शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

रत्नागिरी : गांडूळ खतातून उन्नतीकडे भरारी, श्री व्याघ्रांबरी स्वयंसहायता बचत गटाच्या कार्याची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 15:35 IST

गांडूळखत प्रकल्पाबरोबरच सामुहिक शेतीचा प्रयोग करून गुहागर तालुक्यातील असगोली येथील श्री व्याघ्रांबरी स्वयंसहायता बचत गटाच्या कार्याची दखल घेऊन रत्नागिरीतील श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी : गांडूळ खतातून उन्नतीकडे भरारीश्री व्याघ्रांबरी स्वयंसहायता बचत गटाच्या कार्याची दखल

शोभना कांबळेरत्नागिरी : सहकाराच्या मंत्राने आज ग्रामीण भागातील महिला बचतगट प्रगती करू लागले आहेत. कृषी विभागाच्या सहकार्याने नवनवीन प्रयोग करून अर्थार्जनाची साधने आणि उत्पन्न ते मिळवू लागले आहेत.

गुहागर तालुक्यातील असगोली येथील श्री व्याघ्रांबरी स्वयंसहायता बचत गटाने गांडूळखत प्रकल्पाबरोबरच सामुहिक शेतीचा प्रयोग करून इतर बचत गटांसमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या बचत गटाच्या कार्याची दखल घेऊन रत्नागिरीतील श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचा पुरस्कार या गटाला प्रदान करण्यात आला आहे.या बचत गटाच्या अध्यक्षा सुजाता कावणकर यांच्या पुढाकाराने गावातील अनिता कावणकर, सुलभा रामाणे, सविता कोळंबे, विजया कोळंबे, तारामती पानगले, राधिका घाणेकर, रंजना कावणकर, वंदना कावणकर या दहा महिलांनी एकत्र येत १ जानेवारी २००४ रोजी श्री व्याघ्रांबरी स्वयंसहायता बचत गटाची निर्मिती केली.

छोट्याशा मासिक बचतीतून या बचत गटाची वाटचाल सुरू झाली. प्रारंभी गटातील महिलांना घरगुती अडचणींसाठी कर्ज देण्यास प्रारंभ झाला. हे कर्ज घेतानाच त्याची नियमित परतफेड करण्याची सवय या महिलांनी लावून घेतली.या महिलांना गजेंद्र पौनीकर यांचे मार्गदर्शन सातत्याने होत होतेच. त्यामुळे या व्यवसायासाठी या महिलांनी पुढाकार घेतला. त्यासाठी बँकेने आर्थिक मदतीचा हात पुढे करत या गटाला २ लाख रूपये कर्जापोटी देऊ केले. त्याचे या महिलांनीही सार्थक केले.

पहिल्या तीन वर्षात या बचत गटाने ६५ टन गांडूळखताची निर्मिती केली. त्याला बाजारपेठही मिळवली आणि पाच हजार रूपये प्रतिटन या दराने खताची विक्रीही केली.तीन वर्षातच त्यांच्यावरील कर्जाचा बोजाही उतरला. आता तर हा बचतगट १०० टनपेक्षा अधिक गांडूळखताचे उत्पादन करीत आहे.या महिलांनी स्वत:चा उद्योग उभा करतानाच इतर महिलांनाही स्वयंरोजगार मिळवून दिला आहे. या खतनिर्मिती प्रकल्पात गटाबाहेरील महिलांना सहभागी करून घेत त्यांनाही त्यांच्या कामाचा मोबदला दिला जात आहे. गेल्या बारा वर्षात या बचत गटातील महिलांनी ६ लाख ३२ हजार रुपये एवढा निव्वळ नफा मिळवला आहे.२०१६ - १७ या वर्षात या गटाने ३६ टन गांडूळखताची निर्मिती केली आणि ८००० रूपये प्रतिटन दराने त्याची विक्री करून २ लाख ८८ हजार रूपयांचे उत्पन्न मिळवले. यातून गटातील आणि गटाबाहेरील महिलांची मजुरी, वाहतूक खर्च वगळता निव्वळ ९६ हजार रूपयांचा नफा मिळवला. यामुळे बॅँकही सहकार्यासाठी पुढे येत आहे.

या बचत गटाला शासनाचा  राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार  प्राप्त झाला आहे. या महिलांनी चारसुत्री भातलागवडही यशस्वी केली आहे. भाडेतत्वावर शेतजमीन घेऊन त्यावर या महिला ही लागवड करीत आहेत.सक्रिय सहभागकाही महिलांकडे शौचालय नव्हते, अशांना गटांतर्गत कर्जपुरवठा करून शौचालय बांधून दिले. या महिलांनी शेतीशाळेचेही आयोजन केले होते. त्याचप्रमाणे तीन-चार ठिकाणी कच्चे बंधारे बांधून पाणी अडवण्यास मदत केली. दापोली विद्यापीठाचे कृषी प्रदर्शन, पुणे - मुंबई- गणपतीपुळे येथील सरस प्रदर्शनात महिला सहभागी होतात.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWomenमहिला