शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
2
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
3
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
4
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
5
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
6
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
7
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
8
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
9
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
10
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
11
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
12
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
13
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
14
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
15
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
17
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
18
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
19
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
20
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील विक्रेते म्हणतात, आता आंबा पाठवू नका; कोकणातील बागायतदार चिंताग्रस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 18:33 IST

दर वाढला मात्र खरेदी थांबली

रत्नागिरी : गेल्या आठवड्यापासून उष्मा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वाढत्या उष्म्यामुळे झाडावरील आंबा लवकर तयार होत असल्याने बाजारातील आवक वाढली आहे. त्यातच आखाती देशातील युद्धामुळे निर्यात बंद असल्याने नवी मुंबई उत्पन्न बाजार समितीत कोकणासह अन्य राज्यातील आंबा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आलेला आंबा कुठे विकायचा, असा प्रश्न विक्रेत्यांपुढे आहे. त्यामुळे दर गडगडले आहेत. गडगडलेला दर परवडत असेल तर आंबा पाठवा, अन्यथा पाठवू नका असे विक्रेते सांगत असल्याने बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.

फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याला दरवर्षी विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यावर्षी मोहोर चांगला येऊनही अति थंडीमुळे मोहोर करपला व अपेक्षित फळधारणा झाली नाही. जेमतेम १५ ते २० टक्के उत्पादन असल्याचा अहवाल कृषी विभाग व कोकण कृषी विद्यापीठाने शासनाला दिला होता. दरवर्षी आखाती देशात हापूसला सर्वाधिक मागणी असते. मात्र यावर्षी युद्धामुळे वाहतूक खर्च वाढल्याने निर्यात थांबली. देशांतर्गत विविध राज्यांतील बाजारपेठेत आंबा विकावा लागला. त्यामुळे यावर्षी सुरुवातीला आंब्याला दर चांगला मिळाला असला, तरी नंतर मात्र दर गडगडतच गेले.

सध्या ४ ते ५ डझनाच्या पेटीला ७०० ते १,२०० रुपये दर आहे. अर्थात हजार ते १,२०० रुपये हा दर फक्त मोजक्याच बागायतदारांना मिळत आहे. उर्वरित बागायतदारांची पट्टी ७०० ते ८०० रुपये एवढीच आहे. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात विक्रीला पाठवेपर्यंत येणारा खर्च पाहता सध्याचे परवडत नाही. स्वत: विक्रेतेच बागायतदारांना फोनद्वारे दर परवडत असेल, तरच विक्रीला पाठवा अन्यथा पाठवू नये, असे सांगत असल्यामुळे आंबा कुठे विकावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • पेटीला दर - ७०० ते ८०० रुपये
  • खत व्यवस्थापन ते कीटकनाशक फवारणी खर्च - १५० ते २०० रुपये
  • वाहतूक खर्च - १२५ रुपये
  • पॅकींग खर्च २०० रुपये
  • बागायदारांच्या पदरात - १७५ रुपये


तापमान वाढीमुळे आंबा तयार

यावर्षी मुळातच आंबा कमी आहे. परंतु, तापमान वाढल्यामुळे आंबा एकाच वेळी तयार झाल्यामुळे बाजारातील आवक वाढली आहे. नाशवंत फळ असल्यामुळे ठेवण्यापेक्षा मिळेल त्या दराला बागायतदार विक्री करतात. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणासह कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश येथून आंब्याची आवक वाढल्यामुळे बागायतदार मोठ्या प्रमाणावर आंबा आला आहे. कोकणच्या हापूसला सध्या बाजारात ३०० ते ४०० रुपये डझन दर मिळत आहे. परराज्यातील आंबा मात्र ७० ते ३५० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे.

दर वाढला मात्र खरेदी थांबली

दर कमी असताना कॅनिंगचे दर ५० रुपयांवरून थेट ३० रुपयांवर आणले गेले. याबाबत बागायतदारांनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. त्यावर पालकमंत्री सामंत यांनी कॅनिंग कंपन्यांना सज्जड दम भरत ५० रुपये दर देण्याची सूचना केली. मात्र पालकमंत्र्यांच्या सूचनेला कॅनिंग कंपन्यांनी वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या असून, खरेदीच बंद केली आहे. त्यामुळे आगीतून फुफाट्यात अशी बागायतदारांची अवस्था झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Vendors Halt Mango Orders; Konkan Farmers Face Distress

Web Summary : Rising heat ripens mangoes quickly, flooding markets. Export halts worsen the situation, causing prices to crash. Farmers face losses as vendors advise against sending more mangoes due to low prices and high costs. Canning factories halting purchases adds to farmers' woes.