शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीला रत्नागिरीत नारळाने २० वरून गाठला चाळीशीचा पल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 18:33 IST

महाशिवरात्रीला रत्नागिरीतील शिव मंदिरे गजबजली खरी; पण मनोभावे शिवशंकराला नमस्कार करायला जाणाऱ्या भक्तांची मात्र महाशिवरात्र ही मोठी परीक्षाच ठरली. कारण २० रुपयांना मिळणाऱ्या नारळाने मंगळवारी चाळीशी गाठली होती.

ठळक मुद्देश्रीफळाला एका दिवसात सोन्याचा भावसामान्य भक्तानी शिवपिंडीवर बेलपत्रच वाहणे केले पसंत

विहार तेंडुलकररत्नागिरी : महाशिवरात्रीला रत्नागिरीतील शिव मंदिरे गजबजली खरी; पण मनोभावे शिवशंकराला नमस्कार करायला जाणाऱ्या भक्तांची मात्र महाशिवरात्र ही मोठी परीक्षाच ठरली. कारण २० रुपयांना मिळणाऱ्या नारळाने मंगळवारी चाळीशी गाठली होती.महाशिवरात्रीनिमित्त रत्नागिरी शहरात शिव मंदिरात भक्तांनी गर्दी केली होती. प्रसिध्द काशिविश्वेश्वर मंदिरातही भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळपासूनच मंदिरात भक्तांनी गर्दी केली होती. दुपारीही विश्वेश्वर मंदिरापासून सुमारे दीड किलोमीटर लांबीची रांग लागली होती.दरम्यान, भक्तांची वाढती संख्या पाहून नारळ विक्रेत्यांनी उखळ पांढरे करून घेतले. एरव्ही बाजारात २० रुपयांना मिळणारा नारळ मंदिराबाहेर चक्क ४० रुपयांना विकण्यात येत होता.मंदिरात जाताना भक्तगण घरातून सामान आणणे पसंत करत नाहीत, तर ते मंदिराबाहेरच्या स्टॉलवरूनच विकत घेतात. त्याचा फायदा आज या व्यावसायिकांनी उचलल्याचे दिसून आले. ४० रुपयांना मिळणारा नारळ पाहून सामान्य भक्तानी हात आखडता घेत बेलपत्रच शिवपिंडीवर वाहणे पसंत केले.अनेक रोगांन नारळ ग्रस्तरत्नागिरी जिल्हा हा पूर्वी आंबा, काजूसह अन्य पिकांबरोबर नारळ उत्पादनातही अग्रेसर होता. मात्र गेल्या काही वर्षात नारळाचे उत्पादन झपाट्याने घटले असून त्यामुळे अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात नारळ मागवला जातो. पूर्वी रत्नागिरीत पिकणारा नारळ हा आकाराने मोठा होता. आता विविध रोगांमुळे नारळाच्या आकारातही झपाट्याने घट झाली आहे.नारळाचे उत्पादन घटलेरत्नागिरी जिल्ह्यात नारळाचे उत्पादन झपाट्याने घटत असून नारळ विकास केंद्राच्या (कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड) रत्नागिरी जिल्ह्यात ४ हजार २५० हेक्टर क्षेत्र नारळ पिकाखाली आहे. सिंधुदूर्ग जिल्हा हा रत्नागिरी जिल्ह्यापेक्षा छोटा असूनही त्याठिकाणी १७ हजार ५५५ हेक्टर क्षेत्र नारळ पिकाखाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांशी नारळाची झाडे ही दाटीवाटीने लावण्यात आल्याने नारळाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे.व्यापाऱ्यांकडूनही पिळवणूकरत्नागिरी जिल्ह्यात सध्या उत्पादीत होणारा नारळ हा सण समारंभ यासाठीच विकला जातो. मात्र काही प्रमाणात नारळाची बाजारात व्यापाऱ्यांमार्फत विक्री केली जाते, तोही अत्यंत कमी दराने शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो. रत्नागिरीच्या बाजारपेठेत व्यापारी जो नारळ १६ ते २० रुपयांनी विकला जातो, तो शेतकऱ्यांकडून केवळ ८ रुपयांनी विकत घेतला जातो. यावरूनच व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक लक्षात येते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTempleमंदिर