शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : कष्टाला मार्केटिंगची जोड : सोलापूरचे कांदाव्यापारी रत्नागिरीत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 16:45 IST

शेतीच्या बांधावर आयुष्य काढणाऱ्या या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याची पाळेमुळे रत्नागिरीच्या ग्राहकांपर्यंत पोहोचली आहेत. गेली पाच वर्षे सोलापुरातील शेतकरी थेट रत्नागिरीत येऊन कांदा विक्री करत आहेत. त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे हे शेतकरी समाधानाने सांगतात.

ठळक मुद्देरत्नागिरी : कष्टाला मार्केटिंगची जोड : सोलापूरचे कांदाव्यापारी रत्नागिरीत पोहोचलेगेली पाच वर्षे व्यापारासाठी दाखल, जेव्हा शेतकऱ्यांनी बांधाची वेस ओलांडली

मेहरून नाकाडे रत्नागिरी : मार्केट यार्डमध्ये कांद्याचे कोसळलेले दर, हमाली, दलाली करता करता हातात येणारी तूटपुंजी रक्कम, मिळणाऱ्या नक्की बाकीतून उत्पादन खर्चसुध्दा निघत नाही, शेती सोडवत नाही आणि आलेले उत्पन्न जगू देत नाही, त्यामुळे आत्महत्या वाढत असताना दुसरीकडे सोलापुरातील शेतकरी शेतीपलिकडे पाऊल टाकू लागले आहेत.

शेतीच्या बांधावर आयुष्य काढणाऱ्या या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याची पाळेमुळे रत्नागिरीच्या ग्राहकांपर्यंत पोहोचली आहेत. गेली पाच वर्षे सोलापुरातील शेतकरी थेट रत्नागिरीत येऊन कांदा विक्री करत आहेत. त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे हे शेतकरी समाधानाने सांगतात.कोकणात पावसाळ्यापूर्वी साठवणुकीचा कांदा मोठ्या प्रमाणावर खरेदी केला जातो. त्यामुळे या काळात कांद्याला मोठी मागणी असते. कांदा पिकतो ते शेत आणि रत्नागिरी यांची नाडी आजपर्यंत कधीच जुळली नव्हती. त्यामुळे रत्नागिरीत कांद्याचे भाव अव्वाच्या सव्वा वाढलेले होते.

दलाल, हमाली यातून कांद्याचे भाव वाढत होते. या संपूर्ण व्यवहारात कांदा पिकवणारा शेतकरी अन् तो खरेदी करणारा शेवटचा ग्राहक हे दोघेही भरडले जात होते अन् दलाल गब्बर होत होते. अखेरीस शेतकऱ्यांनीच शेताच्या बाहेर पडण्याचे ठरवले. नुसते काळ्या मातीत राबून आपले पोट भरणार नाही तर बाजारपेठेवरही आपला कब्जा पाहिजे, हा विचार सोलापुरात रुजला आणि तो रत्नागिरीपर्यंत अंमलात आला.पाच वर्षांपूर्वी सोलापुरातील शेतकऱ्यांनी पहिल्यांदा कांद्यासह रत्नागिरीची सैर केली अन् त्यामध्ये त्यांना पूर्वीपेक्षा चांगला फायदा मिळाला. त्यामुळे हळूहळू हा विचार आणखीन रूजला.

घाऊक बाजारात तीन ते चार रुपये किलोने जाणारा कांदा रत्नागिरीत शेतकऱ्यांकडून ८ ते १० रुपयांना विकला जाऊ लागला. घाऊक बाजारात हमाली, दलाली, वाहतूक खर्च करून शेतकऱ्यांच्या हाती काहीच येत नव्हतं.

