शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन प्लांटमधील वाहिनीतील गळती गंभीर : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST

रत्नागिरी : रत्नागिरीतील ऑक्सिजन प्लांटमध्ये स्फोट झाल्याची वृत्ते आली. माहिती घेता तो स्फोट नसून वाहिनीत गळती होती; पण रत्नागिरीसह ...

रत्नागिरी : रत्नागिरीतील ऑक्सिजन प्लांटमध्ये स्फोट झाल्याची वृत्ते आली. माहिती घेता तो स्फोट नसून वाहिनीत गळती होती; पण रत्नागिरीसह राज्यात ऑक्सिजन अपुरा पडत असताना गळती होणे हेही योग्य नाही. याबाबत जिल्हा रुग्णालयाने दक्षता घेतली पाहिजे. अशी चूक परत होणार नाही, याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी ऑनलाइन आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

जिल्ह्यातील कोरोनाच्या अनुषंगाने माहिती देण्यासाठी त्यांनी ही ऑनलाइन पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील सद्य:स्थितीचा आढावा घेतला. तसेच चाचण्या आणि लसीकरणाचाही आढावा सकाळी जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत घेतला असल्याचे यावेळी सांगितले. जिल्ह्यात पाच कोरोना रुग्णालये, १३ डी. सी. एच. सी. आणि १४ कोविड सेंटर यांमध्ये एकूण ३०५२ बेड उपलब्ध आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण साडेचार हजार असून त्यापैकी ६८ लोक होम आयसोलेशनमध्ये आहेत. रत्नागिरीत नव्याने नगरपालिकेचे रुग्णालय सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. पाच नव्या ऑक्सिजन प्लांटबरोबरच आता १० नव्या रुग्णवाहिकांसाठी आरोग्य विभागाची मंजुरी मिळाली असून दोन कार्डिॲक रुग्णवाहिका खरेदीची प्रक्रियाही पुढच्या आठवड्यात संपेल. त्याचबरोबर २५ व्हेंटिलेटर खरेदीलाही परवानगी घेतल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

रेमडेसिविर पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, ते अत्यावश्यक असेल तरच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दिले जाणार आहे. लसीकरणाविषयी माहिती देताना ते म्हणाले की, जिल्ह्यात ९० टक्के पोलिसांचे, ९० टक्के महसूल विभागाचे, ९८.५० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे तर ८५ टक्के पंचायत राजमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात लसीकरणाचा आवश्यक तो पुरवठा होत नाही. तोपर्यंत अडचण येणार आहे. येत्या दोन दिवसांत यावर नक्की मार्ग काढू. लसीकरणाचा स्टाॅक आल्यानंतर सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्की राहील. लस सर्वांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आघाडी सरकारची आहे, असे ते म्हणाले. सध्या निर्बंधामुळे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आदी कार्यालयांमध्ये पूर्ण क्षमतेने कर्मचारी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे कामे प्रलंबित राहत आहेत, त्यावर पर्याय म्हणून ऑनलाइन व्यवस्था करता येईल का, ते पाहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्याचे सामंत यांनी सांगितले.

रुग्ण व नातेवाइकांचा संयम आणि सहकार्याची गरज

सध्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यात महत्त्वाचे कारण म्हणजे वेळेवर उपचारासाठी दाखल न होणे, हे आहे. सध्या कम्युनिटी स्प्रेड असल्याचे दिसत असल्याने ही चिंतेची बाब आहे. रुग्णांनी वेळेवर उपचारासाठी दाखल व्हावे.

ॲपेक्स प्रशासन ताब्यात घेणार

ॲपेक्स रुग्णालयाबद्दल रुग्णांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या आहेत. त्यामुळे हे रुग्णालय आता प्रशासनाच ताब्यात घेईल आणि तिथले डाॅक्टरच ते चालवतील, असे सामंत यांनी सांगितले.

चाचण्यांचा अहवाल उशिरा

कोरोना चाचण्यांचे अहवाल प्रलंबित राहत असल्याने जिल्हा रुग्णालयात दुसरे १६ लाखांचे मशीन खरेदी करण्यात येणार आहे.