शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

कडक लॉकडाऊन आता पुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:40 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : जिल्ह्यात मागील काही महिने लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन आता पुरे झाले. पुढे आर्थिक संकटालादेखील तोंड ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : जिल्ह्यात मागील काही महिने लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन आता पुरे झाले. पुढे आर्थिक संकटालादेखील तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन काही निर्बंधासह दुकाने उघडी करण्यास मुभा द्यावी, असे आवाहन आमदार राजन साळवी यांनी प्रशासनाला केले आहे. लोकांना टाळेबंदीत अधिक अडकवून ठेवणे योग्य होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक पातळीवर ३ जून ते ९ जूनपर्यंत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. बुधवारी लॉकडाऊनची मुदत संपत आहे. तसेच अतिवृष्टीनिमित्त ११ व १२ जून रोजी जिल्ह्यात कर्फ्यू लावण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे लांजा, राजापूर मतदार संघातील व्यापारी संघटना व रिक्षा व्यावसायिक यांनी आमदार राजन साळवी यांना निवेदन दिले आहे. यापुढे लॉकडाऊन न करता शिथिलता देऊन दुकाने उघडी करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी केली आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनता व व्यापारी मेटाकुटीस आले आहेत. महामारीत लोकांचे जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. परंतु लोकांना उपाशी मारणेही योग्य होणार नाही. सर्व व्यवहार बंदीमुळे आगामी काळात मोठे आर्थिक संकट उभे राहण्याची भीती आहे. त्यामुळे परिस्थितीचे अवलोकन करून व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे राजन साळवी यांनी म्हटले आहे. प्रशासनाने याबाबत त्वरित निर्णय घेऊन शासनाने दिलेल्या निर्बंध व नियमाला अधीन राहून व्यापाऱ्यांना काही निर्बंध आणि वेळेची मर्यादा ठेवून दुकाने उघडी ठेवण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.