शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
4
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
5
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
6
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
7
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
8
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
9
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
10
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
11
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
12
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
13
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
14
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
15
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
16
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
17
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
18
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
19
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
20
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी

konkan tourism: तारकर्ली बोट दुर्घटना; कोकणचा दोष काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 17:49 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथील बाेट दुर्घटनेनंतर अनेकांनी संपूर्ण काेकणच असुरक्षित असल्याचे भासवण्यास सुरुवात केली. अनेकांच्या लेखण्यांनी शाई संपेपर्यंत काेकणच्या पर्यटनाचे अवगुण दाखविण्याचा प्रयत्न केला. केवळ सिंधुदुर्ग म्हणजेच काेकण, असे समजून संपूर्ण काेकणातील पर्यटनस्थळे कशी असुरक्षित आहेत, हेच जणू भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

- अरुण आडिवरेकरकोकण म्हटलं की, झर्रकन डाेळ्यासमाेर येताे ताे म्हणजे काेकणातील अथांग समुद्र... निळ्याशार दूरवर दिसणाऱ्या या समुद्राची भुरळ अनेकांना पडते. त्यामुळेच की काय, काेकणात आल्यानंतर अनेकांना समुद्राच्या पाण्याशी खेळण्याचा माेह अधिक हाेताे. आजवर कधीही न पाहिलेला समुद्र पाहिल्यानंतर बंदिस्त तलावात पाेहणाऱ्यांना त्याचे अप्रूप वाटते. त्यामुळेच पर्यटनासाठी येणाऱ्यांपैकी अनेकजण पर्यटनापेक्षा समुद्रात डुंबण्याचाच आनंद लुटतात. काेकणच्या निसर्गाने आजवर अनेकांना भुरळ घातली आहे. त्यामुळेच काेकणात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत दिवसागणिक वाढ हाेत आहे. काेकणात येणाऱ्या पर्यटकांचे तितक्याच आत्मियतेने काेकणवासीय आदरातिथ्य करतात, म्हणूनच याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला काेकण आपलेसे वाटते.पण, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथील बाेट दुर्घटनेनंतर अनेकांनी संपूर्ण काेकणच असुरक्षित असल्याचे भासवण्यास सुरुवात केली. अनेकांच्या लेखण्यांनी शाई संपेपर्यंत काेकणच्या पर्यटनाचे अवगुण दाखविण्याचा प्रयत्न केला. केवळ सिंधुदुर्ग म्हणजेच काेकण, असे समजून संपूर्ण काेकणातील पर्यटनस्थळे कशी असुरक्षित आहेत, हेच जणू भासविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तारकर्ली येथे काही प्रमाणात त्रुटी राहिल्या असतील, पण त्यामुळे संपूर्ण काेकणच असुरक्षित आहे, काेकण ‘आपले नसाच’ असे म्हणणे चुकीचे आहे.रत्नागिरी जिल्हाही याच काेकणात येताे. याच रत्नागिरीमध्ये श्रीक्षेत्र गणपतीपुळे येते. गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या काही कमी नाही. त्याचबराेबर तेथे घडलेल्या दुर्घटनाही कमी नाहीत. याठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने सुरक्षा रक्षक आहेत, लाईफ जॅकेट आहेत, धाेक्याच्या ठिकाणी लाल रिबीनही बांधण्यात आली हाेती, सूचना फलकही आहेत, तरीही दुर्घटना घडतच आहेत. याला कारण पर्यटकांचा आततायीपणा कारणीभूत आहे. ज्यांना समुद्राची खाेलीही माहीत नाही, अशा पर्यटकांना स्थानिक सावधानतेच्याही सूचना देतात. पण, आपणच सर्वज्ञानी असल्याच्या आविर्भावात पर्यटक पाण्यात उतरतात आणि मग दुर्घटना घडतात. गणपतीपुळे येथे पर्यटकांसाठी धाेक्याची सूचना देणारा भलामाेठा फलक लावण्यात आला आहे. पण, आपण इतके पुढारलेले आहाेत की, या अशा फलकांकडे लक्ष का द्यायचे? त्याकडे दुर्लक्ष करून समुद्राच्या पाण्यात उतरायचे आणि मनसाेक्त डुंबायचे, एवढेच माहीत आहे.त्यावेळी दुर्घटना घडली की, दाेष काेकणालाच !काेकणात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी जेवढी व्यवस्थेची आहे, तेवढीच येणाऱ्या पर्यटकांचीही आहेच ना? पुरेशी सुरक्षा असूनही दुर्घटना थांबलेल्या नाहीत. याचे कारण पर्यटकांचा अतिउत्साह आणि मस्ती हेच आहे. तलावात नाही तर स्वीमिंग पूलमध्ये पाेहणाऱ्यांनी समुद्राच्या अथांगतेची परीक्षा का घ्यावी?  ज्या समुद्राची आपल्याला ओळख नाही, पाण्याचा अंदाज नाही, अशा समुद्राच्या पाण्यात खाेलवर जाऊन मस्ती करण्याचे प्रयाेजनच काय? किनाऱ्यावरूनही समुद्राच्या लाटांचा, त्याच्या अथांगतेचा आनंद घेता येताेच ना! त्यासाठी पाण्यातच उतरायला हवे असे काेठे आहे. पाण्याची सफर करताना अंगात लाईफ जॅकेट न घालताही उतरणारे महाभाग असतातच. त्यांच्या चुकीचे टीकास्त्र काेकणावर का? काेकणात पर्यटनासाठी येणाऱ्यांनी स्वत:ची जरी सुरक्षा पाहिली तरी, दुर्घटनांचे प्रमाण कमी हाेईल, हे नक्की.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणtourismपर्यटन