एवढंच नव्हे, तर रत्नागिरीकरांनाही हा १० व ५० किलोच्या पिशवीत उपलब्ध असणारा कांदा परवडू लागला. त्यामुळे ग्राहक अन् शेतकरी दोहोंनाही हा व्यवहार सोयीचा होत आहे.पावसाळा तोंडावर असल्याने कांद्याची साठवणूक केली जाते. त्यामुळे कांद्याला विशेष मागणी आहे. याशिवाय मुस्लिम भाविकांचा रमजान सुरू असल्याने या महिन्यांत कांद्याचा खपही अधिक होतो. बाजारभावापेक्षा कमी किमतीतील कांदा ग्राहकांना परवडत असल्याने शेतकऱ्यांकडील कांदा खरेदी सध्या जोरात सुरू आहे.शेतकरी-ग्राहक थेट संपर्कसोलापुरातील ट्रक भाड्याने करतात आणि त्यामध्ये १० व ५० किलोची कांद्याची पोती भरून रत्नागिरीकडे येतात. रत्नागिरी शहर, परिसरात कांद्याची विक्री जोरात सुरु आहे.

मार्केट यार्डमध्ये ३ ते ४ रूपये किलोने कांदा विक्री करण्यापेक्षा हेच शेतकरी ८ ते १० रूपये किलो दराने कांदा विक्री करत आहेत. शेतकरी ते ग्राहक असा थेट व्यवहार होत असल्याने शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही फायदा होत आहे.रत्नागिरीकरांची व्यापाऱ्यांकडून कशी होते लूटरत्नागिरीकरांची लूट किती होते पहा! कष्ट करून स्वत:च्या शेतात कांदा पिकवणारा शेतकरी हजारो मैल अंतर पार करून थेट ग्राहकाच्या घरापर्यंत कांदा पोहोचवतो, तोही १० रुपये किलो दराने! आणि हाच स्वत:च्या दुकानापर्यंत आलेला कांदा रत्नागिरीतील व्यापारी ग्राहकांना विकतो १५ रुपये किलोने!

म्हणजे शेतकरी शेतीतील कष्ट अन् वाहतूक खर्च करूनही ८ रुपयांनी कांदा विकतो अन् मिळालेल्या पैशात समाधानी राहतो अन् व्यापारी? तो काही न करता स्वत:च्या दुकानात कांदा विक्रीला ठेवून एका किलोमागे कमीत कमी ८ रुपये फायदा कमावतो. यातूनच दलाल गब्बर होतात.खिचडीवर तावदिवसभर ग्राहकांच्या मागे धावल्यानंतर थकलाभागलेला शेतकरी सायंकाळी वळतो तो खिचडीच्या डिशकडे! दिवसभर कांदा विक्री झाली की, सायंकाळी एखाद्या झाडाखाली चूल पेटते अन् त्यावर खिचडी रटरटू लागते. त्यावर यथेच्छ ताव मारून दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा कांदा विक्रीत जुंपून घ्यायचं, असा त्यांचा दिनक्रम असतो.मार्केट यार्डमध्ये कांदा पाठविणे म्हणजे तोट्याचे गणित आहे. त्यामुळे गेली पाच वर्षे रत्नागिरीत येऊन कांदा विक्री करणे सुलभ झाले आहे. मार्केट यार्डला ३ ते ४ रूपये किलो दराने कांदा विक्री होते; परंतु रत्नागिरी शहर व आसपासच्या परिसरात हाच कांदा ८ ते १० रूपये किलो दराने सहज संपतो.

 

गावातील दोन शेतकरी मित्र मिळून एक गाडी भरून कांदा आणतो. आठ ते नऊ टन कांदा त्यामध्ये असतो. चार - पाच दिवसात कांदा संपला की, घर गाठतो. यावर्षीच्या हंगामात कांदा विक्रीसाठी आणलेली ही सहावी गाडी आहे. गाडीचे भाडे देणे परवडते. शिवाय कांदा विक्रीतून आपला फायदाही होतो. ग्राहकांना दुकानात किंवा बाजारात १० ते १५ रूपयांना मिळणारा कांदा जेव्हा ८ ते १० रूपयात मिळतो, याचे समाधान अधिक मिळत असते.- रावसाहेब दादा बरवे, गिरवे, माळशिरस (जि.सोलापूर)

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीonionकांदाSolapurसोलापूर