शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: पावसामुळे खेड-दापोली मार्गांवर दोन ठिकाणी रस्ता बंद, संगमेश्वरात महामार्गावर चिखल अन् खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 18:48 IST

खेड : गेले चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड-दापोली या प्रमुख मार्गावर फुरुस तसेच साखरोळी गावानजीक रस्त्यावरून पाणी वाहू ...

खेड : गेले चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड-दापोली या प्रमुख मार्गावर फुरुस तसेच साखरोळी गावानजीक रस्त्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.खेड - दापोली मार्गाच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गातील फुरूस गावात एक मोरी खचल्याने, तसेच साखरोळी गावानजीक रस्त्यावरून दोन ते तीन फूट पाणी वाहू लागल्याने व काही प्रमाणात रस्ताही खचल्याने अनेक वाहने रखडली हाेती. काही वाहनचालकांनी आपली वाहने पुन्हा परतून दापोली पालगडमार्गे मंडणगड गाठले.गेल्या काही महिन्यांपासून खेड-दापोली या मार्गाचे काम रखडलेले आहे. दरम्यान, यावर्षी पावसाने मे महिन्याच्या २० तारखेला सुरुवात केल्याने ही कामे अपूर्ण राहिली आहेत. या अपूर्ण कामामुळे वाहनचालकांना तसेच या मार्गावरील असलेल्या गावातील ग्रामस्थांना मोठा फटका बसला आहे.

संगमेश्वर येथे महामार्गावर चिखल अन् खड्ड्यांचे साम्राज्यरत्नागिरी : कोकणवासीय आणि कोकणात जाणारे चाकरमानी यांच्या प्रवासातील हाल-अपेष्टा अद्यापही संपलेल्या नाहीत. १२ वर्षे झाली तरी मुंबई- गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही. माणगाव, इंदापूरसोबतच मागील वर्षभरापासून संगेमश्वर येथेही चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे संगमेश्वर येथे महामार्गावर भात लावणीसारखा लाल मातीचा चिखल तयार झाला आहे. त्यात इतके भलेमोठे खड्डे आहेत, की बऱ्याच गाड्या जमिनीला लागत आहेत. दोन्ही दिशांकडील मार्गिकांवर शनिवारी आणि रविवारी संगमेश्वर येथे साधारणपणे १ तासभर वाहतूक कोंडी झाली होती.महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे संगमेश्वरमध्ये अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय झाला आहे, तसेच खड्डेही पडले आहेत. त्यामुळे गाड्यांचे नुकसान हाेत आहे. बऱ्याच ठिकाणी वाहतूक वळवण्याचे बोर्ड नसल्याने रात्रीच्या वेळी गाडी चालवताना चालकांना प्रचंड त्रास होत असून, हे अपघातांना आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरत आहे. काही ठिकाणी अचानक दुहेरी वाहतूक मार्ग एकेरी केला गेला असला तरी त्याचे सूचना फलक लावले नाहीत. त्यामुळे अचानक समोरून गाडी आल्यावर चालकांची तारांबळ उडत आहे. यामुळेही अपघात घडत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसroad transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्ग