ते कशेडीदरम्यानचे तीन टप्पे रायगड जिल्ह्यात, रत्नागिरीत पुढील पाच आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन टप्पे येतात. २०१० साली चाैपदरीकरणाचे काम मंजूर झाले. त्यानंतर डिसेंबर २०१७ मध्ये पहिल्या टप्प्याचा कार्यारंभ आदेश मिळाला.

रत्नागिरी जिल्ह्यातील पाच टप्प्यांपैकी पहिला टप्पा असलेल्या कशेडी घाट ते परशुराम घाट, चिपळूणपर्यंतचे ८६ टक्के काम झाले आहे, दुसरा टप्पा परशुराम घाट ते आरवलीपर्यंत ४०.५० टक्के झाले आहे. परंतु पुढील तीन टप्प्यांपैकी आरवली ते कांटे या मार्गाचे केवळ ९ टक्के आणि कांटे ते वाकेड या मार्गाचे १६ टक्केच काम झाले आहे. आरवली ते वाकेड या सुमारे १०८ किलाेमीटर मार्गाचे रुंदीकरण रखडले आहे. रूंदीकरण कामाला ११ वर्षाचा दरवर्षापेक्षा यंदा पावसाचे प्रमाण जोरदार असल्याने अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पावसाचा फटका महामार्ग रुंदीकरणाच्या कामाला बसला असून, अनेक ठिकाणी रुंदीकरणाची माती रस्त्यावर आली आहे. महामार्गावर खड्डे मोठ्या प्रमाणावर पडले आहेत.

गेली ११ वर्षे महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत चिपळूण येथील ॲड. ओवेस पेचकर यांनी महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण मंजूर होऊन ११ वर्षे उलटली तरीही हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, याची दखल घेत उच्च न्यायालयाने या वेळी ताशेरे ओढले. महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही नवीन प्रकल्पाला मंजुरी देणार नाही, अशी स्पष्ट सूचना केली. तसेच महामार्गावरील खड्डे बुजविण्याबाबतचा अहवाल सरकारने तीन आठवड्यांत सादर करावा तसेच चौपदरीकरण कामाचा अहवालही डिसेंबरपर्यंत न्यायालयात सादर करावा, असेही आदेश दिले आहेत. त्यामुळे आता तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाग येऊन चाैपदरीकरणाच्या उरलेल्या कामाला गती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.