शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

सण आयलाय गाे नारली पुनवेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:33 IST

पावसाळ्यात माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने राज्य सरकारने दि. १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदीचा कालावधी जाहीर केला आहे. ...

पावसाळ्यात माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने राज्य सरकारने दि. १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी बंदीचा कालावधी जाहीर केला आहे. बंदी कालावधी संपला असला तरी वादळी वाऱ्यामुळे नाैका समुद्रात गेलेल्या नाहीत. पावसाळ्यात खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी नारळी पाैर्णिमेला सागराची पूजा केली जाणार असून, नारळ अर्पण करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही मच्छीमार बांधव जाेपासत आहेत.

मच्छीमार बांधव नारळी पौर्णिमेला बोटींना पताका लावतात, छान रंगरंगोटी करून बोटी सजवतात, बोटींची पूजा करतात आणि मासेमारीसाठी समुद्रात लोटतात. कोळीवाड्यातून मिरवणुका काढल्या जातात. थोरामोठ्यांपासून बच्चे कंपनीसह सगळे वाजतगाजत मिरवणुकीने बंदरावर येतात. पारंपरिक कोळीगीते आणि वाद्याच्या साथीने या मिरवणुका रंगतात. समुद्राला शांत करण्यासाठी नारळाला सोनेरी कागद लावून सजवलेला नारळ समुद्राला अर्पण केला जाताे. त्यानंतर सागराला विनवणी करून यावर्षी जाळ्यात चांगली मासळी मिळू दे, अशी प्रार्थना केली जाते.

जिल्ह्यात साडेतीन हजार मासेमारी नौका असून, सोमवारपासून या नौका मासेमारीसाठी समुद्रात रवाना होणार आहेत. समुद्रकिनारपट्टीच्या वस्तीतून मिरवणुका काढण्यात येणार आहेत. मच्छीमार समाज नारळ अर्पण करताेच शिवाय स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस स्थानक, सीमा शुल्क विभागाकडून तसेच नागरिकांकडूनही नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना केली जाते.

-------------------

मच्छिमारांची सागरदेवावरच मदार

मच्छीमार बांधवांचा उदरनिर्वाह मासेवारीवर अवलंबून असल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मागे ठेवून कोळी बांधव भरसमुद्रात मासेमारीला जात असतो. त्यामुळे या समाजाची मदार सागरदेवावर अवलंबून असल्यानेच या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नारळी पौर्णिमनिमित्त खास गोड पदार्थांचा नैवद्य बोटीला व समुद्राला अर्पण केला जातो. समुद्राची यथासांग पूजा करताना, ‘खोल समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या मालकाचे रक्षण कर, आमच्या बोटीवर मुबलक मासळी लाभूू दे...’ असे गाऱ्हाणे समुद्राला घातले जाते.

-----------------------

अनेक ठिकाणी रंगतात स्पर्धा

प्रत्येक गावात नारळी पौर्णिमेचा सण साजरा करण्याच्या काही वेगळ्या परंपराही आहेत. काही ठिकाणी नारळी पौर्णिमेनिमित्त नारळफोडीचा खेळ रंगताे. हातात नारळ घेऊन परस्परांवर आपटून फोडण्याची स्पर्धा भरवली जाते. नारळ फाेडणाऱ्याला बक्षीस म्हणून नारळच दिला जातो. काही ठिकाणी नारळावर लोखंडाचा बॉल मारून नारळ फोडण्याची स्पर्धा रंगते. स्पर्धकापासून सात-आठ फुटांवर नारळ ठेवला जातो. बॉलच्या आकाराचा लोखंडी गोळा त्या नारळावर अचून मारून फोडण्याचे कौशल्य अजमावले जाते. फोडलेला नारळ बक्षीस म्हणून स्पर्धकाला दिला जातो.

- मेहरून नाकाडे