शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

uddhav thackeray : 'केंद्राकडूनही मदत मिळतेय, पंतप्रधान अन् गृहमंत्र्यांसोबत माझं बोलणं झालंय'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 3:47 PM

uddhav thackeray : महापुरात उध्वस्त झालेल्या चिपळूणची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज आले होते. रत्नागिरी गॅस प्रकल्पाच्या हेलिपॅडवर उतरुन ते चिपळूणला दोन दोन ठिकाणी पाहणी करुन आढावा बैठकीसाठी जात होते

ठळक मुद्देमहापुरात उध्वस्त झालेल्या चिपळूणची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज आले होते. रत्नागिरी गॅस प्रकल्पाच्या हेलिपॅडवर उतरुन ते चिपळूणला दोन दोन ठिकाणी पाहणी करुन आढावा बैठकीसाठी जात होते

रत्नागिरी/चिपळूण - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त चिपळूण भागाला आज भेट दिली. येथील महापूरात आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झालेल्या वापाऱ्यांच्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या. आपलं काय नुकसान झालंय ते आपण पाहिले आहे. आपण चिपळूण पुन्हा उभे करुन दाखवू, असा दिलासा मुख्यमंत्र्यांनी येथील व्यापाऱ्यांना दिला. यावेळी, व्यापाऱ्यांनी तीव्र शब्दात मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता, तुमच्याचकडून आम्हाला अपेक्षा आहेत, तुम्हीचं आमचे मायाबाप आहात, अशा शब्दात अनेकांनी मागणी केली. यावेळी, केंद्राकडूनही मदत मिळत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महापुरात उध्वस्त झालेल्या चिपळूणची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज आले होते. रत्नागिरी गॅस प्रकल्पाच्या हेलिपॅडवर उतरुन ते चिपळूणला दोन दोन ठिकाणी पाहणी करुन आढावा बैठकीसाठी जात होते. मात्र, वाटेतच पानगल्ली येथे जमलेल्या व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना थांबवले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तेथे थांबून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागले. यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात मांडल्या. पाणी आयत्यावेळी सोडण्यात आल्याने कमी वेळातच पुराचे प्रमाण वाढले. संबंधित अशा लोकांवर कारवाई व्हावी, ही मागणी व्यापाऱ्यांनी केली. त्यास, मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली असून चिपळूण पुन्हा उभे करण्याचा विश्वास व्यापाऱ्यांना दिला आहे. 

केंद्राकडून मिळतेय मदत, पंतप्रधानांशी झालं बोलणं 

केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही. राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसानभरपाई संदर्भात घोषणा करण्यात येईल. मदत करताना तांत्रिक मुद्द्यांवर अडचणी येऊ नयेत या संदर्भातील सूचना देखील मी प्रशासनाला केल्या आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, केंद्राकडूनदेखील काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल. केंद्र सरकारकडून आपणास व्यवस्थित मदत मिळत आहे. माझे पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्याशी बोलणं झालं आहे. एनडीआरएफ, लष्कर, हवाई दल यांच्या तुकड्या राज्य सरकारला पूर परिस्थितीत मदत करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणChief Ministerमुख्यमंत्रीprime ministerपंतप्रधानfloodपूर