शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

रत्नागिरीत मध्यरात्री आगीत घर जळून १३ लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 1:02 PM

Fire Ratnagiri- रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे येथील बोरसई मोहल्ला येथील घराला शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत संपूर्ण घर खाक झाले. या आगीत तीन कुटुंबांचे सुमारे १३ लाख ७० हजारांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत मध्यरात्री आगीत घर खाक सैतवडे येथील दुर्घटना, सुमारे १३ लाखाचे नुकसान

रत्नागिरी : तालुक्यातील सैतवडे येथील बोरसई मोहल्ला येथील घराला शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत संपूर्ण घर खाक झाले. या आगीत तीन कुटुंबांचे सुमारे १३ लाख ७० हजारांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.सैतवडे बोरसई मोहल्ला येथील घराला शनिवारी मध्यरात्री अचानक आग लागली. आग लागल्याचे आजूबाजूच्या लोकांना कळताच त्यांनी घराकडे धाव घेतली. हे घर सामायिक असून, आगीतील सर्व सामान खाक झाले. मन्सूर हुसेन महंमदअली खलपे यांच्या घरात त्यांची बहीण मैमुना या राहतात. आग लागल्याचे कळताच त्या घरातून बाहेर पडल्याने वाचल्या.

या आगीत त्यांचे ४,५०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. अमिना महामूद खलपे या मुंबईला राहत असल्याने त्यांचे घर बंद होते. मात्र, आगीत त्यांचे ४,७०,००० रूपयांचे नुकसान झाले आहे. तर अब्दुल अजीज इसाक खलपे हे रत्नागिरीत राहत असल्याने त्यांचे घरही बंद होते. आगीमुळे त्यांचे ४,५०,००० रुपयांचे नुकसान झाले.घराला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी जयगड येथील पोर्ट, एनर्जी, चौघुले कंपनी येथील अग्निशमन दल, जयगड खंडाळा पोलीस, सैतवडे सरपंच सागर कदम, गुंबद सरपंच उषा सावंत, मुनाफ वागळे, अजिम चिकटे, साजिद शेकासन, अनिकेत सुर्वे, बानू खलपे, राजेश पालशेतकर, बोरसई ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले. रात्री उशिराने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.या आगीबाबत जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा जाधव यांनी रत्नागिरीचे तहसीलदार शशिकांत जाधव यांना रात्रीच फोनवर माहिती दिली. त्यानंतर रविवार सकाळी आगीचा पंचानामा करण्यात आला.

टॅग्स :fireआगRatnagiriरत्नागिरी