शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींचा आराखडा रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 3:42 PM

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग कसा करावा, त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने दिले होते. मात्र, जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींनी अजूनही हे आराखडे तयार केले नसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींचा आराखडा रखडला पंधरावा वित्त आयोग, तातडीने कामाच्या सूचना

रत्नागिरी : पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग कसा करावा, त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना पंचवार्षिक विकास आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने दिले होते. मात्र, जिल्ह्यातील ४७ ग्रामपंचायतींनी अजूनही हे आराखडे तयार केले नसल्याचे समोर आले आहे.जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतींच्या हद्दीत येणाऱ्या भागाचा विकास कसा करावा, त्याची आखणी चौदावा वित्त आयोगाची मुदत संपण्यापूर्वीच करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चौदावा वित्त आयोग ३१ मार्च २०२० रोजी संपत आहे. त्यापूर्वी पंधराव्या वित्त आयोगासाठीचे हे विकास आराखडे तयार करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक, सदस्य तसेच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे सभापती, अध्यक्ष या पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले आहे.रत्नागिरी जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाचा निधी कसा खर्च करावा, यासाठी आतापासून नियोजन करण्याच्या दृष्टीने सर्व ग्रामपंचायतींना विकास आराखडे तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. हे विकास आराखडे २० डिसेंबरपूर्वी ग्रामपंचायतींनी सादर करावेत, असे आदेश देण्यात आले होते.जिल्ह्यातील तब्बल ७९९ ग्रामपंचायतींनी आराखडे तयार करुन ते सादर केले. मात्र, ४७ ग्रामपंचायतींनी अजूनही आराखडे तयारच केलेले नसल्याने ते अद्यापही सादर केलेले नाहीत. त्याबद्दल त्यांना आराखडे तत्काळ सादर करण्याच्या कडक सूचना जिल्हा परिषदेकडून देण्यात आल्या आहेत.विविध योजनांचा समावेशपंधराव्या वित्त आयोगासाठी गावचा आराखडा तयार करताना त्यामध्ये गावातील रस्ते, आरोग्य, शिक्षण, मानव विकासावर २५ टक्के, महिला व बालकल्याणासाठी १० टक्के तसेच मागासवर्गीयांच्या लोकसंख्येनुसार त्यावरील खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या विविध मुद्द्यांच्या आधारे हे पंचवार्षिक आराखडे तयार करण्याचे आदेश जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRatnagiriरत्नागिरी