शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

ईडीची भीती दाखविल्याने उद्धव ठाकरे भाजपला घाबरतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 1:49 PM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ईडीची भीती घातली असल्याने ते भाजपला घाबरत असल्याची टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दापोली येथे बोलताना केली. शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने दापोलीत आलेल्या अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली.

ठळक मुद्देईडीची भीती दाखविल्याने उद्धव ठाकरे भाजपला घाबरतातदापोलीतील शिवस्वराज्य यात्रेत अमोल कोल्हे यांचा आरोप

दापोली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ईडीची भीती घातली असल्याने ते भाजपला घाबरत असल्याची टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दापोली येथे बोलताना केली. शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने दापोलीत आलेल्या अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली.शिवस्वराज्य यात्रेनिमित्त दापोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेने सुरू केलेली जनआशीर्वाद यात्रा कधी सुरू झाली व कधी संपली ते कुणालाही कळले नाही. सरकारकडून सर्वांचा गेल्या पाच वर्षात सर्व पातळ्यांवर अपेक्षाभंग झालेला आहे. या पाच वर्षात तब्बल १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर १ लाख ४४ हजार युवक बेरोजगार झाले आहेत. कायदा व सुरक्षेचा प्रश्न सुरक्षेचाबोजवारा उडालेला आहे. त्यामुळे शिवस्वराज्य यात्रा ही सर्वसामान्यांना आपली यात्रा वाटत आहे. रस्तोरस्ती आमचे होणारे स्वागत ही आमच्या विजयाची नांदी असल्याचेही डॉ. कोल्हे यांनी सांगितले.ज्यावेळी गुजरात येथे सरदार वल्लभाई पटेल यांचा पुतळा उभा राहिला. पण शिवसेनेला महाराष्ट्रात शिवरायांचे स्मारक उभारता आलेले नाही, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने कृषी सन्मान योजना सुरू करण्यात आली. या सन्मान योजनेचा लाभ तुम्हाला मिळाला का, असे आदित्य ठाकरे राज्यात विचारत फिरत आहेत. या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही हे त्यांच्या लक्षात आले तरी शिवसेना गप्प का?

महाराष्ट्र शासनाने महाराजांचे किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला. यावेळी शिवसेनेचे मंत्री गप्प का बसले? याचा अर्थ महाराजांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार शिवसेनेने गमावलेला आहे, असा आरोप त्यांनी केला.या सभेला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचेसमवेत महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार संजय कदम, सरचिटणीस अमोल मिटकरी, तालुकाध्यक्ष जयंत जालगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेनेने किती उद्योग उभारले?शिवसेनेने कोकणासाठी काय दिले येथे किती उद्योग उभारले, कितीजणांना नोकऱ्या दिल्या असे प्रश्न डॉ. कोल्हे यांनी विचारले. शिवसेनेने केवळ भावनिक आवाहने करून येथे मते मिळवली, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेRatnagiriरत्नागिरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस