शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी प्रकल्प समर्थकांनी खाल्ली उचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST

राजापूरः रिफायनरी प्रकल्पाबाबत नाणार परिसरातील कथित जमीन गैरव्यवहारप्रकरणी कोकण शक्ती महासंघाच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टची जोरदार चर्चा ...

राजापूरः रिफायनरी प्रकल्पाबाबत नाणार परिसरातील कथित जमीन गैरव्यवहारप्रकरणी कोकण शक्ती महासंघाच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टची जोरदार चर्चा सध्या राजापूरमध्ये सुरू आहे. कोकण शक्ती महासंघ म्हणजे राज्य शासनाला समांतर यंत्रणा कार्यान्वित आहे का, याचे स्पष्टीकरण करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विलास अवसरे, सागवे ग्रामपंचायत सदस्य जुनेद मुल्ला व विद्याधर राणे यांनी केली आहे.

कोकण शक्ती महासंघाचे अशोक वालम यांनी या पोस्टमध्ये, रिफायनरी प्रस्तावित असलेल्या काळात ज्या जमिनींची खरेदी-विक्री व्यवहार झाले आहेत, त्यांची चौकशी आपल्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी सुरू केल्याचे म्हटले आहे. ३१ मार्चपर्यंत प्रत्येक गावातील सन २०१६ ते २०१९ पर्यंतच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीची प्रकरणे तलाठी यांच्याकडे जमा करावीत. ही चौकशी करून व्यवहार रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांचे आहेत. खरेदी-विक्रीचे केलेले व्यवहार रद्द झाले तरी, ज्यांनी जमिनींचे पैसे घेतलेले आहेत, त्यांना व्यवहारातील पैसे परत द्यावे लागणार नाहीत. तुम्हाला कोणालाही पैसे परत देण्याची गरज नाही, असे वालम यांनी स्पष्ट केलेले आहे. याबाबत शासन अथवा प्रशासनाने चौकशीची प्रक्रिया विषद करण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

रिफायनरीला समर्थन करणाऱ्या सर्व संस्था व संघटनांनी गैरव्यवहारांची कठोर चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. मात्र सद्यस्थितीत मारूनमुटकून तक्रारी निर्माण करण्याकडे प्रकल्पविरोधकांचा कल दिसत आहे. त्यातूनच तक्रारी करा, तुम्ही घेतलेले जमिनीचे पैसे कोणालाही परत द्यावे लागणार नाहीत, असे बेकायदेशीर विधान मुख्यमंत्र्यांचा हवाला देऊन केले गेले आहे. याबाबत तत्काळ चौकशी करावी, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.