शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

रत्नागिरीतील पानवलकर यांचा प्रयोग, प्लास्टिक वगळता कचऱ्यापासून केले टनभर खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 16:40 IST

रत्नागिरी येथील डॉ. मुकुंद पानवलकर यांनी आपल्या बागेतच कंपोस्ट खत निर्मितीचा प्रयोग सुरू केला असून, यातून वर्षभरात सुमारे टनभर खत निर्माण होत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीतील मुकुंद पानवलकर यांचा प्रयोग कचऱ्यापासून केले टनभर खतप्लास्टिक वगळता सर्व कचरा

शोभना कांबळेरत्नागिरी : येथील डॉ. मुकुंद पानवलकर यांनी आपल्या बागेतच कंपोस्ट खत निर्मितीचा प्रयोग सुरू केला असून, यातून वर्षभरात सुमारे टनभर खत निर्माण होत आहे. विशेष म्हणजे डॉ. पानवलकर हे गेल्या सहा वर्षांपासून प्लास्टिक वगळून सर्वप्रकारच्या कचऱ्यापासून खताची निर्मिती करीत आहेत.लहानपणापासूनच बागकामाची आवड असलेल्या डॉ. पानवलकर यांनी आपल्या घराभोवती बाग तयार केली असून, त्यात विविध प्रकारची फुलझाडे तसेच काही फळझाडेही लावली आहेत. यामध्ये काही विदेशातील दुर्मीळ फुलांचाही समावेश आहे. या बागेला बाहेरून माती किंवा खत न आणता, ते स्वत:च तयार करीत आहेत.

या सेंद्रीय खताच्या निर्मितीसाठी घरातील कचरा, भाज्यांचे टाकाऊ अवशेष, देठ, पडलेली पाने-फुले, फळांची नको असलेली साले, याचबरोबर वापरलेली चहा पावडर, अंड्याची टरफले, गवत, कागदाचे तुकडे, पुठ्ठे अगदी निर्माल्य आदी वस्तूंचा समावेश त्यांच्या खत निर्मितीत आहे.

नगर परिषदेच्या घंटागाडीतून फक्त प्लास्टिकचा कचराच आम्ही देतो, असे डॉ. पानवलकर सांगतात. खत तयार करण्यासाठी अगदी फुटलेली बादली वा कुंडीचाही वापर ते करतात.आता स्वतंत्र खत निर्मितीसाठी त्यांनी सुमारे तीन फूट उंचीच्या लोखंडी जाळीचा पिंजरा करून घेतला आहे. त्याभोवती नायलॉनची जाळी शिवून घेतली आहे. यात हा सर्व कचरा टाकला जातो. खत तयार होण्यास सुमारे दीड - दोन महिन्यांचा कालावधी लागतो.

घरासभोवताली असलेल्या बागेला हे खत वर्षभर पुरते. पानवलकर दाम्पत्याला प्रवासाची प्रचंड आवड असल्याने देश - विदेशातील विविध प्रकारची फुले, फळे यांची रोपे त्यांच्या बागेत दिसून येतात. एवढेच नव्हे तर डॉ. पानवलकर त्यापासून नव्या रोपांची निर्मितीही करतात.वाढदिवसाचे औचित्य साधून किंवा भेट म्हणून ही रोपे देताना त्यांना विलक्षण आनंद होतो. या रोपांची किंमत बाहेर २०० ते ५०० रूपयांपर्यंत असल्याचे ते सांगतात.गुलाबाची आवड असलेल्या पानवलकर दाम्पत्याच्या या बागेत २५ प्रकारच्या गुलाबांची १०० रोपे लावलेली आहेत. आपल्याकडे विदेशातील रोपे जगत नाहीत, असा समज आहे. मात्र, पानवलकर दाम्पत्याने हा समजही खोटा ठरवला आहे.

या बागेत विविध प्रकारची जास्वंद, गुलाब, सदाफुली, जरबेरा बरोबरच अ‍ॅडेनिअम, आर्किडेझ, युफोर्बिया, पेन्टास, इम्पेशन्स, डान्सिंग डॉल आदी परदेशी फुलेही बहरलेली आहेत.त्याचबरोबर घराच्या आवारात १५ नारळाची झाडे त्याचबरोबर फणस, सोनकेळी, लाल केळी, आवळा, लिंब, रायआवळा, पेरू, पेर, अंजीर, ड्रॅगनफ्रूट, विलायती काजू, अननस, बोन्साय चिकू आदी झाडे या दोघांनी स्वत: आपल्याकडील कामगाराला मदतीला घेऊन लावलेली आहेत.बागेत नवीन रोप लावताना त्यासाठी मातीचा वापर करायलाच हवा, असे नाही. डॉ. पानवलकर आपल्या बागेत रोपे लावण्यासाठी नारळापासून तयार केलेले कोको पीठ (ते सध्या केरळहून मागवतात) वापरतात. त्यात नारळाच्या सोडणांचे तुकडे टाकतात. यातूनही चांगल्या प्रकारची रोपे येत असल्याचे डॉ. पानवलकर सांगतात.परसदारी केली बागरत्नागिरीतील ८३ वर्षीय डॉ. पानवलकर तसेच त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता या दोघांनाही बागेत काम करण्याची आवड आहे. स्मिता पानवलकर यांनीही परसदारी छोटीशी बाग केली असून, त्यात विविध फुलांबरोबरच विविध फळबाज्या, पालेभाज्या, शेंगभाज्या केल्या आहेत. त्यामुळे भाज्या घरच्या घरीच उपलब्ध होतात. त्यांच्या बागेतही त्या सेंद्रीय खताची निर्मिती करीत आहेत. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPlastic banप्लॅस्टिक बंदी