शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

आकर्षक वचननाम्यात मतदारांना गाजर?

By admin | Updated: October 30, 2015 23:40 IST

रत्नागिरी पोटनिवडणूक : प्रचाराच्या मैदानात गद्दारीचा वार, वचननाम्यात विकासकामांचा भार! -रणसंग्राम

रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेच्या चार जागासाठी १ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठीचा जाहीर प्रचार आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजता संपला आहे. प्रचार सभांमधून एकमेकांवर आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या आहेत. त्यामुळे मतदारांचे प्रबोधन व मनोरंजनही झाले आहे. मात्र, सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुकीत विजयासाठी मतदारांसमोर जाताना जे वचननामे प्रसिध्द केले आहेत; त्यामध्ये विकासकामांचे गाजर मतदारांना दाखवण्यात आले आहे. निवडणुकीनंतर आश्वासनांची ही गाजरे कोण मोडून खाणार व वचनांना कोण जागणार, या भूलभुलय्यामध्ये मतदार आहेत. रत्नागिरी पालिकेच्या प्रभाग २ व प्रभाग चारमधील प्रत्येकी दोन, तर एकूण चार जागांसाठी पोटनिवडणूक होत असून, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, भास्कर जाधव आदी नेत्यांनी हजेरी लावली, तर शिवसेनेचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनीही प्रचारसभेत विरोधकांवर टोलेबाजी केली. प्रत्येक पक्षाने त्यांच्या वचननाम्यात त्या प्रभागातील कोणती विकासकामे करणार, त्याबाबचे स्पष्टीकरण दिले आहे. सार्वत्रिक निवडणुकीला केवळ वर्षाचा कालावधी उरला आहे. त्यामुळे निवडून येणाऱ्या उमेदवारांना खरोखरच त्यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करता येणार आहेत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच पालिकेवर भाजप नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीचे निकाल काहीही लागले तरी मयेकर यांच्या पदाला धोका नाही. त्यामुळे निवडून येणाऱ्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासकामे होण्यासाठी भाजप नगराध्यक्षांशीच जुळवून घ्यावे लागणार आहे. सेना, राष्ट्रवादी, भाजप व मनसेनेही वचननामे मतदारांच्या हाती दिले आहेत. (प्रतिनिधी) प्रचाराची सांगता : सेना-राष्ट्रवादीत चुरसरत्नागिरी पालिकेच्या चार जागांसाठी १ नोव्हेंबर २०१५ रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीतील जाहीर प्रचाराची आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजता सांगता झाली. गेल्या पंधरा दिवसांपासून या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. शेलक्या विशेषणांनी संबोधित करण्यात आले. या निवडणुकीत सेना, राष्ट्रवादी यांच्यातच खरी चुरस असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीकडून परिवर्तनाची हाक...आली परिवर्तनाची लाट, विकासाची धरू आता कास, असा नारा देणारा वचननामा रत्नागिरी पालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदारांसमोर जाताना राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी सादर केला आहे. या वचननाम्यात शहरातील विकासकामांवर भर देण्यात आला आहे. उमेश शेट्ये यांनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या काळात झालेल्या विकासकामांची माहिती वचननाम्यात दिली आहे. तसेच माळनाका उद्यानाचे सुशोभिकरण, रस्त्यांचे डांबरीकरण आदी विविध विकासकामांचे मतदारांना वचन दिले आहे.शिवसेनेचा शहर विकासाचा नारा...एकच ध्यास... रत्नागिरी शहराचा विकास... या घोषवाक्याने रत्नागिरीकरांचे लक्ष वेधून घेणारा वचननामा शिवसेनेच्या उमेदवारांनी मतदारांच्या हाती दिला आहे. या वचननाम्यातील शहर विकासाचा नारा मतदारांना किती भावतो, याची चर्चा आहे. या वचननाम्यात आमदार राजन साळवी यांनी आम्हीही विकास केला. पण सम्राट म्हणून शेखी मिरवली नाही, असा टोला शेट्येंना लगावला आहे, तर संसारे उद्यान शिवशाहीच्या माध्यमातून पूर्णत्त्वास गेल्याचा दावा आमदार उदय सामंत यांनी केला आहे.