शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर तालुक्यात केवळ एकच कोविड केअर सेंटर कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:32 IST

राजापूर : गतवर्षी कोरोनावर विजय मिळवणाऱ्या राजापूर तालुक्यात यावर्षी मात्र कोरोना रुग्णांची वाटचाल दोन हजारांकडे झपाट्याने सुरू आहे. मात्र, ...

राजापूर : गतवर्षी कोरोनावर विजय मिळवणाऱ्या राजापूर तालुक्यात यावर्षी मात्र कोरोना रुग्णांची वाटचाल दोन हजारांकडे झपाट्याने सुरू आहे. मात्र, तालुक्यामध्ये केवळ एकच कोविड केअर सेंटर कार्यरत आहे. या रायपाटण कोविड केअर सेंटरची बेड क्षमता ही फक्त १०० रुग्णांची आहे़ अद्यापही रायपाटण व ओणी या ठिकाणी कोविड रुग्णालय प्रस्तावित आहे. ही दोन्ही कोविड रुग्णालये अद्यापही सुरू न झाल्याने तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांना जिल्हा कोविड रुग्णालयावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे उपचार मिळताना राजापूर तालुक्यातील रुग्णांना विलंब होत आहे.

राजापूर तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ या रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा ताेकडी पडत आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे हाल हाेत आहेत़ मंगळवारअखेर राजापूर तालुक्यात १६६९ कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे़ त्यातील ६८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण ७६८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले असले तरी सध्या राजापूर तालुक्यात ८५६ रुग्ण कोरोनाचा सामना करत आहेत. तालुक्यातील भाैगोलिक परिस्थितीचा विचार करता बहुतांश भाग दुर्गम आहे़ त्यामुळे तिथपर्यंत आराेग्य यंत्रणा पाेहाेचण्यास उशीर हाेत आहे, तर रुग्णाला काेराेनाची लागण झाल्यास त्याला रुग्णालयापर्यंत दाखल करण्यास विलंब हाेत आहे़

प्रशासनाने नुकतेच तालुक्यातील पश्चिम भागातील जनतेची मागणी लक्षात घेऊन धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे; पण अद्यापही त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर कार्यान्वित झालेले नाही. धारतळे येथे केवळ २५ बेड क्षमता असणारे कोविड केअर सेंटर उभे राहणार आहे. सध्या राजापूर तालुक्यात ८५६ कोरोना रुग्ण कोरोनाचा सामना करत असताना तालुक्यातील सोयी- सुविधा तुटपुंज्याच आहेत.

लोकप्रतिनिधी मात्र कोविड हॉस्पिटलच्या घोषणा करण्यात गेल्या दोन महिन्यांपासून धन्यता मानत आहेत़ अद्यापही एकही कोरोना रुग्णालय व ऑक्सिजन प्लांटही कार्यान्वित झालेला नाही. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत. त्यात तालुक्यात खासगी व सरकारी असे एकही कोरोना रुग्णालय नसल्यामुळे येथील जनतेला रत्नागिरी, मुंबई, कोल्हापूर आदी ठिकाणांवर अवलंबून राहावे लागत आहे. राजापूर तालुक्यातील जनतेचे दरडोई उत्पन्नही फारच कमी असून, तालुका मोठ्या प्रमाणावर आर्थिक मागास गटात मोडतो़ त्यामुळे खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करण्याइतकी क्षमता तालुक्यातील जनसामान्यांची नाही. परिणामी शासनाच्या रामभरोसे सेवेवरच कोरोना रुग्णांना अवलंबून राहावे लागत आहे. घाेषणांशिवाय जनतेच्या पदरात काहीच पडलेले नसून, जनतेला जीव वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे़