शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

तीन गावात जमीन खरेदी-विक्री बंदी

By admin | Updated: June 26, 2014 00:21 IST

औष्णिक प्रकल्प : आर्थिक कुचंबणेने ग्रामस्थ हैराण

असगोली : धोपावे औष्णिक वीज प्रकल्पाच्या उभारणीसाठी धोपावे, वेलदूर व पवारसाखरी या तीन गावांमधील जमीन भूसंपादित करण्यात येणार आहे. मात्र, गेल्या आठ वर्षांपासून या प्रकल्पाच्या कामाला पूर्णपणे खीळ बसली आहे. शासनाने या प्रस्तावित प्रकल्पाच्या जमिनीबरोबरच अन्य क्षेत्रातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारावर पाच वर्षांची बंदी घातल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शासनाने ही बंदी मागे घ्यावी, अशी मागणी धोपावे येथील उद्योजक व भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य राजन दळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची निवेदनाद्वारे केली आहे.गुहागर तालुक्यातील धोपावे, वेलदूर व पवारसाखरी या तीन गावांच्या ४८५ हेक्टर जमिनीवर महाजनको कंपनीमार्फत १९६० मेगावॅट क्षमतेचा धोपावे औष्णिक वीज प्रकल्प उभारला जाणार होता.एकट्या धोपावे गावाने गेल्या सात वर्षांपासून या प्रकल्पाला ठाम विरोध दर्शवला. प्रशासनाने अनेकवेळा भूसंपादनाच्या प्रक्रियेतील सीमांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळोवेळी धोपावेवासीयांनी आक्रमक भूमिका घेत ती प्रक्रिया हाणून पाडण्यात यशस्वी झाले. गेल्या आठ वर्षांपासून या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात कोणतीच हालचाल झाली नाही, असे असतानाही शासनाने प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जागेबरोबरच अन्य क्षेत्रातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारावर बंदी घालून जागा अडकवून ठेवली असल्याचे दळी यांचे म्हणणे आहे.दरम्यान, या बंदीमुळे येथील जमीनमालकांचे जमीन खरेदी - विक्रीचे व्यवहार पूर्णपणे बंद झाल्याने त्यांना आर्थिक अडचणींला सामोरे जावे लागत आहे. गुहागर दौऱ्यावेळी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी प्रत्यक्षात धोपावे प्रकल्पाला लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन महाजनकोच्या आवश्यकतेप्रमाणे झाले असते, तर उर्वरित जमिनीवरील निर्बंध उठवण्यामध्ये कोणतीच अडचण नव्हती. ही बाब राज्य शासनाच्या अखत्यारीतील असल्याने लोकसभेची आचारसंहिता संपताच जमीन खरेदी - विक्री व्यवहार प्रक्रिया सुरु करता येईल, असे तटकरे यांनी सांगितले होते. प्रशासनाने याचा पाठपुरावा करुन येथील जमिनीचे व्यवहार सुरु करावेत, अशी मागणी एका निवेदनाद्वारे राजन दळी यांनी केली आहे. (वार्ताहर)