शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

konkan tourism: तारकर्ली बोट दुर्घटना; कोकणचा दोष काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 17:49 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथील बाेट दुर्घटनेनंतर अनेकांनी संपूर्ण काेकणच असुरक्षित असल्याचे भासवण्यास सुरुवात केली. अनेकांच्या लेखण्यांनी शाई संपेपर्यंत काेकणच्या पर्यटनाचे अवगुण दाखविण्याचा प्रयत्न केला. केवळ सिंधुदुर्ग म्हणजेच काेकण, असे समजून संपूर्ण काेकणातील पर्यटनस्थळे कशी असुरक्षित आहेत, हेच जणू भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

- अरुण आडिवरेकरकोकण म्हटलं की, झर्रकन डाेळ्यासमाेर येताे ताे म्हणजे काेकणातील अथांग समुद्र... निळ्याशार दूरवर दिसणाऱ्या या समुद्राची भुरळ अनेकांना पडते. त्यामुळेच की काय, काेकणात आल्यानंतर अनेकांना समुद्राच्या पाण्याशी खेळण्याचा माेह अधिक हाेताे. आजवर कधीही न पाहिलेला समुद्र पाहिल्यानंतर बंदिस्त तलावात पाेहणाऱ्यांना त्याचे अप्रूप वाटते. त्यामुळेच पर्यटनासाठी येणाऱ्यांपैकी अनेकजण पर्यटनापेक्षा समुद्रात डुंबण्याचाच आनंद लुटतात. काेकणच्या निसर्गाने आजवर अनेकांना भुरळ घातली आहे. त्यामुळेच काेकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसागणिक वाढ हाेत आहे. काेकणात येणाऱ्या पर्यटकांचे तितक्याच आत्मियतेने काेकणवासीय आदरातिथ्य करतात, म्हणूनच याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला काेकण आपलेसे वाटते.पण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथील बाेट दुर्घटनेनंतर अनेकांनी संपूर्ण काेकणच असुरक्षित असल्याचे भासवण्यास सुरुवात केली. अनेकांच्या लेखण्यांनी शाई संपेपर्यंत काेकणच्या पर्यटनाचे अवगुण दाखविण्याचा प्रयत्न केला. केवळ सिंधुदुर्ग म्हणजेच काेकण, असे समजून संपूर्ण काेकणातील पर्यटनस्थळे कशी असुरक्षित आहेत, हेच जणू भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तारकर्ली येथे काही प्रमाणात त्रुटी राहिल्या असतील, पण त्यामुळे संपूर्ण काेकणच असुरक्षित आहे, काेकण ‘आपले नसाच’ असे म्हणणे चुकीचे आहे.रत्नागिरी जिल्हाही याच काेकणात येताे. याच रत्नागिरीमध्ये श्रीक्षेत्र गणपतीपुळे येते. गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या काही कमी नाही. त्याचबराेबर तेथे घडलेल्या दुर्घटनाही कमी नाहीत. याठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने सुरक्षा रक्षक आहेत, लाईफ जॅकेट आहेत, धाेक्याच्या ठिकाणी लाल रिबीनही बांधण्यात आली हाेती, सूचना फलकही आहेत, तरीही दुर्घटना घडतच आहेत. याला कारण पर्यटकांचा आततायीपणा कारणीभूत आहे. ज्यांना समुद्राची खाेलीही माहीत नाही, अशा पर्यटकांना स्थानिक सावधानतेच्याही सूचना देतात. पण, आपणच सर्वज्ञानी असल्याच्या आविर्भावात पर्यटक पाण्यात उतरतात आणि मग दुर्घटना घडतात. गणपतीपुळे येथे पर्यटकांसाठी धाेक्याची सूचना देणारा भलामाेठा फलक लावण्यात आला आहे. पण, आपण इतके पुढारलेले आहाेत की, या अशा फलकांकडे लक्ष का द्यायचे? त्याकडे दुर्लक्ष करून समुद्राच्या पाण्यात उतरायचे आणि मनसाेक्त डुंबायचे, एवढेच माहीत आहे.त्यावेळी दुर्घटना घडली की, दाेष काेकणालाच !काेकणात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी जेवढी व्यवस्थेची आहे, तेवढीच येणाऱ्या पर्यटकांचीही आहेच ना? पुरेशी सुरक्षा असूनही दुर्घटना थांबलेल्या नाहीत. याचे कारण पर्यटकांचा अतिउत्साह आणि मस्ती हेच आहे. तलावात नाही तर स्वीमिंग पूलमध्ये पाेहणाऱ्यांनी समुद्राच्या अथांगतेची परीक्षा का घ्यावी?  ज्या समुद्राची आपल्याला ओळख नाही, पाण्याचा अंदाज नाही, अशा समुद्राच्या पाण्यात खाेलवर जाऊन मस्ती करण्याचे प्रयाेजनच काय? किनाऱ्यावरूनही समुद्राच्या लाटांचा, त्याच्या अथांगतेचा आनंद घेता येताेच ना! त्यासाठी पाण्यातच उतरायला हवे असे काेठे आहे. पाण्याची सफर करताना अंगात लाईफ जॅकेट न घालताही उतरणारे महाभाग असतातच. त्यांच्या चुकीचे टीकास्त्र काेकणावर का? काेकणात पर्यटनासाठी येणाऱ्यांनी स्वत:ची जरी सुरक्षा पाहिली तरी, दुर्घटनांचे प्रमाण कमी हाेईल, हे नक्की.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणtourismपर्यटन