शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

महाशिवरात्रीला रत्नागिरीत नारळाने २० वरून गाठला चाळीशीचा पल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 18:33 IST

महाशिवरात्रीला रत्नागिरीतील शिव मंदिरे गजबजली खरी; पण मनोभावे शिवशंकराला नमस्कार करायला जाणाऱ्या भक्तांची मात्र महाशिवरात्र ही मोठी परीक्षाच ठरली. कारण २० रुपयांना मिळणाऱ्या नारळाने मंगळवारी चाळीशी गाठली होती.

ठळक मुद्देश्रीफळाला एका दिवसात सोन्याचा भावसामान्य भक्तानी शिवपिंडीवर बेलपत्रच वाहणे केले पसंत

विहार तेंडुलकररत्नागिरी : महाशिवरात्रीला रत्नागिरीतील शिव मंदिरे गजबजली खरी; पण मनोभावे शिवशंकराला नमस्कार करायला जाणाऱ्या भक्तांची मात्र महाशिवरात्र ही मोठी परीक्षाच ठरली. कारण २० रुपयांना मिळणाऱ्या नारळाने मंगळवारी चाळीशी गाठली होती.महाशिवरात्रीनिमित्त रत्नागिरी शहरात शिव मंदिरात भक्तांनी गर्दी केली होती. प्रसिध्द काशिविश्वेश्वर मंदिरातही भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळपासूनच मंदिरात भक्तांनी गर्दी केली होती. दुपारीही विश्वेश्वर मंदिरापासून सुमारे दीड किलोमीटर लांबीची रांग लागली होती.दरम्यान, भक्तांची वाढती संख्या पाहून नारळ विक्रेत्यांनी उखळ पांढरे करून घेतले. एरव्ही बाजारात २० रुपयांना मिळणारा नारळ मंदिराबाहेर चक्क ४० रुपयांना विकण्यात येत होता.मंदिरात जाताना भक्तगण घरातून सामान आणणे पसंत करत नाहीत, तर ते मंदिराबाहेरच्या स्टॉलवरूनच विकत घेतात. त्याचा फायदा आज या व्यावसायिकांनी उचलल्याचे दिसून आले. ४० रुपयांना मिळणारा नारळ पाहून सामान्य भक्तानी हात आखडता घेत बेलपत्रच शिवपिंडीवर वाहणे पसंत केले.अनेक रोगांन नारळ ग्रस्तरत्नागिरी जिल्हा हा पूर्वी आंबा, काजूसह अन्य पिकांबरोबर नारळ उत्पादनातही अग्रेसर होता. मात्र गेल्या काही वर्षात नारळाचे उत्पादन झपाट्याने घटले असून त्यामुळे अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात नारळ मागवला जातो. पूर्वी रत्नागिरीत पिकणारा नारळ हा आकाराने मोठा होता. आता विविध रोगांमुळे नारळाच्या आकारातही झपाट्याने घट झाली आहे.नारळाचे उत्पादन घटलेरत्नागिरी जिल्ह्यात नारळाचे उत्पादन झपाट्याने घटत असून नारळ विकास केंद्राच्या (कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड) रत्नागिरी जिल्ह्यात ४ हजार २५० हेक्टर क्षेत्र नारळ पिकाखाली आहे. सिंधुदूर्ग जिल्हा हा रत्नागिरी जिल्ह्यापेक्षा छोटा असूनही त्याठिकाणी १७ हजार ५५५ हेक्टर क्षेत्र नारळ पिकाखाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांशी नारळाची झाडे ही दाटीवाटीने लावण्यात आल्याने नारळाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे.व्यापाऱ्यांकडूनही पिळवणूकरत्नागिरी जिल्ह्यात सध्या उत्पादीत होणारा नारळ हा सण समारंभ यासाठीच विकला जातो. मात्र काही प्रमाणात नारळाची बाजारात व्यापाऱ्यांमार्फत विक्री केली जाते, तोही अत्यंत कमी दराने शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो. रत्नागिरीच्या बाजारपेठेत व्यापारी जो नारळ १६ ते २० रुपयांनी विकला जातो, तो शेतकऱ्यांकडून केवळ ८ रुपयांनी विकत घेतला जातो. यावरूनच व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक लक्षात येते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTempleमंदिर