शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकाची चव बिघडली; मसाल्याचा ठसका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाचे संकट गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. त्यातच आता दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाचे संकट गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. त्यातच आता दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने सामान्यांना मेटाकुटीस आणले आहे. त्यातच आता स्वयंपाकाची चव वाढविणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांनाही महागाईचा फटका बसला असल्याने त्यांच्याही दरात भरमसाठ वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या गृहिणींच्या हातची चव बिघडण्याची वेळ आली आहे.

दिवसेंदिवस महागाईचा आलेख वाढू लागला आहे. कोरोनाच्या काळात सर्वत्र बंदीचे सावट आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. नोकऱ्या सुटल्या आहेत. त्यामुळे कसे जगावे, हा प्रश्न आ वासून उभा असतानाच आता इंधन दरवाढीने सामान्य जनता जेरीस आली आहे. इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे त्याचा फटका सर्व वस्तूंच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

स्वयंपाकघरातील पदार्थांच्या चवीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मसाल्यांच्या पदार्थांच्या दरावरही याचा परिणाम झाला असून त्यांचेही दर वाढले आहेत. काहींचे मात्र कमी झाले आहेत.

महागाई पाठ साेडेना

कोरोनाच्या काळात सामान्य जनता आर्थिक संकटाचा सामना करत असतानाच पेट्रोल, डिझेल यांचे दर चढत आहेत. घरगुती गॅसही महागला आहे. महागाईचा फटका जनतेला बसत आहे. भाजीपाला, कडधान्ये याबरोबरच आता मसाल्याचे पदार्थही महागले आहेत.

- रेखा नामजोशी, रत्नागिरी

कोरोनाचे सावट गेल्या दीड वर्षापासून अख्ख्या जगावर आहे. यातून सामान्य नागरिक या संकटाचा सामना करत जगत असतानाच ऐन कोरोना काळात मंदीच्या सावटाबरोबरच महागाईचा भस्मासुर वाढू लागला आहे. महागाई कोरोना संकटातही पाठ सोडत नाही. अन्य पदार्थांच्या दराबरोबरच आता मसाल्याचे दरही वाढले आहे.

-आरती साळुंखे, देवरूख

म्हणून वाढले मसाल्याचे दर

महागाईमुळे सर्वच पदार्थांचे दर वाढले आहेत. दिवसेंदिवस पेट्रोल - डिझेल यांचे दर वाढू लागल्याने वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. त्याचा परिणाम मसाल्याच्या दरावर झाला असून त्यांचेही दर वाढले आहेत.

- जयू पाखरे, व्यापारी, पाल

पेट्रोल, डिझेल आदी इंधनाचे दर गगनाला भिडू लागले आहेत. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून वाहतुकीचे दरही वाढले आहेत. वाहतूक खर्च वाढल्याने त्याचा परिणाम वस्तूंच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळेच मसाल्याचे पदार्थही आता महाग होऊ लागले आहेत.